शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

निपाणी परिसरात संततधार, ७ बंधारे पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST

निपाणी : गेल्या दोन दिवसांपासून निपाणी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने निपाणी व चिकोडी तालुक्यातील ७ बंधारे पाण्याखाली गेले ...

निपाणी : गेल्या दोन दिवसांपासून निपाणी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने निपाणी व चिकोडी तालुक्यातील ७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. २०१९ साली आलेल्या पुरातून अद्याप पूरग्रस्त सावरलेले नाहीत. जूनच्या मध्यातच पावसाने जोर धरल्याने भीती निर्माण झाली आहे.

२०१९ साली आलेल्या महापुराने निपाणी तालुक्यातील २६ गावांना फटका बसला होता. महापुरामध्ये नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने मदत करण्याचे जाहीर केले होते. पण काही पूरग्रस्त नागरिकांना ही मदत मिळाली नसल्याने हे नागरिक धोकादायक ठिकाणीच राहत आहेत. त्यांचे स्थलांतर झालेले नाही.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निपाणी-चिकोडी तालुक्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दूधगंगा व वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे काही प्रमाणात शेतीतही पाणी शिरले आहे.

वेदगंगा नदीवरील जत्राट-भिवशी, अकोळ-सिदनाळ, भोजवाडी-शिवापूरवाडी, ते बंधारे तर दूधगंगा नदीवरील बारवाड-कुन्नूर, कारदगा-भोज, मलिकवाड-दत्तवाड, एकसंबा-दत्तवाड आदी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सुरुवातीच्या पावसानेच हे बंधारे पाण्याखाली गेल्याने पूरग्रस्त भागात भीती पसरली आहे.

२०१९ च्या पुरात काय घडले?

निपाणी तालुक्यात २०१९ ला आलेल्या महापुरात एकूण ३५८४ घरांची पडझड झाली होती. यापैकी ५०८ घरांचे १०० टक्के तर २१८८ घरांचे १५ ते २५ टक्के नुकसान झाले होते. तर ८८८ घरांचे २५ ते ७५ टक्के नुकसान झाले होते.

फोटो

निपाणी : दोन दिवस पावसाने विश्रांती न घेतल्याने जत्राट बंधारा पाण्याखाली गेला आहे.