शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

महामार्गावर रोज ५००० किलो घनकचरा

By admin | Updated: January 19, 2016 00:35 IST

सेवामार्गावरील व्यवसायांचा फटका : कचरा आणि टाकाऊ पदार्थांमुळे रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचा त्रास, अपघाताचे ठरते कारण--समस्यांचा महामार्ग

सतीश पाटील -- शिरोलीतावडे हॉटेल ते शिये फाट्यापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ड्रेनेजलाईनमधून महिन्याला दीडशे टन घनकचरा निघतो. म्हणजे दररोज सरासरी ५००० हजार किलो कचरा. या कचऱ्यामुळे आणि पदार्थांमुळे भटक्या कुत्र्यांचा महामार्गावर वाहनधारकांना (खासकरून दुचाकीस्वारांना) मोठा त्रास सहन करावा लागतो.कागल-सातारा महामार्गाच्या दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी तीन फुटांच्या ड्रेनेजलाईन तयार केल्या. तसेच भुयारी मार्गात ही ड्रेनेजलाईन घालण्यात आली; पण या दोन्ही ड्रेनेजलाईनची निर्मिती योग्य पद्धतीने न झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सतत ड्रेनेजलाईन तुंबलेली असते. सांडपाणी भुयारी मार्गावरून सेवामार्गावर येते. या ड्रेनेजलाईन तुंबण्याचे प्रमुख कारण म्हणजे सेवामार्गावरील खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांवरील प्लास्टिक पिशव्या, चिकन सिक्स्टी फायचे खरकटे मांस, हॉटेल, धाब्यांमधील शिल्लक अन्न, प्लास्टिक, कचरा, सेवामार्गावरील ओपन बार, उघड्यावर मद्यपान करणारे मद्यपी, त्यांनी टाकलेल्या बाटल्या यामुळे ड्रेनेजलाईन तुंबतात. यामधून महिन्याला तावडे हॉटेल ते शिये फाट्यापर्यंत दीडशे टन घनकचरा या ड्रेनेजमधून गोळा होत असतो.महामार्ग, सेवामार्ग, भुयारी मार्ग, ड्रेनेजलाईन स्वच्छ रहावेत, म्हणून महामार्गाचे ठेकेदार जयहिंद रोड बिल्डर्स कंपनीने तावडे हॉटेल ते टोपपर्यंत महामार्गावरील गांधीनगर, शिरोली, नागाव, टोप या गावांच्या ग्रामपंचायत, सरपंच यांच्याशी संपर्क साधून सेवामार्गावरील चहाच्या टपरी, हॉटेल, धाबे, बीअर बार, वाईन शॉप, चिकनच्या गाड्या यांना ड्रेनेज लाईनमध्ये कचरा टाकू देऊ नये, याबाबत पत्रव्यवहारसुद्धा केला आहे; मात्र ग्रामपंचायतींनी कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. महामार्गाशी संबंधित स्वच्छतेचा संबंध नसल्याचे ग्रामपंचायतींचे म्हणणे आहे.महामार्गावरील किरकोळ अपघात टाळण्यासाठी ड्रेनेजलाईन आणि सेवामार्ग मोकळे असणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ड्रेनेजलाईनची सफाई आमच्याकडून केली जाते; पण स्थानिक व्यावसायिक लोक मांस, प्लास्टिक पिशव्या, कचरा, मद्याच्या बाटल्या ड्रेनेज लाईनमध्ये टाकतात. मग ड्रेनेजलाईन तुंबते आणि सांडपाण्याचा निचरा झाला नाही की पाणी सेवामार्गावर येते. तावडे हॉटेल ते शिये फाट्यापर्यंत महिन्याला दीडशे टन घनकचरा गोळा होतो.- विक्रम साळोखे, जयहिंद रोड बिल्डर्सशिरोलीमधील घनकचरा उचलण्यासाठी तीन घंटागाड्या आहेत. आमचा कचरा आम्ही उचलतोय. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ड्रेनेजलाईन स्वच्छ करण्याचे काम ठेकेदाराचे आहे. त्यासाठी त्यांना पैसे मिळतात. वेळेत ड्रेनेजलाईन स्वच्छ केल्या तर ड्रेनेज तुंबण्याचा प्रश्नच नाही. - बिस्मिल्ला महात, सरपंच, शिरोली