शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

‘आक्रोश पूरपग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची’ पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:30 IST

कोल्हापूर : महापूरग्रस्तांना भरीव नुकसानभरपाई मिळावी, नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित ५० हजारांचे अनुदान द्यावे, आदी मागणीसंबंधी ...

कोल्हापूर : महापूरग्रस्तांना भरीव नुकसानभरपाई मिळावी, नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित ५० हजारांचे अनुदान द्यावे, आदी मागणीसंबंधी सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे पंचगंगा काठावरून भव्य पदयात्रा काढून जलसमाधी घेण्याच्या आंदोलनाची तयारी केली जात आहे. ‘आक्रोश पूरग्रस्तांचा, परिक्रमा पंचगंगेची’ या नावाने पदयात्रा १ सप्टेंबरला सुरुवात होईल. गेल्या महिन्यात आलेल्या महापुरामुळे शेती आणि इतर मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाले आहे; पण भरपाई अतिशय तुटपुंजी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हा निर्णय बदलून भरीव नुकसान भरपाई देण्याची मागणी स्वाभिमानीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी आक्रोश मोर्चा काढून केली आहे. या मोर्चाची दखल घेऊन सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास पदयात्रा काढून स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांसह माजी खासदार राजू शेट्टी नृसिंहवाडी येथे जलसमाधी घेणार आहेत. त्याची घोषणाही शेट्टी यांनी केली आहे. सरकार मदतीचा निर्णय बदलासंबंधी हालचाल करीत नसल्याचे लक्षात येताच जलसमाधी आंदोलनाची तयारी संघटनेतर्फे केली जात आहे.

महापुराने सर्वाधिक नुकसान होणाऱ्या आणि दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या प्रयाग चिखलीपासून पदयात्रा निघेल. तेथून पदयात्रा आंबेवाडी, वडणगे, निगवे, भुये, शिये, शिरोली, हालोंडी, हेर्ले, चोकाक, रूकडी, चिंचवाड, मुडशिंगी, वसगडे, पट्टणकोडोली, इंगळी, रुई, चंदूर, इचलकरंजी, शिरदवाड, अब्दुललाट, हेरवाड, तेरवाड, कुरुंदवाड या मार्गे पदयात्रा ५ किंवा ६ सप्टेंबरला नृसिंहवाडीत पोहोचेल. तेथे पदाधिकारी व माजी खासदार शेट्टी सामुदायिक जलसमाधी आंदोलन करतील.

कोट

स्वाभिमानीने महापूरग्रस्त आणि नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसंबंधी केलेल्या मागण्यांसंबंधी सरकारने सकारात्मक पावले न उचलल्यास पंचगंगा नदीचा उगम झालेल्या प्रयाग चिखलीपासून १ सप्टेंबरला पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रा पंचगंगा काठावरून येत ५ किंवा ६ सप्टेंबरला नृसिंहवाडीत माझ्यासह पदाधिकारी सामुदायिक जलसमाधी घेतील. त्याची तयारी सुरू केली आहे.

- राजू शेट्टी, माजी खासदार