शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

सात वर्षांत ७६० मृतांच्या वारसांना लाभ

By admin | Updated: July 4, 2015 00:21 IST

शेतकरी जनता अपघात विमा योजना : कृषी विभागातर्फे जनजागृती; अल्प प्रतिसाद

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -शासनाच्या शेतकरी जनता अपघात विमा योजनेतून सात वर्षांत जिल्ह्यातील विविध अपघातांत मृत ७६० शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मिळाले आहेत. आवश्यक कागदपत्रे गोळा करून प्रस्ताव देण्याकडे अनेक शेतकऱ्यांचे वारस दुर्लक्ष करीत असतात. परिणामी वारसांना पैसे मिळत नाहीत; म्हणून कृषी विभाग ही योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शासनाच्या कृषी विभागाने २४ जून रोजी आणखी एक शेतकरी अपघात विमा योजना जाहीर केली आहे. या योजनेत शेतकऱ्याचा विमा हप्ता वार्षिक बारा रुपये असून तो शासन भरणार आहे. विम्याची नवी योजना जाहीर केल्यानंतर पूर्वीच्या अपघात विमा योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला, याची माहिती ‘लोकमत’ने घेतली. त्यावेळी पूर्वीच्या अपघात विमा योेजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे.अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विजेचा धक्का लागणे, नैसर्गिक आपत्ती आणि वाहन अपघात यांमुळे शेतकऱ्यांंचा मृत्यू होतो. काही शेतकऱ्यांना अपंगत्व येते. कर्त्या व्यक्तीचा मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास संबंधित कुटुंब उघड्यावर पडते. त्यांना आर्थिक मदत व्हावी, म्हणून शेतकरी मृत झाल्यास त्याच्या वारसांना किंवा अपंगत्व आल्यास त्या शेतकऱ्याला शासनाचा कृषी विभाग तसेच विविध कंपन्यांच्या माध्यमातून पैसे दिले जातात. त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा विमा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही. नैसर्गिक अथवा अपघातात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाला एक लाख, दोन डोळे, दोन अवयव, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाख, एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास ५० हजार रुपये दिले जातात. पूर्वीचे अपंगत्व, आत्महत्या, आत्महत्येचा प्रयत्न, वाहन परवाना नसताना वाहन चालविताना अपघाती मृत्यू झाल्यास, अमली पदार्थांच्या सेवनात मृत्यू झाल्यास, नैसर्गिक मृत्यू, भ्रमिष्टपणा, शर्यतीतील अपघात, सैन्यात नोकरीवर असताना, जवळच्या नातेवाइकांकडून झालेला खून झाल्यास वारसास विम्याचे पैसे मिळत नाहीत.अपघात विमा योजना चांगली आहे. ज्यांना लाभ घ्यावयाचा आहे, त्यांनी गावातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी किंवा कृषी कार्यालयात संपर्क साधावा. अधिकाधिक शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा याचा लाभ घ्यावा. - मोहन आटोळे, जिल्हा कृषी अधिकारीलाभासाठी आवश्यक कागदपत्रे१० ते ७५ वर्षे वयोगटातील शेतकरी असल्याचा दाखला, सात-बारा, आठ अ, सहा-ड फेरफार उतारा, सहा क वारसा नोंद उतारा, प्रतिज्ञापत्र, वयाचा पुरावा, ‘एफआर’ची प्रत, घटनास्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यू प्रमाणपत्र, अपंगत्व आल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचा दाखला, बँक खाते क्रमांक. आकडे बोलतात...वर्षनिहाय एक लाख रुपये मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या अशी पुढीलप्रमाणे : सन २००८-०९ : १०१, २००९-१० : १३२, २०१०-११ : १५८, २०११-१२ : ११३, २०१२-१३ : १३९, २०१३-१४ : १०५, २०१४-१५ : १२ शेतकरी.