शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

सातत्य न राखणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई

By admin | Updated: October 13, 2015 00:12 IST

निर्मलग्राम योजना : बक्षीस रक्कम काढून घेणार; हातकणंगलेत बहुसंख्य ग्रामपंचायतींना कागदोपत्री पुरस्कार

दत्ता बीडकर - हातकणंगले-भागात स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी २ आॅक्टोबरला झालेल्या ग्रामसभेमध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याचा आणि निर्मलग्राम योजनेत सातत्य राखणार नाहीत, त्या ग्रामपंचायतींवर कारवाई करून बक्षीस रक्कम काढून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी राज्य शासनाचा निर्मलग्राम पुरस्कार कागदोपत्री मिळविला आहे. २००७ पासून गावेच्या गावे निर्मलग्रामच्या पाठीमागे लागली होती. पहाटेपासून शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. गुड मॉर्निंग पथकापासून दिवसाची सुरुवात होत होती. यासाठी शाळा, कॉलेज, तरुण मंडळांचे कार्यकर्ते झाडून कामाला लागले होते. काही काही गावांमध्ये गांधीगिरी करण्याची वेळ शिक्षक आणि शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवर आली होती. ग्रामस्थ, ग्रामपंचायती आणि तालुका पंचायत समिती या सर्व यंत्रणा निर्मलग्रामसाठी झटत होत्या. निर्मलग्राम कमिटीचे स्वागत, त्याची ऐट हा एक चर्चेचा विषय झाला होता. यातून गावे निर्मलग्राम झाली होती.निर्मलग्राम गावांनी तीन लाखांपासून दहा लाखापर्यंत केंद्र व राज्य शासनाकडून बक्षीस मिळविले होते. ही बक्षिसाची रक्कम गावे निर्मलग्राम करण्यासाठी खर्च करणे क्रमप्राप्त असताना ग्रामपंचायतींनी ही रक्कम विकासकामांसाठी खर्च केल्यामुळे गावे आहेत तशीच राहिली. निर्मलग्रामची संकल्पना मागे पडली. पुन्हा राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावे हागणदारीमुक्ती करण्यासाठी कंबर कसली आहे.१५ आॅगस्ट आणि २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये जिल्हा प्रशासनाने नव्या जोमाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि हागणदारीमुक्त गाव योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तालुकास्तरावर पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांना आदेश देऊन जी गावे यापूर्वी निर्मलग्राम झाली आहेत त्यांनी या योजनेमध्ये सातत्य राखले पाहिजे, अन्यथा त्याची बक्षिसाची रक्कम शासन काढून घेऊन कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतींना दिला आहे.या निर्णयामुळे ग्रामपंचायती हागणदारीमुक्तीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी धडपडत आहेत. शासनाने अंगणवाडी सेविकामार्फत २0१२-२0१३मध्ये प्रत्येक गावातील शौचालयाचा सर्व्हे पूर्ण केला आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांसाठी शौचालय बांधकामाकरिता १२ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही कुटुंबे अद्यापही शौचालय बांधण्यासाठी तयार नाहीत. यामुळे हतबल झालेल्या प्रशासनाने अशा कुटुंबांच्या नागरी सुविधा बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. पंचायत समितीचे प्रयत्नहागणदारीमुक्त आणि निर्मलग्राम योजनेबाबत गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांच्याशी संपर्क साधला असता, हागणदारीमुक्त गाव ही वेगळी संकल्पना आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला दिले जाते. निर्मलग्राम ही केंद्र सरकारची योजना आहे. अद्याप तालुक्यातील कबनूर, कोरोची, रुकडी, माणगाव, हेरले, आळते, जुने पारगाव ही सात गावे निर्मलग्राम झाली नाहीत. यामुळे तालुका निर्मलग्राम झालेला नाही. त्यासाठी पंचायत समितीचे प्रयत्न सुरू असल्याचे मत व्यक्त केले.४१५ आॅगस्टला कोरोची आणि जुने पारगाव ही दोन गावे हागणदारीमुक्त झाली; पण वरील सात निर्मलग्राम न झालेल्या गावांमध्ये या गावांचा समावेश सर्वांना आश्चर्य वाटणारा आहे.