शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

व्यसन, संशयावरून मारहाणीच्या तक्रारी : ‘महिला दक्षता’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:23 IST

नवऱ्याला दारूचे व्यसन आणि चारित्र्याचा संशय यावरून आजही महिलांचा मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे महिलेला कायदेशीर मदत, स्वावलंबी होण्यासाठी सर्वतोपरी मदत

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : नवऱ्याला दारूचे व्यसन आणि चारित्र्याचा संशय यावरून आजही महिलांचा मोठ्या प्रमाणात शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे चित्र आहे. महिला दक्षता समितीकडे वर्षभरात दाद मागण्यासाठी आलेल्या १५० पैकी ९० महिलांची ही तक्रार आहे.

कोल्हापुरातील महिला दक्षता समिती ही अन्यायग्रस्त महिलांना आधार देणे, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करणे, पती, पत्नी कुटुंबीयांचे समुपदेशन करणे, तडजोड घडवून आणणे आणि शक्य नसेल तर महिलेला कायदेशीर मदत करणे, तिला स्वावलंबी होण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे काम करते. समितीकडे महिन्याकाठी सरासरी १५ महिला तक्रार दाखल करतात. त्यांपैकी १० ते १२ तक्रारी या कौटुंबिक छळाच्या असतात. तक्रारीतील तीन ते चार प्रकरणांमध्ये तडजोड होण्यात यश मिळते. बाकी प्रकरणात मग पोटगी, घटस्फोट, पोलीस केस अशी कार्यवाही करावी लागते. काही प्रकरणे वर्षानुवर्षे मिटत नाहीत.

दाखल झालेल्या तक्रारींत लग्नात मानपान झाला नाही, मुलीला कामे करता येत नाहीत, नवरा दारू पिऊन येतो, कामधंदा करत नाही, मी कामाला जाते तर संशयावरून मारहाण करतो, लहान वयात लग्न झाले, घर सोडून आले तर नवरा धमकी देतोय, मूल होत नाही म्हणून औषधोपचारासाठी माहेरच्यांकडे पैशांची मागणी, पहिल्या नवºयापासून झालेले मूल सांभाळायला नवरा तयार नाही, माहेरचा आधार नाही, कुटुंबातीलच अन्य पुरुषांकडून लैंगिक शोषणाचा प्रयत्न, लैंगिक अत्याचार अशा अनेक प्रकारच्या गुंतागुंतीच्या, संयमाचा कस बघणाºया आणि खºया अर्थाने जगण्याचा संघर्ष कराव्या लागणाºया बाबींचा समावेश असतो.आई, सासू,नणंदेची लुडबुडअनेक प्रकरणांमध्ये पती-पत्नीमध्ये वाद नसतो; पण मुलीची आई, सासू आणि सासर सोडून आलेली नणंद यांच्यामुळे संसार मोडल्याच्या केसेस येतात. माहेरच्या मंडळींची मुलीच्या संसारातील लुडबुड, नको ते सल्ले आणि सासू, नणंदेकडून जाणीवपूर्वक दिला जाणारा त्रास हे या कलहाचे मुख्य कारण असते, असे महिला दक्षता समितीच्या सदस्या अनुराधा मेहतायांनी सांगितले.अल्पवयीन विवाह आणि नात्याविषयी गैरसमजसमितीकडे दाखल होणाºया ६० टक्के तक्रारी गरीब, शिक्षणाचा अभाव असलेल्या कुटुंबांतील महिलांच्या असतात. पालक ओझं कमी करायचं म्हणून मुलगी तेरा-चौदा वर्षांची असतानाच लग्न करून देतात; तर ‘घरात राबायला एक स्त्री आणणं’ एवढीच सासरची मानसिकता असते. पती-पत्नीचे प्रेमळ समजुतीचे नाते, सहजीवन, एकमेकांची साथ, कुटुंबाकडून मुलीचा स्वीकार, लग्न म्हणजे काय हेच माहीतच नसल्याने छळवणूक होते. काही प्रकरणांत लहान मुलांना छळवणुकीचे हत्यार केले जाते. मुले आईपासून दूर केली जातात.पोलिसांचा वाईट अनुभवहे काम करताना समितीच्या सदस्यांना व तक्रार दाखल करणाºया महिलांना पोलिसांकडूनच खूप वाईट अनुभव येतो. पोलीस तक्रार घ्यायला टाळतात. तक्रार घेतलीच तर नवºयावर कारवाई करण्याऐवजी महिलेलाच ‘नसत्या भानगडीत पडू नको’ म्हणत न्यायालयात जाण्याचा सल्ला देतात.आर्थिक फायदा होणार असेल तर प्रकरणात लक्ष घातले जाते. एखादाच संवेदनशील पोलीस मनापासून काम करतो; अन्यथा पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा खूप वाईट अनुभव असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. 

महिला पुढारलेल्या असल्याचे समाजात चित्र दिसत असले तरी त्याची दुसरी बाजू अत्यंत भयावह आहे. त्यामुळे पालकांनी मुलीला शिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केल्याशिवाय लग्नाची घाई करू नये. मुला-मुलींच्या अपेक्षा, विवाहपूर्व समुपदेशन, लैंगिक शिक्षणाविषयी जागरूक राहिले पाहिजे.- तनुजा शिपूरकर, सदस्या, महिला दक्षता समिती