शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

सांगली, कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी भरले ५१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: थकीत बिलांमुळे अडचणीत आलेल्या ‘महावितरण’ला तारण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबरीने आता शेतकऱ्यांनी हात पुढे केला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: थकीत बिलांमुळे अडचणीत आलेल्या ‘महावितरण’ला तारण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबरीने आता शेतकऱ्यांनी हात पुढे केला आहे. आवाहन केल्याच्या महिनाभरात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील २३ हजार ६७३ कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी तब्बल ५० कोटी ९४ लाखांचे वीज बिल जमा करून आपले दायित्व पुन्हा एकदा निभावले आहे. कोल्हापूरचा वाटा ९ कोटी ७६ लाखांचा तर सांगली ४१ कोटी १८ लाखांचा आहे.

कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मध्ये प्रामुख्याने कृषिपंपासह सर्व उच्च व लघुदाब कृषी ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे.सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे. थकबाकीदार कृषी ग्राहकांनी त्यांच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येत आहे. योजनेत एक ते तीन वर्षासाठी सहभाग घेतल्यास त्या त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३०टक्के तर तिसऱ्या वर्षात २० टक्के माफ करण्यात येईल.

बॉक्स १ कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात १ लक्ष ४५ हजार ९०४ कृषी ग्राहकांकडे ४७७ कोटी ६६ लक्ष रुपयांची एकूण वीज बिल थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे ४६ कोटी ९३ लक्ष माफ करण्यात आले आहेत. उरलेल्या मूळ थकबाकीच्या ४३० कोटी ७२ लक्षापैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे २१५ कोटी ३६ लक्ष रक्कम माफ करण्यात येणार आहे.

बॉक्स ०२ सांगली

सांगली जिल्ह्यात २ लक्ष ३९ हजार २७९ कृषी ग्राहक असून त्यांच्याकडे १२८४ कोटी १८ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे २२९ कोटी २ लाख माफ करण्यात आले आहे. उरलेल्या मूळ थकबाकीच्या १०५५ कोटी १६ लाखांपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे ५२७ कोटी ५८ लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे.