शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघावर प्रशासक येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST

राजाराम लोंढे, लाेकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर ; शेतकरी संघाचे पाच संचालकाचे निधन तर तीन संचालक अपात्र ठरले असून दोन ...

राजाराम लोंढे, लाेकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर ; शेतकरी संघाचे पाच संचालकाचे निधन तर तीन संचालक अपात्र ठरले असून दोन संचालक गेली दीड वर्षे संघाच्या कामकाजात भागच घेत नाहीत. त्यामुळे संघाचे संचालक मंडळच अल्पमतात आल्याने प्रशासक नेमण्याबाबत सहकार विभागात हालचाली गतिमान झाल्या आहेत.

शेतकरी संघाची २०१५-१६ मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली होती. यामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जनसुराज्य पक्षाने सत्ता कायम राखली. संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर सुरुवातीच्या काळात कारभारात सुधारणा झाल्या, मात्र त्यानंतर हळूहळू चुकीचा कारभार चर्चेत राहिला. गेली पाच वर्षे शाखांतील अपहाराने संचालकांच्या विश्वासार्तसमोर प्रश्न निर्माण झाला. एकीकडे अपहाराचा विषय असताना युवराज पाटील, एम. एम. पाटील, मानसिंग पाटील यांना भूविकास बँकेच्या थकबाकीपोटी सहकार विभागाने अपात्र ठरवल्याने अठरा पैकी १५ जणांचे संचालक मंडळ राहिले. त्याचबरोबर गेल्या चार वर्षात दिलीपसिंह पाटील, सुमित्रादेवी शामराव शिंदे, शोभनादेवी नेसरीकर, शांताप्पाण्णा चौगले व बाबासाहेब पाटील-भुयेकर या पाच संचालकांचे निधन झाले. त्यामुळे सध्या कागदोपत्री दहा संचालक असले तरी दोन ज्येष्ठ संचालक गेली वर्ष-दीड वर्ष संघाच्या कारभारातच भाग घेत नाहीत. एक ज्येष्ठ संचालक गेली दोन महिने संघाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे संचालक मंडळ अल्पमतात आल्याने संघावर प्रशासक नेमण्याच्या हालचाली सहकार विभागात सुुरू झाल्या आहेत. संघाच्या कारभाराने नेत्यांचीही बदनामी झाल्याने येथे प्रशासक आणून कारभाराला शिस्त लावण्याबाबत नेत्यांच्या पातळीवरही विचार सुरु आहे.

कारवाई करता येईना

सलग तीन संचालक मंडळाच्या बैठकीला संचालक अनुपस्थित राहिला तर त्याचे पद अपोआपच रद्द होते. सहकार नियमानुसार दोन संचालक अपात्र ठरत आहेत, विशेष म्हणजे ते विरोधी संचालक असतानाही अल्प मताच्या भितीने सत्तारुढ गट त्यांच्यावर कारवाई करत नाही.

स्वीकृत संचालक न घेतल्याचा फटका

तीन संचालक अपात्र ठरल्यानंतर त्यांच्या ठिकाणी स्वीकृत संचालक घेण्याची संधी सत्तारूढ गटाला होती. मात्र दुर्लक्ष केल्याचा फटका बसला आहे.

अशासकीय मंडळाचा प्रयोग होऊ शकतो

विद्यमान संचालक मंडळामुळे नेत्यांची बदनामी झाल्याने सहकार कायद्याचा आधार घेऊन त्यांना घरी पाठवायचे आणि त्यांच्या ठिकाणी अशासकीय मंडळ आणता येते का? याचीही चाचपणी सुरु आहे. मात्र त्यापेक्षा प्रशासक आणून संघाच्या रोडावलेल्या बैलाला ताकद देता येते का? असा विचारही पुढे येत आहे.