शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

शेतीचे पंचनामे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुराने नुकसान झालेल्या पिकांसह जमिनीच्या पंचनाम्याचे काम बुधवारपासून सुरू झाले आहे. स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापुराने नुकसान झालेल्या पिकांसह जमिनीच्या पंचनाम्याचे काम बुधवारपासून सुरू झाले आहे. स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी हे जागेवर जाऊन पंचनामे करणार आहेत. अद्याप नदी परिसरात पाणी असल्याने पंचनाम्याच्या कामाला गती येत नसली तरी दहा दिवसांत पंचनाम्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नजर अंदाजानुसार ५८ हजार ५०० हेक्टरमधील पिके बाधित झाली असून, हजारो हेक्टर जमीन तुटून गेली आहे. हाता तोंडाला आलेली पिके गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, जगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्या समोर आहे. दरम्यान, शासनाने नुकसान झालेली पिके व जमिनीचे पंचनामे सुरू केले आहेत. त्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसेवक, कृषी अधिकारी, तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा तयार करायचा आहे. ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान किती झाले? हे पाहिले जाणार आहे. त्यानुसार भरपाई मिळणार आहे. साधारणपणे दहा दिवसांत शेतीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिलेल्या आहेत. मात्र, अद्याप नदी, ओढ्यांच्या परिसरात पाणी असल्याने पंचनाम्यास अडथळा येत आहे.

महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही फारच कमी असते. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे कर्ज असो अथवा नसो, त्याला नुकसानीच्या प्रमाणात भरपाई मिळाली पाहिजे.

-प्रवीण कदम (शेतकरी, इंगळी)

शेतीचे पंचनामे सुरू झाले असून, गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक हे काम करत आहेत. पिकांबरोबरच जमिनीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जाणार असून, साधारणपणे दहा दिवसांत हे काम पूर्ण होऊ शकते.

-ज्ञानदेव वाकुरे (जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी)