शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचे पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुराने नुकसान झालेल्या पिकांसह जमिनीच्या पंचनाम्याचे काम बुधवारपासून सुरू झाले आहे. स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापुराने नुकसान झालेल्या पिकांसह जमिनीच्या पंचनाम्याचे काम बुधवारपासून सुरू झाले आहे. स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी हे जागेवर जाऊन पंचनामे करणार आहेत. अद्याप नदी परिसरात पाणी असल्याने पंचनाम्याच्या कामाला गती येत नसली तरी दहा दिवसांत पंचनाम्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नजर अंदाजानुसार ५८ हजार ५०० हेक्टरमधील पिके बाधित झाली असून, हजारो हेक्टर जमीन तुटून गेली आहे. हाता तोंडाला आलेली पिके गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, जगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. दरम्यान, शासनाने नुकसान झालेली पिके व जमिनीचे पंचनामे सुरू केले आहेत. त्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसेवक, कृषी अधिकारी, तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा तयार करायचा आहे. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान किती झाले? हे पाहिले जाणार आहे. त्यानुसार भरपाई मिळणार आहे. साधारणपणे दहा दिवसांत शेतीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत. मात्र, अद्याप नदी, ओढ्यांच्या परिसरात पाणी असल्याने पंचनाम्यास अडथळा येत आहे.

महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही फारच कमी असते. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे कर्ज असो अथवा नसो, त्याला नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळाली पाहिजे.

-प्रवीण कदम (शेतकरी, इंगळी)

शेतीचे पंचनामे सुरू झाले असून, गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक हे काम करत आहेत. पिकांबरोबरच जमिनीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जाणार असून, साधारणपणे दहा दिवसांत हे काम पूर्ण होऊ शकते.

-ज्ञानदेव वाकुरे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)