शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सांगली, कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी भरले ५१ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: थकीत बिलांमुळे अडचणीत आलेल्या ‘महावितरण’ला तारण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबरीने आता शेतकऱ्यांनी हात पुढे केला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: थकीत बिलांमुळे अडचणीत आलेल्या ‘महावितरण’ला तारण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबरीने आता शेतकऱ्यांनी हात पुढे केला आहे. आवाहन केल्याच्या महिनाभरात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील २३ हजार ६७३ कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी तब्बल ५० कोटी ९४ लाखांचे वीज बिल जमा करून आपले दायित्व पुन्हा एकदा निभावले आहे. कोल्हापूरचा वाटा ९ कोटी ७६ लाखांचा तर सांगली ४१ कोटी १८ लाखांचा आहे.

कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० मध्ये प्रामुख्याने कृषिपंपासह सर्व उच्च व लघुदाब कृषी ग्राहक तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे.सप्टेंबर २०१५ पर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे. थकबाकीदार कृषी ग्राहकांनी त्यांच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येत आहे. योजनेत एक ते तीन वर्षासाठी सहभाग घेतल्यास त्या त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३०टक्के तर तिसऱ्या वर्षात २० टक्के माफ करण्यात येईल.

बॉक्स १ कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात १ लक्ष ४५ हजार ९०४ कृषी ग्राहकांकडे ४७७ कोटी ६६ लक्ष रुपयांची एकूण वीज बिल थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे ४६ कोटी ९३ लक्ष माफ करण्यात आले आहेत. उरलेल्या मूळ थकबाकीच्या ४३० कोटी ७२ लक्षापैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे २१५ कोटी ३६ लक्ष रक्कम माफ करण्यात येणार आहे.

बॉक्स ०२ सांगली

सांगली जिल्ह्यात २ लक्ष ३९ हजार २७९ कृषी ग्राहक असून त्यांच्याकडे १२८४ कोटी १८ लाख रुपयांची एकूण थकबाकी आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे २२९ कोटी २ लाख माफ करण्यात आले आहे. उरलेल्या मूळ थकबाकीच्या १०५५ कोटी १६ लाखांपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे ५२७ कोटी ५८ लाखांची रक्कम माफ करण्यात येणार आहे.