शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

बेवारस वृद्धाला केले रुग्णालयात दाखल

By admin | Updated: September 25, 2016 01:21 IST

राजारामपुरीतील मंडईसमोर प्रचीती

कोल्हापूर : न राहिला जिव्हाळा, न राहिली आपुलकी, बदलला माणूस, बदलली माणुसकी अशी स्थिती सध्या पाहावयास मिळत असताना इंटरनेटने जग जवळ आले आणि ‘माणुसकी हरवली’ आहे, असे काहीसे चित्र दिसते. मात्र, आजही माणुसकी जिवंत आहे, याचा प्रचीती शनिवारी राजारामपुरीतील मंडईसमोर आला. शहरात दोन-तीन दिवसांपासून पाउस सुरु आहे. राजारामपुरीतील भाजी मंडईसमोर एका दुकानाच्या दारात हतबल बेवारस वृद्ध चार दिवस एकाच जागी हालचाल न करता बसलेली होती. येथे भाजी खरेदीसाठी अनेकजण येतात. मात्र, कोणालाच साधी विचारपूस करण्याइतपतही वेळ नव्हता. पावसामध्ये हतबल झालेला हा बेवारस माणूस चार दिवसांपासून एकाच जागी मरणासन्न अवस्थेत बसल्याचे पाहून येथील दुकानदार व युवकांना मायेचा पाझर फुटला व त्यांनी पुढाकार घेतला. पावसात भिजल्याने या वृद्धाच्या अंगातून दुर्गंधी सुटली होती. माश्या घोंघावत होत्या. अशा अवस्थेतसुद्धा येथील दुकानदार नरसिंह साळवी, राजू सांगावकर, विजय सावंत आणि गणेश वडर यांनी वृद्धाची विचारपूस करून, त्याच्या अंगावर पांघरण्यासाठी चादर दिली, त्यास खाण्यास दिले. खायला मिळाल्याने, अंगावर ऊबदार चादर मिळाल्याने त्या वृद्धाला थोडी तरतरी आली. मात्र, तो काहीच बोलत नव्हता. अखेर त्याला रुग्णालयात नेण्याचा निर्धार करून, पोलिसांच्या मदतीने त्याला सीपीआरमध्ये नेऊन दाखल केले. या युवकांनी आजही माणुसकी टिकून आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आणून दिला. असा प्रसंग कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडू शकतो; पण तेव्हाही माणसांची गरज ही लागणारच आहे. त्यामुळे अशा प्रत्येक गरजवंताला समाजातील माणसांनी मदत केली पाहिजे. एखाद्याचा जीव वाचविणे शक्य असेल तर त्यासाठी समाजातील व्यक्तींचा पुढाकार महत्त्वाचा आहे. - नरसिंह साळवी