शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

शिरोळ तालुक्यात खरिपाची ८३ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:16 IST

संदीप बावचे : जयसिंगपूर जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने खरीप हंगामातील पिकांची जवळपास ८३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. ...

संदीप बावचे : जयसिंगपूर

जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्याने खरीप हंगामातील पिकांची जवळपास ८३ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ४०० हेक्टर सोयाबीनच्या पिकात वाढ झाली आहे. दरम्यान, सरासरी ७२ मिलिमीटर पावसाची जून महिन्यात नोंद झाली आहे.

कृष्णेसह, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या चार नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम सुफलाम असला तरी महापूर, कोरोना महामारी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. महापुरामुळे नदीकाठची शेती पिकवायची की नाही, अशा द्विधा मन:स्थितीत असलेल्या शेतकऱ्याला गतवर्षी दिलासा मिळाला. महापुराचे संकट टळले. मात्र, कोरोना विषाणूच्या महामारीने नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभारले. भाजीपाला, फुलशेती शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. यंदाही कोरोनाचे संकट आले. त्यातूनही मार्गक्रमण करीत शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीकडे व्यस्त झाला.

तालुक्यात यंदा भात ४३.५० हेक्टर, मका ८९, मूग ५४, उडीद ११०, भुईमूग १२८०, सोयाबीन १२०९, भाजीपाला ११८ तर, आडसाली ऊस ६६३ हेक्टरची पेरणी झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला जास्त पसंती दिली आहे. त्यामुळे यंदा ३०० ते ४०० हेक्टर ज्यादा सोयाबीनची पेरणी झाली आहे. गतवर्षी अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतीपिकाला फटका बसला होता. यंदा जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पेरणीसाठी पोषक वातावरण झाले आहे. सध्या पावसाने उसंती दिल्याने पेरणीला वेग आला आहे. तालुक्यात ८३ टक्के पेरण्या झाल्याचा अहवाल कृषी विभागाने दिला.

कोट - तालुक्यात ८३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा सोयाबीन पिकाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. सध्या कृषी संजीवनी सप्ताह सुरू असून २२ शेतीशाळा सुरू आहेत. यामधून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे.

- गणेश भोसले, तालुका कृषी अधिकारी

फोटो - २८०६२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - शिरोळ तालुक्यातील शिरोळ-अर्जुनवाड मार्गावरील शेतकऱ्याने भुईमुगाचे घेतलेले पीक (छाया - सुभाष गुरव, शिरोळ)