शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बेवारस वृद्धाला केले रुग्णालयात दाखल

By admin | Updated: September 25, 2016 01:21 IST

राजारामपुरीतील मंडईसमोर प्रचीती

कोल्हापूर : न राहिला जिव्हाळा, न राहिली आपुलकी, बदलला माणूस, बदलली माणुसकी अशी स्थिती सध्या पाहावयास मिळत असताना इंटरनेटने जग जवळ आले आणि ‘माणुसकी हरवली’ आहे, असे काहीसे चित्र दिसते. मात्र, आजही माणुसकी जिवंत आहे, याचा प्रचीती शनिवारी राजारामपुरीतील मंडईसमोर आला. शहरात दोन-तीन दिवसांपासून पाउस सुरु आहे. राजारामपुरीतील भाजी मंडईसमोर एका दुकानाच्या दारात हतबल बेवारस वृद्ध चार दिवस एकाच जागी हालचाल न करता बसलेली होती. येथे भाजी खरेदीसाठी अनेकजण येतात. मात्र, कोणालाच साधी विचारपूस करण्याइतपतही वेळ नव्हता. पावसामध्ये हतबल झालेला हा बेवारस माणूस चार दिवसांपासून एकाच जागी मरणासन्न अवस्थेत बसल्याचे पाहून येथील दुकानदार व युवकांना मायेचा पाझर फुटला व त्यांनी पुढाकार घेतला. पावसात भिजल्याने या वृद्धाच्या अंगातून दुर्गंधी सुटली होती. माश्या घोंघावत होत्या. अशा अवस्थेतसुद्धा येथील दुकानदार नरसिंह साळवी, राजू सांगावकर, विजय सावंत आणि गणेश वडर यांनी वृद्धाची विचारपूस करून, त्याच्या अंगावर पांघरण्यासाठी चादर दिली, त्यास खाण्यास दिले. खायला मिळाल्याने, अंगावर ऊबदार चादर मिळाल्याने त्या वृद्धाला थोडी तरतरी आली. मात्र, तो काहीच बोलत नव्हता. अखेर त्याला रुग्णालयात नेण्याचा निर्धार करून, पोलिसांच्या मदतीने त्याला सीपीआरमध्ये नेऊन दाखल केले. या युवकांनी आजही माणुसकी टिकून आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आणून दिला. असा प्रसंग कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात घडू शकतो; पण तेव्हाही माणसांची गरज ही लागणारच आहे. त्यामुळे अशा प्रत्येक गरजवंताला समाजातील माणसांनी मदत केली पाहिजे. एखाद्याचा जीव वाचविणे शक्य असेल तर त्यासाठी समाजातील व्यक्तींचा पुढाकार महत्त्वाचा आहे. - नरसिंह साळवी