शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

शिवभोजन थाळीचा ५० हजार जणांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:23 IST

मुरगूड केंद्रातून दररोज दीडशे थाळींचे वितरण अनिल पाटील मुरगूड : राज्य शासनाने गरजू आणि गरिबांना अत्यंत अत्यल्प दरात जेवण ...

मुरगूड केंद्रातून दररोज दीडशे थाळींचे वितरण

अनिल पाटील

मुरगूड : राज्य शासनाने गरजू आणि गरिबांना अत्यंत अत्यल्प दरात जेवण मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुरगूड येथे सुरू असलेल्या केंद्रावर वर्षभरात पन्नास हजारावर गरजूंनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे .

सुरुवातीला हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविण्यात आला. दरम्यान सर्वत्र हळूहळू कोरोनाचा संसर्ग सुरू होताच शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर व प्रमुख शहरात विस्तार करण्यात आला. या उपक्रमाचा लॉकडाऊनच्या कालावधीत गरजूंना चांगलाच फायदा झाला.

या थाळीने हजारो लोकांची भूक भागविली. गरजूंना, नागरिकांना केवळ दहा रुपयांत भोजन उपलब्ध करून देणारी योजना हा विकास आघाडी सरकारकडून २६ जानेवारी २०२० पासून राबविण्यात येत आहे. दहा रुपयांना असणारी शिवभोजन थाळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. शासनाकडून शहरी आणि ग्रामीण भागांसाठी प्रतिथाळी अनुदान दिले जाते.

या काळात अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. अनेकांचे रोजगार बंद झाले. हातावर पोट असणाऱ्या लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले. अशा वेळी लोकांची उपासमार होऊ नये यासाठी येथील श्री गणेश हॉटेल शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून शासनाकडून दररोज १५० थाळ्यांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. लोकांना पाच रुपयांत जेवण देण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुरगूड केंद्रावर १२ एप्रिल २०२० ते ९ एप्रिल २०२१ अखेर ५० हजारांवर व्यक्तीनी याचा लाभ घेतला.