शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोला लाख रुपये खर्चल्यानंतर हातात पडले ४० हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

कोल्हापूर : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट नफा मिळवून देण्याच्या एका बाजूला सरकारी गप्पा सुरू असताना दुसरीकडे मात्र घातलेल्या खर्चाच्या ...

कोल्हापूर : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट नफा मिळवून देण्याच्या एका बाजूला सरकारी गप्पा सुरू असताना दुसरीकडे मात्र घातलेल्या खर्चाच्या निम्मी रक्कमदेखील हातात पडली नसल्याचे विदारक वास्तव टोमॅटो उत्पादकांच्या वाट्याला आले आहे. किलोचा ४ ते ५ रुपयांचा दर पाहून वाहतूक आणि तोडणीचा खर्चही निघत नसल्याने टोमॅटो काढणीच बंद केली आहे.

रेेंदाळ (ता. हातकणंगले) येथील टोमॅटो उत्पादकाचे हे प्रातिनिधिक चित्र जिल्हाभर दृष्टीस पडत आहे. कोणत्याच शेतमालाला भाव नसल्याने भाजीपाला उत्पादक हवालदिल झाला आहे. एका बाजूला खते, औषधांच्या किमती गगनाला भिडल्या असताना शेतमाल कवडीमोल दराने विकले जात असल्याने संपूर्ण अर्थचक्रच विस्कटून कर्जाचे डोंगर वाढू लागले आहेत. त्यात महापूर, अतिवृष्टी, वादळ या नैसर्गिक आपत्तींची भर पडत असल्याने धीर सुटल्यासारखी शेतकऱ्याची परिस्थिती आहे. तरीदेखील यातून तो सावरून नवनवे पर्याय शोधण्याचा प्रयत्न करीत आहे; पण बाजारातील लुटीच्या व्यवस्थेमुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

रेंदाळमधील शेतकरी राजू कोल्हापुरे यांनी एक एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली. १ रुपये २० पैसे दराने १० हजारांची रोपे लागली. १५ हजारांची तार, १५ हजारांची काठी, १० हजारांची सुतळी, मल्चिंग पेपर १० हजार, खते १० हजार, औषधे १५ हजार अशी सुरुवातीची गुंतवणूक केली. आणलेल्या तारा, सुतळी, काठी बांधण्यासाठी २० हजार रुपये खर्च आला. लागवडीनंतर एक आळवणी दोन हजार रुपये याप्रमाणे तीन आळवण्या केल्या. दोनवेळा १० हजारांच्या भांगलणी केल्या. एक फवारणी २ हजार याप्रमाणे ८ फवारण्या केल्या. टोमॅटो लागल्यानंतर तो तोडायला दोन दिवसांनी ८ मजुरांना प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे झालेल्या ८ तोड्यांना १२ हजार ८०० रुपये खर्च केला. एवढे करून तोडलेला माल ४० रुपये कॅरेट या भाड्याने बाजार समितीत पाठविला. तेथे गेलेल्या २४ कॅरेटमध्ये २ किलोची तूट, पुन्हा २ किलोची कपात करून २० किलोच्या कॅरेटला ८० रुपये हातात पडले. दोन महिने पिकाची जोपासना करून, पावसाच्या माऱ्यातून वाचवून, लाख रुपये खर्च करून अखेर बाजारात मिळालेल्या दराने उत्पादकांच्या स्वप्नांचा चिखल करून टाकला.

उत्पन्नापेक्षाही वाहतूक, तोडणीचा खर्च जास्त

टोमॅटोवर करपा, व्हायरस वाढला आहे, त्यावर फवारणीसाठी लागणाऱ्या ६० मिलिच्या एका औषधाच्या बाटलीचा दर दीड हजार रुपये आहे. एका फवारणीचा खर्च दोन हजार रुपये येत असताना एक वेळ माल पाठवला की हातात केवळ ८ हजार रुपये मिळतात. वाहतूक भाड्यापोटी ३२ हजार, तोडणीसाठी १२ हजार ८०० रुपये, असा एकूण ४४ हजार ८०० रुपये एकूण खर्च झाला. मिळालेले उत्पन्न ४० हजार इतके आहे. म्हणजेच वाहतूक आणि तोडणीचा खर्चही निघाला नाही.

माझा दहा एकर ऊस महापुरात बुडाला. निदान भाजीपाला उत्पादनातून तरी कर्जाचा डोंगर कमी होईल या अपेक्षेने लागवड केली; पण व्यवस्थेने आशेवर पाणी फिरविले. आता शेतमालाच्या बाजारपेठेचा अभ्यास करून लागवड करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नाहीतर शेतकरी असाच आतबट्ट्यात जाणार.

राजू कोल्हापुरे, टोमॅटो उत्पादक, रेंदाळ

फोटो: ११०९२०२१-कोल-टोमॅटो

फोटो ओळ : दरच नसल्याने वैतागून शेतकऱ्यांनी तोडणी बंद केल्याने लाख रुपये खर्च करून उभा केलेला रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील टोमॅटोचा प्लाॅट असा सडू लागला आहे.