शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

आजऱ्याच्या निवडणुकीत ज्याचं त्याचं ‘गणित’-जिल्ह्यातील राजकारणाचे पडसाद अपरिहार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 01:09 IST

 समीर देशपांडे ।कोल्हापूर : कोल्हापूरच्या एका टोकाला असलेल्या आजरा नगरपंचायतीसाठीचं धुमशान सुरू झालं असताना जिल्हास्तरीय नेत्यांनी त्यातून आपली ‘गणितं’ जुळवायला सुरुवात केली आहे. याआधी ग्रामपंचायत असताना स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून तिथलं राजकारण खेळलं गेलं. मात्र, आता जिल्ह्यातील नेत्यांनी आपापल्या पक्षाची चिन्हं रेटायला सुरुवात केली आहे. त्याला आगामी लोकसभा, विधानसभा आणि विधान ...

ठळक मुद्देआगामी लोकसभा, विधानसभेसह विधान परिषदेच्या निवडणुकीचे संदर्भजिल्ह्यातील मोठ्या नेत्यांचे पाठबळ नसले तरी ती डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे.

 समीर देशपांडे ।कोल्हापूर : कोल्हापूरच्या एका टोकाला असलेल्या आजरा नगरपंचायतीसाठीचं धुमशान सुरू झालं असताना जिल्हास्तरीय नेत्यांनी त्यातून आपली ‘गणितं’ जुळवायला सुरुवात केली आहे. याआधी ग्रामपंचायत असताना स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून तिथलं राजकारण खेळलं गेलं. मात्र, आता जिल्ह्यातील नेत्यांनी आपापल्या पक्षाची चिन्हं रेटायला सुरुवात केली आहे. त्याला आगामी लोकसभा, विधानसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकींचे संदर्भ आहेत.

सत्तारूढ भाजप एकीकडे कमळ चिन्हावर ‘ब्रँडेड नगराध्यक्ष’ करण्यासाठी कंबर कसून तयार असताना आजºयाची स्थानिक परिस्थिती त्यांना तशी परवानगी देत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे ‘कमळा’वर पाणी सोडावे लागेल हे पटवून देण्यासाठी भाजप नेते अशोक चराटी यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली; परंतु आजरा नगरपंचायत होण्यामध्ये ‘भाजप’चा सिंहाचा वाटा असल्याने येथील सत्तेसाठी अगदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर हे लढाईच्या अग्रभागी असणार यात शंका नाही.

राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ यांचा हा थेट मतदारसंघ नसला तरीही आजरा साखर कारखान्यात राष्ट्रवादीप्रणित आघाडीचा पराभव करण्यामध्ये अशोक चराटी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. के. पी. पाटील यांच्या पराभवातही चराटी यांचा वाटा होता. जेव्हा मुश्रीफ हे मंत्रिपदावर होते तेव्हापासून त्यांच्याविरोधात चराटी यांनी उघडपणे दंड थोपटल्यामुळे मुश्रीफ यांनीदेखील तुल्यबळ विरोधासाठी या निवडणुकीत पहिल्यापासून लक्ष घातले आहे.

आमदार सतेज पाटील हे काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यांना आगामी विधान परिषदेसाठीची आजºयाची ही १८ मते महत्त्वाची आहेत. गेली काही वर्षे आजºयातून गायब झालेला ‘हात’ त्यांना पुन्हा चर्चेत आणायचा आहे. त्यामुळे त्यांनीही आजºयात त्यांच्या स्टाईलने बैठक घेतली आणि राष्ट्रवादीची काही मंडळी काँग्रेसमध्ये घेऊन का असेना, परंतु काँग्रेसला लढाईत उतरविले.आमदार प्रकाश आबिटकर यांना गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अशोक चराटी यांनी उघडपणे मदत केली होती. मात्र, दरम्यानच्या काळात चराटी यांनी हातात ‘कमळ’ घेतल्याने आबिटकर यांचीही अडचण झाली आहे.

आबिटकर यांच्या विरोधात ‘भाजप’चा तुल्यबळ उमेदवार असणार हे उघड आहे. अशावेळी चराटी यांना भाजपलाच मदत करावी लागणार, तेव्हा आजºयात आपली स्वतंत्र यंत्रणा आवश्यक आहे, हे ओळखून आबिटकर यांनी शेवटच्या टप्प्यात तिसºया आघाडीला बळ देण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय त्यांनी आधी घेतला असता तर ही आघाडी आणखी मजबूत झाली असती. अशा पद्धतीने नेत्यांनी पुढच्या जोडणीसाठी आजºयात राबायला सुरुवात केली आहे.लोकसभा आणि विधानसभा हे मूळया निवडणुकीला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची मोठी झालर आहे. कोल्हापूरच्या राजकारणात सध्या पालकमंत्री पाटील, महादेवराव महाडिक, धनंजय महाडिक ही फळी एका बाजूला आणि दुसरीकडे हसन मुश्रीफ, सतेज पाटील आणि संजय मंडलिक हे एका बाजूला, अशी विभागणी झाली आहे. अनेक लहान-मोठ्या नेत्यांना लोकसभेवेळी विधानसभेची गणितं पाहून या दोन्ही गटांपैकी एका गटाचा शिक्का मारून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आजºयाची तालुकास्तरीय नगरपंचायत आपल्या ताब्यात राहावी, यासाठी हे दोन्ही गट तितक्याच ताकदीने उतरणार आहेत, यात शंका नाही. मात्र, तिसºया आघाडीला जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांचे पाठबळ नसले तरी ती डोकेदुखी वाढविणारी ठरणार आहे.लोकसभेसाठी संजय मंडलिक यांच्या पाठीशी आजºयातील ताकद राहावी यासाठी मुश्रीफ, सतेज पाटील प्रयत्नशील राहणार असून, धनंजय महाडिक यांच्यासाठी भाजप आग्रही राहील, अशी विभागणी सध्या तरी दिसत आहे. त्यासाठीच्या पूर्वतयारीचाच ही निवडणूक म्हणजे एक भाग आहे.