शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

आरोप-प्रत्यारोपांमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:00 IST

संदीप बावचे शिरोळ : गावचा विकास, स्वच्छ व सुंदर ग्रामनिर्मिती, राष्ट्रीय योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणार, भ्रष्टाचारमुक्त व स्वच्छ ...

संदीप बावचे

शिरोळ : गावचा विकास, स्वच्छ व सुंदर ग्रामनिर्मिती, राष्ट्रीय योजना सामान्य माणसांपर्यंत पोहोचविणार, भ्रष्टाचारमुक्त व स्वच्छ कारभार करणार, शेतकऱ्यांसाठी शासकीय योजना राबविणार, मजुरांना शासन स्तरावरील सोयी व योजनांचा लाभ देणार, अशा घोषणांचा पाऊस सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने पहावयास मिळत आहे. सर्वच उमेदवारांचा शक्तिप्रदर्शनासह होम टू होम प्रचार सुरू आहे. जाहिरनाम्याच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न उमेदवारांनी चालविला आहे. मतदारांच्या दारात घोषणापत्रे पोहोचविली जात आहेत. बहुतांशी ग्रामपंचायतींनी प्रसिध्द केलेल्या जाहिरनाम्यातील तेच ते मुद्दे दिसत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत कुठे परिवर्तन तर कुठे ग्रामविकास आघाडी अशा नावाने पॅनेलची बांधणी करून गावपुढाऱ्यांनी कार्यकर्त्यांना मैदानात उतरविले आहे. जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींचे कारभारी येत्या १८ जानेवारीला ठरणार आहेत.

सतरा सदस्य असलेल्या मोठ्या ग्रामपंचायती तालुक्याच्या नेत्यांनी केंद्रीत केल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची सर्वतोपरी तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

मतदारांना प्रभावित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून मागील पाच वर्षांत कोणती कामे केली, शासनाच्या कोणत्या योजना राबविल्या, असे सांगितले जात आहे. तर विरोधी गटाकडून सत्ताधाऱ्यांना टार्गेट करून गेल्या पाच वर्षांत गावाच्या विकासापेक्षा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. आम्ही गावचा संपूर्ण विकास करू, असे देखील आश्वासन विरोधी गटाकडून दिले जात आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. विजयापर्यंत पोहोचण्यासाठी एक गठ्ठा मतांचीदेखील जुळवाजुळव सुरू आहे.

दुरंगी, तिरंगी व बहुरंगी लढतीमुळे उमेदवार, नेते विजयासाठी धडपड करीत आहेत. यात सत्ताधारी सत्ता टिकविण्यासाठी तर विरोधक परिवर्तन करण्यासाठी व्यूहरचना आखत आहेत. एकूणच उमेदवारांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पडत असला तरी सत्ताधाऱ्यांना पुन्हा संधी मिळणार की परिवर्तन होणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

फोटो - १००१२०२१-जेएवाय-०१

फोटो ओळ - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांकडून जोरदार प्रचारयंत्रणा राबविली जात आहे.