शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

कार्यकर्त्यांना मुभा की नेत्यांचे राजकारण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:38 IST

संदीप बावचे / लोकमत न्यूज नेटवर्क शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. १५ जानेवारीला मतदान ...

संदीप बावचे / लोकमत न्यूज नेटवर्क

शिरोळ : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. १५ जानेवारीला मतदान होणार असून, गटातटांच्या हालचालींना वेग आला आहे. तालुक्याची नेतेमंडळी या निवडणुकीत कोणती राजकीय भूमिका घेतात, यावरच स्थानिक आघाड्यांची रणनीती ठरणार असून, कार्यकर्त्यांना मुभा की नेत्यांचे राजकारण, अशी चर्चा निवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाली आहे.

तालुक्यातील अर्जुनवाड, नांदणी, उदगाव, कोथळी, दानोळी, चिपरी, दत्तवाड, यड्राव, शिरदवाड, शिरढोण, धरणगुत्ती या प्रमुख ग्रामपंचायतींच्या निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. ३३ ग्रामपंचायतींपैकी १२ ठिकाणी महिला सरपंच आरक्षण पडणार आहे. त्यातच निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण होणार असल्याने बहुमतासाठी स्थानिक आघाड्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. अंतिम मतदार यादी निश्चित झाल्यामुळे इच्छुकांकडून प्रभागनिहाय मतदारांची गणिते घातली जात आहेत.

राज्यातील सत्तास्थापनेनंतर तालुक्यातील राजकारणात फेरबदल झाले आहेत. तालुक्यात काँग्रेससह शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व यड्रावकर गट अशा प्रमुखांचा समावेश आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक ही स्थानिक गटातटांवर लढविली जात असते. मात्र, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ग्रामपंचायत निवडणुकीत सध्या तरी दिसत नसल्याचे चित्र आहे. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी व्यूहरचना वरिष्ठ पातळीवर राबविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असल्या तरी ‘स्वाभिमानी’ने उदगाव येथे बैठक घेऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. स्थानिक पातळीवर आघाड्या कशा होतात, याकडे लक्ष लागले आहे; तर ५२ पैकी ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने या निवडणुकीला महत्त्व आले आहे.

--------------

चौकट

नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांनंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, गोकुळ दूध संघ या संस्थांच्या निवडणुका होणार आहेत; तर वर्षभरानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेच्या निवडणुकाही होणार आहेत. माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, गुरुदत्त शुगर्सचे माधवराव घाटगे, अनिल यादव, आदी नेतेमंडळी कशी व्यूहरचना आखतात, यावरच स्थानिक आघाड्यांची रणनीती ठरणार आहे.