शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

‘अंबाबाई’ फेरीवालामुक्त क्षेत्र

By admin | Updated: July 15, 2015 01:17 IST

शहर फेरीवाला समितीची बैठक : दक्षिण, पूर्व दरवाजापासून १०० मीटर, तर उत्तर, पश्चिमला ५० मीटर अंतर

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि या परिसरात शिस्त निर्माण होण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यामध्ये मंदिराच्या दक्षिण आणि पूर्व दरवाजापासून १०० मीटर, तर उत्तर आणि पश्चिम दरवाजापासून ५० मीटर अंतर हे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करून त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मंगळवारी घेतला. राष्ट्रीय शहर फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आयुक्त पी. शिवशंकर यांच्या अध्यक्षतेखाली शहर फेरीवाला समितीची बैठक झाली. यावेळी फेरीवाल्यांचे पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय घेण्यात आले. रेल्वे फाटक येथील भाजी मंडईच्या जागेमध्ये फेरसर्वेक्षण करून या ठिकाणी या भाजी विक्रेत्यांबरोबरच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे शक्य आहे काय? याबाबत पाहणी करून निर्णय घेण्याचे ठरले. जे फेरीवाले विचारे कॉम्प्लेक्समधील गाळ्यांमध्ये व्यवसाय करणार आहेत, अशा गाळेधारकांच्या व्यवसायवृद्धीच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून या रस्त्याला जोडणारा मार्ग राज्य परिवहन महामंडळाच्या कंपाउंडमधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाजी पुतळा येथील हटविण्यात आलेल्या फळविक्रेत्यांना शिवाजी मार्केटच्या पार्किंग एरियामध्ये विशिष्ट क्षेत्र निश्चित करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे बैठकीत ठरले. अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून विकास करण्यात येणार आहे. या परिसरातील बेकायदेशीर व्यावसायिक, फेरीवाले आणि मंजूर बांधकामातील पार्किंगमध्ये असणारे व्यवसाय, यांची तपासणी करण्यात येत असून, त्याची यादी तयार करून त्यावर कारवाई करण्याचे ठरले. यामुळे मंदिर परिसरात शिस्त निर्माण होऊन सुरक्षाव्यवस्था सुद्धा सक्षम करता येणार आहे. त्यादृष्टीने मंदिर परिसर ‘नो फेरीवाला झोन’ करण्याबाबत एकमत झाले. बैठकीसाठी इस्टेट मॅनेजर संजय भोसले यांच्यासह फेरीवाले संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)...अन्यथा त्यांची ओळखपत्रे रद्द करणारशहरात एकूण ८६०० फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झाले असून, ५४०० अर्जदारांची ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. २९०० ओळखपत्रांचे वाटप झाले असून, २३०० ओळखपत्रे अद्याप फेरीवाल्यांनी स्वीकारलेली नाहीत. अशा फेरीवाल्यांना १५ दिवसांची मुदत देण्याचे ठरले असून, या मुदतीत जे फेरीवाले आपली ओळखपत्रे स्वीकारणार नाहीत, त्यांची ओळखपत्रे रद्द करण्याचे ठरले आहे.