शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

जयसिंगपुरात ‘अंकुश’चे महावितरणसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

जयसिंगपूर : ‘आंदोलन अंकुश’कडे तक्रार केलेल्या ग्राहकांच्या मागे वीजबिलाचा तगादा लावणार नाही, शिवाय तक्रारीचे निवारण होत नाही तोपर्यंत वीज ...

जयसिंगपूर : ‘आंदोलन अंकुश’कडे तक्रार केलेल्या ग्राहकांच्या मागे वीजबिलाचा तगादा लावणार नाही, शिवाय तक्रारीचे निवारण होत नाही तोपर्यंत वीज जोडणी तोडणार नाही, असे लेखी आश्वासन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जयसिंगपुरातील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे यांनी दिली. वीजबिलाची वसुली करताना महावितरणकडून ग्राहकांना दमदाटी केली जात आहे. अवास्तव व चुकीची बिले दुरुस्त न करताच ती भरण्यासाठी ग्राहकांच्या मागे तगादा लावला जात आहे. वीज जोडणी तोडण्याचीही धमकी दिली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आंदोलन अंकुशने जयसिंगपूर - शिरोळ मार्गावरील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले.

यावेळी आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते व महावितरणचे अधिकारी यांच्यात मागण्यांबाबत चर्चा झाली. ज्या ग्राहकांनी आंदोलन अंकुशकडे तक्रारी दिल्या आहेत, त्यांनी जानेवारीअखेर थकीत वीजबिल भरु नये. या तक्रारींवर अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत वीज जोडणी तोडण्यात येणार नसल्याचे आश्वासन महावितरणने दिल्याची माहिती चुडमुंगे यांनी दिली. या आंदोलनात आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

फोटो - १५०२२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - जयसिंगपूर - शिरोळ मार्गावरील महावितरण कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.