शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

राज्यातील आम आदमी विमा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क : राधानगरी : राज्यातील सर्वसामान्य लोकांना अडचणीच्या काळात आधार ठरणारी २००८ मध्ये सुरू झालेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क :

राधानगरी : राज्यातील सर्वसामान्य लोकांना अडचणीच्या काळात आधार ठरणारी २००८ मध्ये सुरू झालेली आम आदमी विमा योजना बंद पडली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने सुरू केलेल्या या योजनेचे २०१४ मध्ये सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना शासनाने नूतनीकरण केलेले नाही. मात्र याची लोकांना माहिती नसल्याने भरपाईचे दावे दाखल होत आहेत.

विम्यापासून दूर असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास त्या कुटुंबाची घडीच विस्कटते. आर्थिक संकटामुळे कुटुंबाची वाताहत होते. अशावेळी काही प्रमाणात मदत व्हावी यासाठी १ मार्च २००८ पासून ही आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली होती. भारतीय जीवन विमा निगमकडे शासनाने ही समूह विमा पॉलिसी सुरू केली. यासाठी असणारा नाममात्र हप्ता राज्य शासन भरत होते.

ग्रामीण-शहरी भागातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातील पती-पत्नी याचे लाभधारक होते. विमा महामंडळाच्या सातारा विभागीय कार्यालयाकडे याची जबाबदारी होती. प्रत्येक तहसील कार्यालयाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. यातील लाभार्थी याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना ७५ हजार,एखादा हात, पाय, डोळा निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये व ६० वयानंतर नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार अशी मदत मिळत होती. यात समावेश झालेल्या लोकांना विमा कंपनीकडून प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत.

दहा वर्षात अनेक कुटुंबांना याचा लाभ झाला. अजूनही लोक यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करून देत आहेत. मात्र दोन वर्षापासून याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत चौकशी केल्यावर, ही योजना बंद पडल्याचे समोर आले. १ मार्च २०१८ पासून शासनाने याचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे यातील मृत्यू दावे देता येणार नाहीत, असे पत्र व प्रलंबित असलेले प्रस्ताव भारतीय जीवन विमाच्या सातारा शाखा व्यवस्थापक यांनी तहसील कार्यालयांना परत पाठविले आहेत.

ठळक-

केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर पंतप्रधान विमा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना बंद केली असे सांगण्यात येते. मात्र यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. या खात्यातून वर्षाला किमान १२ रुपये वर्ग होतील, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सरसकट लोकांना याचा फायदा होणार नाही.