शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्सचा प्रथम गळीत हंगाम प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:23 IST

अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स केनवडे (ता. कागल) प्रथम गळीत हंगाम शुभारंभः सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उचललेला गोवर्धन म्हणजे अन्नपूर्णा ...

अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स केनवडे (ता. कागल) प्रथम गळीत हंगाम शुभारंभः सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उचललेला गोवर्धन म्हणजे अन्नपूर्णा साखर कारखाना

भूमिपुत्रांची स्वप्नपूर्ती म्हणजेच अन्नपूर्णा साखर कारखाना

कागल तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग आहे पण खऱ्या अर्थाने कागलची ओळख ‘राजकीय विद्यापीठ’ म्हणून करून देणारे चार दिग्गज नेते आहेत त्यापैकी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे आणि विद्यमान ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा समावेश आहे हे चारही नेते मास लिडर आहेत. हे नेते जर वेगवेगळ्या तालुक्यात जन्माला आले असते तर निश्चितच दोन दशके तरी आमदारकी शाबूत ठेवली असती, एवढे कर्तृत्व आणि नेतृत्व त्यांच्यामध्ये आहे. यामध्ये संजयबाबांची ओळख वेगळीच ती म्हणजे कोणती ही सत्ता, साधनसंपत्ती नसताना चाळीस वर्षे आपल्या नावाचे गारूड जनतेच्या हृदयावर ठेवले आहे. पाचवेळा पराभव पत्करूनही जनतेला दोष आणि शिव्या शाप न देता पुन्हा ते पूर्वीच्या जोमाने कार्यरत राहिले आहेत. दीड वर्षांचे आमदार आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ आदीवर नेतृत्व करण्याची संधी मिळताच त्यांनी या संधीचे सोने केले. हे एवढं सहज आणि सोपे असेल काय नक्कीच नाही. स्वतःचे दुःख दाबून ठेवून सामान्य जनतेच्या दुःखावर फुंकर मारणारे संजयबाबा व्रतस्थ राजकारणी आहेत; असेच म्हटले पाहिजे, अशा नेत्याने स्थापन केलेल्या अन्नपूर्णा साखर कारखान्याचा शुभारंभ म्हणजे टाकीचे घाव सोसणाऱ्या नेत्यांचा स्वप्नपूर्तीचा दिवस होय.

सामान्य शेतकऱ्यांनी उचललेला गोवर्धन म्हणजेच अन्नपूर्णा साखर कारखाना होय. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे भूमिपुत्रांचा साखर कारखाना म्हणजेच अन्नपूर्णा साखर कारखाना होय.

शुभारंभाच्या निमित्ताने कागल तालुक्यात कोल्हापूर जिल्हा सीमाभागातील सामान्य जनतेने आपल्या हक्काचा कारखान्याचे जे स्वप्न पाहिले त्याची ही स्वप्नपूर्ती आहे. कागल तालुक्यामध्ये पाचवा साखर कारखाना सुरू होत असून संजयबाबा गटातील कार्यकर्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. केनवडेसारख्या भागात डोंगर फोडून कारखाना उभारण्यासाठी बाबांनी जिवाचे रान केले. गेले कित्येक दिवस कोरोनासारखी महामारी असतानासुद्धा रात्रंदिवस कार्यकर्ते व कामगारवर्ग शेतकरी यासाठी मेहनत घेत होते. कारखान्याची पूर्तता होत असताना सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्नपूर्णा पाणीपुरवठा योजनेमुळे पांढऱ्यापट्ट्यातील गावांना मुबलक पाणी मिळू लागल्यामुळे उसाचे मळे तयार होऊ लागले आहेत त्यामुळे बाबागटाला साखर कारखान्याची गरज वाटू लागली. आजचा हा दिवस म्हणजे त्या गरजेचा सुवर्णक्षण म्हणावा लागेल. अत्याधुनिक यंत्रसामग्री, केमिकलविरहित प्रकल्प पंधराशे मेट्रिक टन प्रतिदिन ऊस गाळप करण्यासाठी सज्ज झाला आहे. तयार होणाऱ्या केमिकल फ्री साखर व गूळ पावडरची जागतिक बाजारपेठ तसेच भारतीय बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी आहे. त्यामुळे उसाला चांगला भाव मिळणार असून अत्याधुनिक यंत्रणेमुळे पर्यावरणास प्रदूषणाचा धोका असणार नाही, अशा या अन्नपूर्णा शुगर ॲन्ड जॅगरी वर्क्सचा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा

शब्दांकन : सिद्राम मांडरेकर, जनसंपर्क प्रमुख, अन्नपूर्णा शुगर केनवडे, ता. कागल