शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
4
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
5
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
6
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
7
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
8
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
9
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
10
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
11
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
12
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
13
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
14
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
15
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
16
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
17
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
18
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
19
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
20
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले

बेवारस वृद्धाला केले रुग्णालयात दाखल

By admin | Updated: September 25, 2016 01:21 IST

राजारामपुरीतील मंडईसमोर प्रचीती

कोल्हापूर : न राहिला जिव्हाळा, न राहिली आपुलकी, बदलला माणूस, बदलली माणुसकी अशी स्थिती सध्या पाहावयास मिळत असताना इंटरनेटने जग जवळ आले आणि ‘माणुसकी हरवली’ आहे, असे काहीसे चित्र दिसते. मात्र, आजही माणुसकी जिवंत आहे, याचा प्रचीती शनिवारी राजारामपुरीतील मंडईसमोर आला. शहरात दोन-तीन दिवसांपासून पाउस सुरु आहे. राजारामपुरीतील भाजी मंडईसमोर एका दुकानाच्या दारात हतबल बेवारस वृद्ध चार दिवस एकाच जागी हालचाल न करता बसलेली होती. येथे भाजी खरेदीसाठी अनेकजण येतात. मात्र, कोणालाच साधी विचारपूस करण्याइतपतही वेळ नव्हता. पावसामध्ये हतबल झालेला हा बेवारस माणूस चार दिवसांपासून एकाच जागी मरणासन्न अवस्थेत बसल्याचे पाहून येथील दुकानदार व युवकांना मायेचा पाझर फुटला व त्यांनी पुढाकार घेतला. पावसात भिजल्याने या वृद्धाच्या अंगातून दुर्गंधी सुटली होती. माश्या घोंघावत होत्या. अशा अवस्थेतसुद्धा येथील दुकानदार नरसिंह साळवी, राजू सांगावकर, विजय सावंत आणि गणेश वडर यांनी वृद्धाची विचारपूस करून, त्याच्या अंगावर पांघरण्यासाठी चादर दिली, त्यास खाण्यास दिले. खायला मिळाल्याने, अंगावर ऊबदार चादर मिळाल्याने त्या वृद्धाला थोडी तरतरी आली. मात्र, तो काहीच बोलत नव्हता. अखेर त्याला रुग्णालयात नेण्याचा निर्धार करून, पोलिसांच्या मदतीने त्याला सीपीआरमध्ये नेऊन दाखल केले. या युवकांनी आजही माणुसकी टिकून आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आणून दिला. असा प्रसंग कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडू शकतो; पण तेव्हाही माणसांची गरज ही लागणारच आहे. त्यामुळे अशा प्रत्येक गरजवंताला समाजातील माणसांनी मदत केली पाहिजे. एखाद्याचा जीव वाचविणे शक्य असेल तर त्यासाठी समाजातील व्यक्तींचा पुढाकार महत्त्वाचा आहे. - नरसिंह साळवी