शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-शहांविरोधात भाजप वगळून सर्वपक्ष एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:19 IST

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकूमशाहीमुळे देश अधोगतीला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी ...

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकूमशाहीमुळे देश अधोगतीला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजप वगळून सर्वपक्षीय एकत्र लढा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा लोक आंदोलन समिती स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी येथे बैठकीत झाला. येथील अक्कमहादेवी मंटपात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या पुढाकाराने बैठक झाली. शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय देवणे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी देवणे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या कारभारामुळे शेतकरी, कामगार अडचणीत आले आहेत. वेळीच उपाययोजना न केल्याने देशात कोरोनाचा उद्रेक झाला. म्हणून मोदींविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन कोल्हापुरातून लढ्याला सुरुवात करूया. पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात ५ जून रोजी निदर्शने करूया.

राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, मोदींची सत्ता उलथवून टाकण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे.

ॲड. गुलाबराव घोरपडे म्हणाले, केंद्र सरकार हुकूमशाही पद्धतीने भाजप सरकार नसलेल्या राज्यांना त्रास देत आहे. भाजपच्या बाजूने निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना निवृत्तीनंतर राज्यसभेवर खासदारकीचे बक्षीस दिले जात आहे. अशा न्याय व्यवस्थेकडून मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक निकालाची कशी अपेक्षा ठेवायची ?

दिलीप पवार, संदीप देसाई यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे, टी. एस. पाटील आदी उपस्थित होते.

चौकट

आणखी एक समिती

कोल्हापूर जिल्हा लोक आंदोलन समिती स्थापण्याची घोषणा देवणे यांनी केली. समितीचे निमंत्रक राष्ट्रवादीचे पक्षाचे शहर अध्यक्ष पोवार आणि सचिव म्हणून सतीशचंद्र कांबळे काम करतील, असेही त्यांनी जाहीर केले. शहर आणि जिल्ह्यात आता विविध समित्या कार्यरत असताना त्यात पुन्हा या नवीन समितीची भर पडणार आहे.

फोटो : 01062021-कोल-बैठक

कोल्हापुरातील अक्कमहादेवी मंटपातील सर्वपक्षीय बैठकीत विजय देवणे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर नामदेव गावडे, ॲड. गुलाबराव घोरपडे, चंद्रकांत यादव, ए. वाय. पाटील, बाबूराव कदम, आर. के. पोवार, सतीशचंद्र कांबळे, संदीप देसाई उपस्थित होते.