शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

अंबाबाई मंदिर विकास आराखडा तत्त्वत: मंजूर

By admin | Updated: June 10, 2017 00:54 IST

प्रदक्षिणा संपली : पंधरा दिवसांत होणार अंतिम शिक्कामोर्तब; दोन वर्षांत पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चा, सूचना, विरोध अशा सगळ््या अडथळ््यांची शर्यत पार करीत अखेर शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याला मुख्य सचिव सुमित मलिक यांनी तत्त्वत: मंजुरी दिली. पुढील पंधरा दिवसांत आराखडा मुख्यमंत्र्यांसमोर सादर होऊन त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. या मंजुरीमुळे अंबाबाईभोवती होत असलेल्या कागदोपत्री आराखड्यांची प्रदक्षिणा थांबली आहे. बैठकीत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यापासून दोन वर्षांच्या आत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा ‘शब्द’ महापालिकेकडून देण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजता मुंबईतील उच्चाधिकार समिती व राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्यासमोर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी आराखडा सादर केला. यावेळी नगरविकास खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार उपस्थित होते. काही विषयांवर मुख्य सचिवांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. त्यानंतर मुख्य सचिवांनी पहिला टप्पा किती वर्षांत पूर्ण करणार, असे विचारले असता महापालिकेकडून दोन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत्पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आव्हान महापालिकेला पेलावे लागणार आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या अंबाबाई मंदिराचा सर्वांत पहिला विकास आराखडा तयार झाला सन २००८ मध्ये. त्यानुसार नागरिकांवर स्थलांतराची वेळ येणार असल्याने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. तणाव निर्माण झाल्याने आराखड्याचा विषय काही काळ थांबविण्यात आला. तीन वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्या काळात मुंबईत झालेल्या सादरीकरणात आराखडा राबविण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना मांडण्यात आली. इतका निधी एकाचवेळी देता येत नाही. त्यामुळे आराखड्याचे टप्पे करा, असे सांगण्यात आले. हाच आराखडा ५० कोटींचा, ७२ कोटींचा, ९२ कोटींचा करण्यात आला. काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना एकदा मंदिराच्या आराखड्यासाठी १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला मात्र तो वेळेत खर्च झाला नाही म्हणून परत गेला. तीन वर्षांपूर्वी भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आराखड्यातील वादाचे मुद्दे बाजूला ठेवून मूळ मंदिराचे जतन संवर्धन आणि परस्थ: भाविकांना सोयी-सुविधा केंद्रस्थानी ठेवण्याच्या सूचना केल्या व त्यानुसार बदल करण्यात आले. नवे वाद निर्माण होऊ नयेत म्हणून जून २०१६ मध्ये आराखडा जनतेसमोर सादर झाला आणि विरोध मावळला. पर्यटन समितीच्या बैठकीत आराखड्याला मंजुरी मिळाल्यानंतर तो विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम् यांच्याकडे पाठविण्यात आला. मात्र, त्यांनी काढलेल्या वेगवेगळ््या शंका, स्ट्रक्टरल आॅडिट, बाबनिहाय छाननीमुळे जवळपास सहा महिन्यांचा कालावधी गेला. त्यांनी पुन्हा एकदा मंदिराची पाहणी करून वाढीव तरतूद करून ९२ कोटींवर गेलेला आराखडा पुन्हा ६९ कोटींवर आला अखेर हा सुधारित आराखडा फेब्रुवारी २०१७ रोजी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला.