शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आम आदमी विमा योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क : राधानगरी : राज्यातील सर्वसामान्य लोकांना अडचणीच्या काळात आधार ठरणारी २००८ मध्ये सुरू झालेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क :

राधानगरी : राज्यातील सर्वसामान्य लोकांना अडचणीच्या काळात आधार ठरणारी २००८ मध्ये सुरू झालेली आम आदमी विमा योजना बंद पडली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने सुरू केलेल्या या योजनेचे २०१४ मध्ये सत्तेवर असलेल्या भाजप-शिवसेना शासनाने नूतनीकरण केलेले नाही. मात्र याची लोकांना माहिती नसल्याने भरपाईचे दावे दाखल होत आहेत.

विम्यापासून दूर असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास त्या कुटुंबाची घडीच विस्कटते. आर्थिक संकटामुळे कुटुंबाची वाताहत होते. अशावेळी काही प्रमाणात मदत व्हावी यासाठी १ मार्च २००८ पासून ही आम आदमी विमा योजना सुरू करण्यात आली होती. भारतीय जीवन विमा निगमकडे शासनाने ही समूह विमा पॉलिसी सुरू केली. यासाठी असणारा नाममात्र हप्ता राज्य शासन भरत होते.

ग्रामीण-शहरी भागातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबातील पती-पत्नी याचे लाभधारक होते. विमा महामंडळाच्या सातारा विभागीय कार्यालयाकडे याची जबाबदारी होती. प्रत्येक तहसील कार्यालयाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. यातील लाभार्थी याचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना ७५ हजार,एखादा हात, पाय, डोळा निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये व ६० वयानंतर नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार अशी मदत मिळत होती. यात समावेश झालेल्या लोकांना विमा कंपनीकडून प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत.

दहा वर्षात अनेक कुटुंबांना याचा लाभ झाला. अजूनही लोक यासाठीच्या कागदपत्रांची पूर्तता करून देत आहेत. मात्र दोन वर्षापासून याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे याबाबत चौकशी केल्यावर, ही योजना बंद पडल्याचे समोर आले. १ मार्च २०१८ पासून शासनाने याचे नूतनीकरण केलेले नाही. त्यामुळे यातील मृत्यू दावे देता येणार नाहीत, असे पत्र व प्रलंबित असलेले प्रस्ताव भारतीय जीवन विमाच्या सातारा शाखा व्यवस्थापक यांनी तहसील कार्यालयांना परत पाठविले आहेत.

ठळक-

केंद्रात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यावर पंतप्रधान विमा योजना सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही योजना बंद केली असे सांगण्यात येते. मात्र यासाठी बँक खाते असणे आवश्यक आहे. या खात्यातून वर्षाला किमान १२ रुपये वर्ग होतील, त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सरसकट लोकांना याचा फायदा होणार नाही.