शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

होरपळलेल्या रोपांवर रोज ६० हजारांच्या पाण्याची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शेंडा पार्कात तीन महिन्यापूर्वी आगीत होरपळलेल्या रोपांवर गेल्या तीन दिवसापासून टॅंकरद्वारे रोज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शेंडा पार्कात तीन महिन्यापूर्वी आगीत होरपळलेल्या रोपांवर गेल्या तीन दिवसापासून टॅंकरद्वारे रोज साठ हजार रुपये खर्चून पाण्याची फुंकर मारली जात आहे, पण त्याचे प्रमाण आणि होणारा खर्च पाहता हे नेमके कोणाला जगवण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होत असून वनविभागाच्या एकूण कारभाराविषयी शंका घेतली जात आहे.

शेंडा पार्कात वन विभागाने शतकोटी वृक्ष लागवडी अंतर्गत जून २०१८ मध्ये ३० हेक्टर जमिनीवर वृक्ष लागवड केली. ऑक्सिजन पार्क करण्याच्या हेतूने वड पिंपळासह करंज, चिंच, लिंब, फणस, आवळा, आपटा, बहावा, उंबर, कोकम, कदंब, बकूळ या औषधी दुर्मिळ वृक्षांची लागवड झाली. दोन वर्षे देखभाल झाल्याने बहुतांश झाडे दोन तीन फुटावर वाढली होती, पण त्यानंतर कोरोनामुळे देखभालीचा खर्च मिळत नसल्याचे कारण पुढे करत वनविभागाने लक्ष काढून घेतले. या दुर्लक्षामुळे डिसेंबरमध्ये भीषण आग लागून एक लाखांपैकी ८० हजाराहून अधिक झाडे जळाली. सुदैवाने अवकाळी पाऊस झाल्याने यातील बऱ्याच झाडांना पालवी फुटली. दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी पुढाकार घेत टॅंकरद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली, पण झाडांची संख्या आणि लागणारे पाणी याचे गणित न जमल्याने हा उपक्रम आठवडाभरातच बंद पडला. तेव्हापासून ही झाडे पाण्याविना होरपळत होती.

पाण्यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन दिवसापासून पाणी घातले जात आहे. अडीच महिन्यापासून पाणी नसल्याने रोपे कोमेजली आहेत. काही रोपांचे सांगाडे उभे आहेत. जमीनही भेगाळली आहे. त्यामुळे १०० लिटर जरी पाणी एका झाडाला ओतले तरी ते पुरणार नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे. तरी देखील वन विभागाने ३१ मार्चपर्यंत मंजूर केलेल्या टेंडरनुसार सध्या वीटा ( जि. सांगली) येथील ठेकेदाराकडून हे काम करवून घेतले जात आहे. पाचगावमधूनच ८ हजार रुपयांना एक याप्रमाणे टॅंकर असे पाणी विकत घेऊन रोज सहा ते सात टॅंकरने या झाडांना पाणी दिले जात आहे. झाडाभाेवती ना अळे, ना मातीची भर ना कोणते खत. केवळ पाणी टाकण्याची औपचारिकता वनविभागाकडून पूर्ण केली जात आहे. दिले जाणारे पाणी देखील पुरेसे नसल्याने या रोपांचे भवितव्य आता निसर्गाच्या हातात आहे.

चौकट ०१

सरकारी नियम एका झाडाला १७ लिटर पाण्याचा आहे. पण सध्या त्याच्या निम्मेच पाणी दिले जात आहे. तीन मिनी टॅंकर, सहा मजुरांकरवी सकाळी आठ ते संध्याकाळी ६ यावेळेत पाणी देण्याचे काम करत आहेत. या सर्वावर रोजचा ६० हजाराचा खर्च होत आहे. मे महिन्यापर्यंत पाणी द्यावे लागणार असल्याने यासाठी किमान १०० दिवसाचा कालावधी धरला तर ७० लाखांचा निधी यासाठी खर्ची पडणार आहे. पाणी किती आणि कसे दिले जात आहे, याकडेही वन विभागाचे लक्ष नाही.

१८०३२०२१-काेल-शेंडा पार्क ०३

शेंडा पार्कातील शतकोटी वृक्ष लागवडीची अशी अवस्था झाली आहे.

१८०३२०२१-काेल-शेंडा पार्क ०४

शेंडा पार्कातील होरपळणाऱ्या वृक्षांना टॅंकरद्वारे पाणी दिले जात आहे.

१८०३२०२१-काेल-शेंडा पार्क ०५

वनविभागाच्या दुर्लक्षामुळे शेंडा पार्कातील हे प्रस्तावित ऑक्सिजन पार्क असे भकास झाले आहे.

(सर्व छाया: नसीर अत्तार)