शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

बिद्री कारखान्याचे ९ लाख मे. टन ऊसगाळप करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सरवडे : बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ११ लाख टनांवर ऊस उपलब्ध असून, यावर्षी कारखाना ९ लाख ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सरवडे : बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ११ लाख टनांवर ऊस उपलब्ध असून, यावर्षी कारखाना ९ लाख मे. टन ऊसगाळप करेल, असा आत्मविश्वास कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांनी व्यक्त केला. आधुनिकीकरणाची सर्व कामे पूर्ण करून येत्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गळितास सुरुवात करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ च्या गळीत हंगामासाठीच्या रोलर पूजनप्रसंगी ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. याप्रसंगी पाटील यांच्या हस्ते रोलरचे पूजन करून येत्या गळीत हंगामाच्या मशिनरी जोडणीस प्रारंभ करण्यात आला.

अध्यक्ष पुढे म्हणाले, कारखान्याने गेल्या हंगामात गाळप केलेल्या ६ लाख ८० हजार ४२६ मे.टन उसाला एफआरपी रु. ३ हजार ७५ रुपये प्रमाणे २०९ कोटी रुपये संपूर्णपणे अदा केली आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिटिन ४५०० मे. टनांवरून ७५०० मे. टनांपर्यंत वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कारखान्याच्या पूर्वीच्या जवळपास ७० टक्के जुन्या मशिनरी बदलून नवीन बसविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प उभारणीदेखाल लवकरच सुरुवात करणार आहोत. उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे, संचालक सर्वश्री ए. वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, गणपती फराकटे, प्रविणसिंह पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदूम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रवीण भोसले, मधुकर देसाई, के. ना. पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदीप पाटील, जगदीश पाटील, सुनीलराज सूर्यवंशी, विकास पाटील, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

फोटो : बिद्री (ता. कागल) येथील श्री. दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन करताना अध्यक्ष के. पी. पाटील, सर्व संचालक व अधिकारी.

छाया - चांदेकर फोटो, बिद्री