शहरं
Join us  
Trending Stories
1
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
2
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
3
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
4
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
5
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
6
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
7
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
8
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
9
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
10
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
11
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
12
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
13
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
14
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
15
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
17
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
18
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
19
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
20
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा

अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्सचा प्रथम गळीत हंगाम प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:23 IST

अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स केनवडे (ता. कागल) प्रथम गळीत हंगाम शुभारंभः सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उचललेला गोवर्धन म्हणजे अन्नपूर्णा ...

अन्नपूर्णा शुगर अँड जागरी वर्क्स केनवडे (ता. कागल) प्रथम गळीत हंगाम शुभारंभः सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उचललेला गोवर्धन म्हणजे अन्नपूर्णा साखर कारखाना

भूमिपुत्रांची स्वप्नपूर्ती म्हणजेच अन्नपूर्णा साखर कारखाना

कागल तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत अनेक राजकीय नेत्यांचा सहभाग आहे पण खऱ्या अर्थाने कागलची ओळख ‘राजकीय विद्यापीठ’ म्हणून करून देणारे चार दिग्गज नेते आहेत त्यापैकी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे आणि विद्यमान ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजयबाबा घाटगे यांचा समावेश आहे हे चारही नेते मास लिडर आहेत. हे नेते जर वेगवेगळ्या तालुक्यात जन्माला आले असते तर निश्चितच दोन दशके तरी आमदारकी शाबूत ठेवली असती, एवढे कर्तृत्व आणि नेतृत्व त्यांच्यामध्ये आहे. यामध्ये संजयबाबांची ओळख वेगळीच ती म्हणजे कोणती ही सत्ता, साधनसंपत्ती नसताना चाळीस वर्षे आपल्या नावाचे गारूड जनतेच्या हृदयावर ठेवले आहे. पाचवेळा पराभव पत्करूनही जनतेला दोष आणि शिव्या शाप न देता पुन्हा ते पूर्वीच्या जोमाने कार्यरत राहिले आहेत. दीड वर्षांचे आमदार आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ आदीवर नेतृत्व करण्याची संधी मिळताच त्यांनी या संधीचे सोने केले. हे एवढं सहज आणि सोपे असेल काय नक्कीच नाही. स्वतःचे दुःख दाबून ठेवून सामान्य जनतेच्या दुःखावर फुंकर मारणारे संजयबाबा व्रतस्थ राजकारणी आहेत; असेच म्हटले पाहिजे, अशा नेत्याने स्थापन केलेल्या अन्नपूर्णा साखर कारखान्याचा शुभारंभ म्हणजे टाकीचे घाव सोसणाऱ्या नेत्यांचा स्वप्नपूर्तीचा दिवस होय.

सामान्य शेतकऱ्यांनी उचललेला गोवर्धन म्हणजेच अन्नपूर्णा साखर कारखाना होय. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे भूमिपुत्रांचा साखर कारखाना म्हणजेच अन्नपूर्णा साखर कारखाना होय.

शुभारंभाच्या निमित्ताने कागल तालुक्यात कोल्हापूर जिल्हा सीमाभागातील सामान्य जनतेने आपल्या हक्काचा कारखान्याचे जे स्वप्न पाहिले त्याची ही स्वप्नपूर्ती आहे. कागल तालुक्यामध्ये पाचवा साखर कारखाना सुरू होत असून संजयबाबा गटातील कार्यकर्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. केनवडेसारख्या भागात डोंगर फोडून कारखाना उभारण्यासाठी बाबांनी जिवाचे रान केले. गेले कित्येक दिवस कोरोनासारखी महामारी असतानासुद्धा रात्रंदिवस कार्यकर्ते व कामगारवर्ग शेतकरी यासाठी मेहनत घेत होते. कारखान्याची पूर्तता होत असताना सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्नपूर्णा पाणीपुरवठा योजनेमुळे पांढऱ्यापट्ट्यातील गावांना मुबलक पाणी मिळू लागल्यामुळे उसाचे मळे तयार होऊ लागले आहेत त्यामुळे बाबागटाला साखर कारखान्याची गरज वाटू लागली. आजचा हा दिवस म्हणजे त्या गरजेचा सुवर्णक्षण म्हणावा लागेल. अत्याधुनिक यंत्रसामग्री, केमिकलविरहित प्रकल्प पंधराशे मेट्रिक टन प्रतिदिन ऊस गाळप करण्यासाठी सज्ज झाला आहे. तयार होणाऱ्या केमिकल फ्री साखर व गूळ पावडरची जागतिक बाजारपेठ तसेच भारतीय बाजारपेठेमध्ये प्रचंड मागणी आहे. त्यामुळे उसाला चांगला भाव मिळणार असून अत्याधुनिक यंत्रणेमुळे पर्यावरणास प्रदूषणाचा धोका असणार नाही, अशा या अन्नपूर्णा शुगर ॲन्ड जॅगरी वर्क्सचा गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास हार्दिक शुभेच्छा

शब्दांकन : सिद्राम मांडरेकर, जनसंपर्क प्रमुख, अन्नपूर्णा शुगर केनवडे, ता. कागल