शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गुढीपाडव्यानंतर सदस्य पुन्हा सहलीवर

By admin | Updated: March 26, 2017 23:41 IST

जिल्हा परिषद : विषय समितींच्या निवडींच्या पार्श्वभूमीवर दक्षता

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापती निवडी ३ एप्रिलला असल्याने गुढी पाडव्यानंतर पुन्हा एकदा सर्व सदस्यांना सहलीवर नेण्यासाठीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. जरी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड ही ३७ विरुद्ध २८ मतांनी झाली असली तरीदेखील कोणताही धोका पत्करायला नेते तयार नाहीत. गत मंगळवारी (दि. २१) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शौमिका महाडिक यांची, तर उपाध्यक्षपदी सर्जेराव पाटील यांची निवड झाली. ९ मतांनी हे दोघेही विजयी झाले; परंतु शुक्रवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, पक्षप्रतोद कार्यालय प्रवेशावेळी पक्षप्रतोद विजय भोजे अनुपस्थित राहिले. तसेच चंदगडच्या युवक क्रांती आघाडीचे दोन्ही सदस्यांनीही या कार्यक्रमावर अघोषित बहिष्कार घातला होता. त्यामुळे भाजप, शिवसेना, ताराराणी, जनसुराज्य, आवाडे गट, स्वाभिमानी, चंदगडची युवक क्रांती आघाडीच्या एकूण ३९ सदस्यांमध्ये काही मतभेद निर्माण होऊ शकतात. त्याची झलक पाहावयासही मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसही स्वस्थ बसलेली नाही. त्यांनीही यातील काही नाराज सभापती निवडीच्यावेळी हाताशी लागतात का, यासाठी चाचपणी सुरू केली आहे. दुसरीकडे आपल्याकडील कुणीही सत्तारूढांच्या हाती लागू नयेत याचीही दक्षता घेण्यासाठी सदस्यांना गुढीपाडव्यानंतर पुन्हा सहलीवर पाठविण्याचीही तयारी करण्यात आली आहे. इकडे सत्तारूढ गटानेही पुन्हा सर्व गटांशी बोलण्यासाठी सोमवारचा मुहूर्त निवडला आहे. सर्व गटांशी बोलून सव्वा सव्वा वर्षांच्या अंतराने सर्वांना पदे देऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच गरज पडली तर सत्तारूढच्या सदस्यांनाही गुढीपाडव्यानंतर पुन्हा सहलीवर नेण्याची तयारी केली आहे, तशा सूचनाही सदस्यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)