शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्सचा प्रथम गळीत हंगाम प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:23 IST

अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स केनवडे (ता. कागल) प्रथम गळीत हंगाम शुभारंभः सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उचललेला गोवर्धन म्हणजे अन्नपूर्णा ...

अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स केनवडे (ता. कागल) प्रथम गळीत हंगाम शुभारंभः सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उचललेला गोवर्धन म्हणजे अन्नपूर्णा साखर कारखाना

भूमिपुत्रांची स्वप्नपूर्ती म्हणजेच अन्नपूर्णा साखर कारखाना

कागल तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग आहे पण खऱ्या अर्थाने कागलची ओळख ‘राजकीय विद्यापीठ’ म्हणून करून देणारे चार दिग्गज नेते आहेत त्यापैकी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे आणि विद्यमान ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा समावेश आहे हे चारही नेते मास लिडर आहेत. हे नेते जर वेगवेगळ्या तालुक्यात जन्माला आले असते तर निश्चितच दोन दशके तरी आमदारकी शाबूत ठेवली असती, एवढे कर्तृत्व आणि नेतृत्व त्यांच्यामध्ये आहे. यामध्ये संजयबाबांची ओळख वेगळीच ती म्हणजे कोणती ही सत्ता, साधनसंपत्ती नसताना चाळीस वर्षे आपल्या नावाचे गारूड जनतेच्या हृदयावर ठेवले आहे. पाचवेळा पराभव पत्करूनही जनतेला दोष आणि शिव्या शाप न देता पुन्हा ते पूर्वीच्या जोमाने कार्यरत राहिले आहेत. दीड वर्षांचे आमदार आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ आदीवर नेतृत्व करण्याची संधी मिळताच त्यांनी या संधीचे सोने केले. हे एवढं सहज आणि सोपे असेल काय नक्कीच नाही. स्वतःचे दुःख दाबून ठेवून सामान्य जनतेच्या दुःखावर फुंकर मारणारे संजयबाबा व्रतस्थ राजकारणी आहेत; असेच म्हटले पाहिजे, अशा नेत्याने स्थापन केलेल्या अन्नपूर्णा साखर कारखान्याचा शुभारंभ म्हणजे टाकीचे घाव सोसणाऱ्या नेत्यांचा स्वप्नपूर्तीचा दिवस होय.

सामान्य शेतकऱ्यांनी उचललेला गोवर्धन म्हणजेच अन्नपूर्णा साखर कारखाना होय. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे भूमिपुत्रांचा साखर कारखाना म्हणजेच अन्नपूर्णा साखर कारखाना होय.

शुभारंभाच्या निमित्ताने कागल तालुक्यात कोल्हापूर जिल्हा सीमाभागातील सामान्य जनतेने आपल्या हक्काचा कारखान्याचे जे स्वप्न पाहिले त्याची ही स्वप्नपूर्ती आहे. कागल तालुक्यामध्ये पाचवा साखर कारखाना सुरू होत असून संजयबाबा गटातील कार्यकर्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. केनवडेसारख्या भागात डोंगर फोडून कारखाना उभारण्यासाठी बाबांनी जिवाचे रान केले. गेले कित्येक दिवस कोरोनासारखी महामारी असतानासुद्धा रात्रंदिवस कार्यकर्ते व कामगारवर्ग शेतकरी यासाठी मेहनत घेत होते. कारखान्याची पूर्तता होत असताना सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्नपूर्णा पाणीपुरवठा योजनेमुळे पांढऱ्यापट्ट्यातील गावांना मुबलक पाणी मिळू लागल्यामुळे उसाचे मळे तयार होऊ लागले आहेत त्यामुळे बाबागटाला साखर कारखान्याची गरज वाटू लागली. आजचा हा दिवस म्हणजे त्या गरजेचा सुवर्णक्षण म्हणावा लागेल. अत्याधुनिक यंत्रसामग्री, केमिकलविरहित प्रकल्प पंधराशे मेट्रिक टन प्रतिदिन ऊस गाळप करण्यासाठी सज्ज झाला आहे. तयार होणाऱ्या केमिकल फ्री साखर व गूळ पावडरची जागतिक बाजारपेठ तसेच भारतीय बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी आहे. त्यामुळे उसाला चांगला भाव मिळणार असून अत्याधुनिक यंत्रणेमुळे पर्यावरणास प्रदूषणाचा धोका असणार नाही, अशा या अन्नपूर्णा शुगर ॲन्ड जॅगरी वर्क्सचा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा

शब्दांकन : सिद्राम मांडरेकर, जनसंपर्क प्रमुख, अन्नपूर्णा शुगर केनवडे, ता. कागल