शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबाईचा शालू लिलाव तहकूब

By admin | Updated: December 9, 2015 01:54 IST

साडेपाच लाख सरकारी किंमत : उच्चांकी दरामुळे भाविक नाराज

कोल्हापूर : पाच लाख ४२ हजार रुपये अशा उच्चांकी सरकारी दरामुळे श्री अंबाबाई देवीचा शालू लिलाव मंगळवारी तहकूब केला. आजपर्यंतचा शालूचा हा सरकारी दर उच्चांकी असल्याच्या प्रतिक्रिया भाविकांमधून उमटल्या. शारदीय नवरात्रौत्सवावेळी तिरूपतीहून श्री अंबाबाई देवीला आलेला हा शालू यामुळे कोणी खरेदी केला नाही. आग्रा, इचलकरंजीसह नऊ भाविक लिलावासाठी आले होते. श्री अंबाबाईसाठी तिरूपतीहून दरवर्षी शारदीय नवरात्रौत्सवावेळी शालू (महावस्त्र) येतो. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गरुड मंडपात या शालू लिलावाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्य संगीता खाडे, सदस्य प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी व्यवस्थापक धनाजी जाधव यांनी लिलावात ज्यांनी भाग घेतला, त्या भक्तांची नावे सांगितली. लिलावामध्ये राम उष्माण्णा आडके (इचलकरंजी), प्रभाकर पीरगोंडा पाटील, जयकुमार बाबूराव काडाप्पा (इचलकरंजी), अनिल राजहंस पोळ, बाळासाहेब निकम, श्रीधर श्रीपतराव शिंदे, सूरज भाटिया, संगीता पोळ (कोल्हापूर), नितीन गुप्ता या नऊजणांचा समावेश होता. सहसचिव शिवाजी साळवी यांनी लिलाव प्रक्रियेला सुरुवात केली. या लिलावासाठी अर्ध्या तासाचा वेळ दिला. पण उच्चांकी सरकारी दरामुळे प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हा लिलाव तहकूब झाल्याचे साळवी यांनी जाहीर केले. यावेळी व्हॅल्युएटर पुरुषोत्तम काळे उपस्थित होते.