शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

राज्यातील आम आदमी विमा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क : राधानगरी : राज्यातील सर्वसामान्य लोकांना अडचणीच्या काळात आधार ठरणारी २००८ मध्ये सुरू झालेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क :

राधानगरी : राज्यातील सर्वसामान्य लोकांना अडचणीच्या काळात आधार ठरणारी २००८ मध्ये सुरू झालेली आम आदमी विमा योजना बंद पडली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने सुरू केलेल्या या योजनेचे २०१४ मध्ये सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना शासनाने नूतनीकरण केलेले नाही. मात्र याची लोकांना माहिती नसल्याने भरपाईचे दावे दाखल होत आहेत.

विम्यापासून दूर असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास त्या कुटुंबाची घडीच विस्कटते. आर्थिक संकटामुळे कुटुंबाची वाताहत होते. अशावेळी काही प्रमाणात मदत व्हावी यासाठी १ मार्च २००८ पासून ही आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली होती. भारतीय जीवन विमा निगमकडे शासनाने ही समूह विमा पॉलिसी सुरू केली. यासाठी असणारा नाममात्र हप्ता राज्य शासन भरत होते.

ग्रामीण-शहरी भागातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातील पती-पत्नी याचे लाभधारक होते. विमा महामंडळाच्या सातारा विभागीय कार्यालयाकडे याची जबाबदारी होती. प्रत्येक तहसील कार्यालयाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. यातील लाभार्थी याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना ७५ हजार,एखादा हात, पाय, डोळा निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये व ६० वयानंतर नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार अशी मदत मिळत होती. यात समावेश झालेल्या लोकांना विमा कंपनीकडून प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत.

दहा वर्षात अनेक कुटुंबांना याचा लाभ झाला. अजूनही लोक यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करून देत आहेत. मात्र दोन वर्षापासून याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत चौकशी केल्यावर, ही योजना बंद पडल्याचे समोर आले. १ मार्च २०१८ पासून शासनाने याचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे यातील मृत्यू दावे देता येणार नाहीत, असे पत्र व प्रलंबित असलेले प्रस्ताव भारतीय जीवन विमाच्या सातारा शाखा व्यवस्थापक यांनी तहसील कार्यालयांना परत पाठविले आहेत.

ठळक-

केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर पंतप्रधान विमा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना बंद केली असे सांगण्यात येते. मात्र यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. या खात्यातून वर्षाला किमान १२ रुपये वर्ग होतील, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सरसकट लोकांना याचा फायदा होणार नाही.