शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

शिवभोजन थाळीचा ५० हजार जणांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:23 IST

मुरगूड केंद्रातून दररोज दीडशे थाळींचे वितरण अनिल पाटील मुरगूड : राज्य शासनाने गरजू आणि गरिबांना अत्यंत अत्यल्प दरात जेवण ...

मुरगूड केंद्रातून दररोज दीडशे थाळींचे वितरण

अनिल पाटील

मुरगूड : राज्य शासनाने गरजू आणि गरिबांना अत्यंत अत्यल्प दरात जेवण मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या शिवभोजन थाळी उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुरगूड येथे सुरू असलेल्या केंद्रावर वर्षभरात पन्नास हजारावर गरजूंनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे .

सुरुवातीला हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविण्यात आला. दरम्यान सर्वत्र हळूहळू कोरोनाचा संसर्ग सुरू होताच शिवभोजन थाळी प्रकल्पाचा तालुकास्तरावर व प्रमुख शहरात विस्तार करण्यात आला. या उपक्रमाचा लॉकडाऊनच्या कालावधीत गरजूंना चांगलाच फायदा झाला.

या थाळीने हजारो लोकांची भूक भागविली. गरजूंना, नागरिकांना केवळ दहा रुपयांत भोजन उपलब्ध करून देणारी योजना हा विकास आघाडी सरकारकडून २६ जानेवारी २०२० पासून राबविण्यात येत आहे. दहा रुपयांना असणारी शिवभोजन थाळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने केवळ पाच रुपयांमध्ये ग्राहकांना देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला. शासनाकडून शहरी आणि ग्रामीण भागांसाठी प्रतिथाळी अनुदान दिले जाते.

या काळात अनेक उद्योग-व्यवसाय बंद पडले. अनेकांचे रोजगार बंद झाले. हातावर पोट असणाऱ्या लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे अवघड झाले. अशा वेळी लोकांची उपासमार होऊ नये यासाठी येथील श्री गणेश हॉटेल शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून शासनाकडून दररोज १५० थाळ्यांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. लोकांना पाच रुपयांत जेवण देण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुरगूड केंद्रावर १२ एप्रिल २०२० ते ९ एप्रिल २०२१ अखेर ५० हजारांवर व्यक्तीनी याचा लाभ घेतला.