शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन थाळीचा ५० हजार जणांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:23 IST

मुरगूड केंद्रातून दररोज दीडशे थाळींचे वितरण अनिल पाटील मुरगूड : राज्य शासनाने गरजू आणि गरिबांना अत्यंत अत्यल्प दरात जेवण ...

मुरगूड केंद्रातून दररोज दीडशे थाळींचे वितरण

अनिल पाटील

मुरगूड : राज्य शासनाने गरजू आणि गरिबांना अत्यंत अत्यल्प दरात जेवण मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुरगूड येथे सुरू असलेल्या केंद्रावर वर्षभरात पन्नास हजारावर गरजूंनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे .

सुरुवातीला हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविण्यात आला. दरम्यान सर्वत्र हळूहळू कोरोनाचा संसर्ग सुरू होताच शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर व प्रमुख शहरात विस्तार करण्यात आला. या उपक्रमाचा लॉकडाऊनच्या कालावधीत गरजूंना चांगलाच फायदा झाला.

या थाळीने हजारो लोकांची भूक भागविली. गरजूंना, नागरिकांना केवळ दहा रुपयांत भोजन उपलब्ध करून देणारी योजना हा विकास आघाडी सरकारकडून २६ जानेवारी २०२० पासून राबविण्यात येत आहे. दहा रुपयांना असणारी शिवभोजन थाळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. शासनाकडून शहरी आणि ग्रामीण भागांसाठी प्रतिथाळी अनुदान दिले जाते.

या काळात अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. अनेकांचे रोजगार बंद झाले. हातावर पोट असणाऱ्या लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले. अशा वेळी लोकांची उपासमार होऊ नये यासाठी येथील श्री गणेश हॉटेल शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून शासनाकडून दररोज १५० थाळ्यांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. लोकांना पाच रुपयांत जेवण देण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुरगूड केंद्रावर १२ एप्रिल २०२० ते ९ एप्रिल २०२१ अखेर ५० हजारांवर व्यक्तीनी याचा लाभ घेतला.