शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

देशात ‘अब की बार, सिर्फ रोजगार’ ही चळवळ उभारली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:27 IST

येथील श्रमिक प्रतिष्ठानच्या कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला-२०१९ मधील व्याख्यानांच्या ‘भारतावरील आर्थिक संकट’ या डॉ. मेघा पानसरे संपादित पुस्तकाचे ...

येथील श्रमिक प्रतिष्ठानच्या कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला-२०१९ मधील व्याख्यानांच्या ‘भारतावरील आर्थिक संकट’ या डॉ. मेघा पानसरे संपादित पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी अर्थतज्ज्ञ अभ्यंकर यांचे ‘बेरोजगारी - भारतापुढील मोठे संकट’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील होते. देशात मनुष्यबळ, तंत्रज्ञान, नैसर्गिक साधन स्रोत आहेत; परंतु अल्पशिक्षित, शिक्षित व उच्च शिक्षित अशा सर्वस्तरातील तरुण बेरोजगार आहेत. त्यांच्या सर्व क्षमता वाया जात आहेत. शिक्षण व्यवस्था, विकास, रोजगार यातील सांधा निखळलेला आहे. त्यामुळे देशातील विकासाचे सर्व प्रकल्प कोसळतात. सर्व सरकारी गुंतवणूक वाया जात आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या हातातील खरेदी शक्ती वाढवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना जास्त हमीभाव देणे, कंत्राटीकरण व कामगारविरोधी कायदे रद्द करणे आणि सर्व क्षेत्रातील शिक्षित-अशिक्षित लोकांसाठी, विशेषत: तरुणांसाठी ‘रोजगार हमी योजना’ राबविण्याचा उपाय अत्यावश्यक असल्याचे अर्थतज्ज्ञ अभ्यंकर यांनी सांगितले. यावेळी समाज विज्ञान अकादमी या संस्थेचे दत्ता देसाई , ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. श्रीनिवास खांदेवाले, लेखक प्रा. मारोती तेगमपुरे, डॉ. करमसिंग राजपूत, मुक्ता मनोहर, पुणे कलेक्टिवचे साहिल कल्लोळी उपस्थित होते. डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. श्रमिक प्रतिष्ठानचे विश्वस्त सदस्य एस. बी. पाटील यांनी आभार मानले. रसिया पडळकर यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

गरिबी, भाववाढीवर मात करता येते

आज राज्यव्यवस्था चालवण्यासाठी शासन हे विचारांच्या भांडवलापेक्षा पैशाच्या भांडवलाला महत्त्व देत आहे. बेरोजगारीच्या प्रश्नाची सोडवणूक केल्यास देशातील गरिबी, भाववाढ, विषमता या सर्व प्रश्नांवर मात करता येते, असे डॉ. जे. एफ. पाटील यांनी सांगितले.

फोटो (२२०८२०२१-कोल-अभ्यंकर व्याख्यान) : कोल्हापुरातील श्रमिक प्रतिष्ठानतर्फे रविवारी ज्येष्ठ मार्क्सवादी विचारवंत अजित अभ्यंकर यांचे ऑनलाईन व्याख्यान झाले. यावेळी डॉ. मेघा पानसरे, रसिया पडळकर, मारोती तेगमपुरे, जे. एफ. पाटील, श्रीनिवास खांदेवाले उपस्थित होते.