शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

युतीमध्ये ‘नमना’लाच खडाखडी

By admin | Updated: June 12, 2015 00:02 IST

महापालिका निवडणूक : स्वबळावर लढण्याची खुमखुमी

कोल्हापूर : केंद्रात, राज्यात सत्तेत व महापालिकेतही युती असलेल्या शिवसेना व भाजपमध्ये महापालिकेच्या निवडणुकीवरून आतापासूनच खडाखडी सुरू झाली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांत या निवडणुकीसाठी युती झालीच, तर जागावाटपासून अनेक मुद्द्यांवर कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.कोण बरोबर आले तर त्यांना घेऊन; अन्यथा स्वबळावर, अशी डरकाळी भाजपने फोडल्यावर शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनीही त्याला बुधवारी झालेल्या मेळाव्यात जोरदार प्रत्युत्तर दिले. अधिवेशन यशस्वी झाले म्हणजे महापालिका निवडणूक जिंकता येत नसल्याची टीकाही आमदारांनी भाजपवर केली आहे.केंद्रात, राज्यात भाजपने जोरदार यश मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भाजपचे कमळ सगळीकडे उमलले. त्यामुळे आता महापालिकेतही कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या पक्षाच्या संपर्कात आहेत. देशाला अजून नसले तरी किमान भाजपला तरी ‘अच्छे दिन’ आले असल्याचे चित्र सध्या आहे. त्यामुळेच आपला पारंपरिक सोबती असलेल्या शिवसेनेला आव्हान दिले जात आहे. आमदार क्षीरसागर यांच्या दृष्टीने ही निवडणूक म्हणजे त्यांच्या विधानसभा निवडणुकीचा पाया मजबूत करण्याची संधी आहे. क्षीरसागर आमदार झाल्यापासूनची ही महापालिकेची दुसरी निवडणूक आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला तोंड देत असतानाच त्यांना पुन्हा मित्रपक्ष असलेल्या भाजपशीही लढावे लागत आहे. त्याची महत्त्वाची दोन-तीन कारणे आहेत. मुळात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व आमदार क्षीरसागर यांच्यामध्ये तितकेसे चांगले संबंध नाहीत. पाटील यांच्या स्वीय साहाय्यकास क्षीरसागर समर्थकांकडून मारहाण झाल्यापासून हा वाद सुरू झाला. त्यात विधानसभेला भाजपच्या महेश जाधव यांना चाळीस हजारांवर मते मिळाल्याने क्षीरसागर पुन्हा अस्वस्थ झाले; कारण त्यांच्या पारंपरिक मतपेटीतूनच जाधव यांनी ही मते घेतली होती. त्यात विभागणी झाल्याने त्यांना एका टप्प्यावर विजयासाठी झगडावे लागले. टोलमुक्ती आंदोलनात आमदार क्षीरसागर सुरुवातीपासूनच पुढे आहेत; परंतु आता त्यांच्याच पक्षाचे सरकार सत्तेत आहे. पालकमंत्री पाटील ‘एमएच-०९’ वाहने टोलमुक्त करण्याचा प्रस्ताव मांडतात व त्याला क्षीरसागर लगेच विरोध करून रस्त्यावर उतरण्याची भाषा करतात, हेदेखील धुसफुशीचे महत्त्वाचे कारण आहे. अशा साचलेल्या घडामोडी या दोन पक्षांची महापालिकेत युती करताना आड येत आहेत. त्यात बुधवारी (दि. १०) क्षीरसागर यांनी थेट भाजपच्या राष्ट्रीय पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्ला चढविल्याने त्याचीही दखल भाजपच्या राज्य नेतृत्वाने घेतली असल्याचे सांगण्यात आले. त्या संदर्भात भाजपने थेट कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही असे ठरविले असले तरी भाजपच्या अधिवेशनावर टीका करण्याचा क्षीरसागर यांना अधिकार व गरजही नव्हती, अशी प्रतिक्रिया काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविली. भाजपने युती करावी की नाही, हे ठरविण्याचे अधिकार पालकमंत्री पाटील यांना आहेत; परंतु शिवसेनेत तसे अधिकार आमदार क्षीरसागर यांना स्थानिक पातळीवर नाहीत. हा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील. त्यामुळे युतीवरून एकमेकांना शड्डू मारणे संयुक्तिक नाही, असे भाजपला वाटते. (प्रतिनिधी)कोल्हापूर ‘उत्तर’ मतदारसंघातील २०१४ मधील मतदानआमदार राजेश क्षीरसागर (शिवसेना): ६९ हजार ७३६सत्यजित कदम (काँग्रेस): ४७ हजार ३१५महेश जाधव (भाजप): ४० हजार १०४आर. के. पोवार (राष्ट्रवादी): ९ हजार ८८७रघू कांबळे (भाकप): १५०४सुरेश साळोखे (मनसे): १२८०डी. श्रीकांत (बसप): ११२० स्वबळावर लढण्याची भाजपची भाषाशिवसेनेचे या भाषेला प्रत्युत्तरअनेकजण भाजपच्या संपर्कातक्षीरसरसागर व पाटील यांच्यात वाद