शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

सातत्य न राखणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई

By admin | Updated: October 13, 2015 00:12 IST

निर्मलग्राम योजना : बक्षीस रक्कम काढून घेणार; हातकणंगलेत बहुसंख्य ग्रामपंचायतींना कागदोपत्री पुरस्कार

दत्ता बीडकर - हातकणंगले-भागात स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी २ आॅक्टोबरला झालेल्या ग्रामसभेमध्ये तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्याचा आणि निर्मलग्राम योजनेत सातत्य राखणार नाहीत, त्या ग्रामपंचायतींवर कारवाई करून बक्षीस रक्कम काढून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतींनी राज्य शासनाचा निर्मलग्राम पुरस्कार कागदोपत्री मिळविला आहे. २००७ पासून गावेच्या गावे निर्मलग्रामच्या पाठीमागे लागली होती. पहाटेपासून शासकीय यंत्रणा कामाला लागली होती. गुड मॉर्निंग पथकापासून दिवसाची सुरुवात होत होती. यासाठी शाळा, कॉलेज, तरुण मंडळांचे कार्यकर्ते झाडून कामाला लागले होते. काही काही गावांमध्ये गांधीगिरी करण्याची वेळ शिक्षक आणि शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवर आली होती. ग्रामस्थ, ग्रामपंचायती आणि तालुका पंचायत समिती या सर्व यंत्रणा निर्मलग्रामसाठी झटत होत्या. निर्मलग्राम कमिटीचे स्वागत, त्याची ऐट हा एक चर्चेचा विषय झाला होता. यातून गावे निर्मलग्राम झाली होती.निर्मलग्राम गावांनी तीन लाखांपासून दहा लाखापर्यंत केंद्र व राज्य शासनाकडून बक्षीस मिळविले होते. ही बक्षिसाची रक्कम गावे निर्मलग्राम करण्यासाठी खर्च करणे क्रमप्राप्त असताना ग्रामपंचायतींनी ही रक्कम विकासकामांसाठी खर्च केल्यामुळे गावे आहेत तशीच राहिली. निर्मलग्रामची संकल्पना मागे पडली. पुन्हा राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावे हागणदारीमुक्ती करण्यासाठी कंबर कसली आहे.१५ आॅगस्ट आणि २ आॅक्टोबरच्या ग्रामसभेमध्ये जिल्हा प्रशासनाने नव्या जोमाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान आणि हागणदारीमुक्त गाव योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. तालुकास्तरावर पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांना आदेश देऊन जी गावे यापूर्वी निर्मलग्राम झाली आहेत त्यांनी या योजनेमध्ये सातत्य राखले पाहिजे, अन्यथा त्याची बक्षिसाची रक्कम शासन काढून घेऊन कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतींना दिला आहे.या निर्णयामुळे ग्रामपंचायती हागणदारीमुक्तीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी धडपडत आहेत. शासनाने अंगणवाडी सेविकामार्फत २0१२-२0१३मध्ये प्रत्येक गावातील शौचालयाचा सर्व्हे पूर्ण केला आहे. शौचालय नसलेल्या कुटुंबांसाठी शौचालय बांधकामाकरिता १२ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही कुटुंबे अद्यापही शौचालय बांधण्यासाठी तयार नाहीत. यामुळे हतबल झालेल्या प्रशासनाने अशा कुटुंबांच्या नागरी सुविधा बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. पंचायत समितीचे प्रयत्नहागणदारीमुक्त आणि निर्मलग्राम योजनेबाबत गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांच्याशी संपर्क साधला असता, हागणदारीमुक्त गाव ही वेगळी संकल्पना आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला दिले जाते. निर्मलग्राम ही केंद्र सरकारची योजना आहे. अद्याप तालुक्यातील कबनूर, कोरोची, रुकडी, माणगाव, हेरले, आळते, जुने पारगाव ही सात गावे निर्मलग्राम झाली नाहीत. यामुळे तालुका निर्मलग्राम झालेला नाही. त्यासाठी पंचायत समितीचे प्रयत्न सुरू असल्याचे मत व्यक्त केले.४१५ आॅगस्टला कोरोची आणि जुने पारगाव ही दोन गावे हागणदारीमुक्त झाली; पण वरील सात निर्मलग्राम न झालेल्या गावांमध्ये या गावांचा समावेश सर्वांना आश्चर्य वाटणारा आहे.