शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

महामार्गावर रोज ५००० किलो घनकचरा

By admin | Updated: January 19, 2016 00:35 IST

सेवामार्गावरील व्यवसायांचा फटका : कचरा आणि टाकाऊ पदार्थांमुळे रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचा त्रास, अपघाताचे ठरते कारण--समस्यांचा महामार्ग

सतीश पाटील -- शिरोलीतावडे हॉटेल ते शिये फाट्यापर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ड्रेनेजलाईनमधून महिन्याला दीडशे टन घनकचरा निघतो. म्हणजे दररोज सरासरी ५००० हजार किलो कचरा. या कचऱ्यामुळे आणि पदार्थांमुळे भटक्या कुत्र्यांचा महामार्गावर वाहनधारकांना (खासकरून दुचाकीस्वारांना) मोठा त्रास सहन करावा लागतो.कागल-सातारा महामार्गाच्या दोन्ही बाजूला पाण्याचा निचरा होण्यासाठी तीन फुटांच्या ड्रेनेजलाईन तयार केल्या. तसेच भुयारी मार्गात ही ड्रेनेजलाईन घालण्यात आली; पण या दोन्ही ड्रेनेजलाईनची निर्मिती योग्य पद्धतीने न झाल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सतत ड्रेनेजलाईन तुंबलेली असते. सांडपाणी भुयारी मार्गावरून सेवामार्गावर येते. या ड्रेनेजलाईन तुंबण्याचे प्रमुख कारण म्हणजे सेवामार्गावरील खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांवरील प्लास्टिक पिशव्या, चिकन सिक्स्टी फायचे खरकटे मांस, हॉटेल, धाब्यांमधील शिल्लक अन्न, प्लास्टिक, कचरा, सेवामार्गावरील ओपन बार, उघड्यावर मद्यपान करणारे मद्यपी, त्यांनी टाकलेल्या बाटल्या यामुळे ड्रेनेजलाईन तुंबतात. यामधून महिन्याला तावडे हॉटेल ते शिये फाट्यापर्यंत दीडशे टन घनकचरा या ड्रेनेजमधून गोळा होत असतो.महामार्ग, सेवामार्ग, भुयारी मार्ग, ड्रेनेजलाईन स्वच्छ रहावेत, म्हणून महामार्गाचे ठेकेदार जयहिंद रोड बिल्डर्स कंपनीने तावडे हॉटेल ते टोपपर्यंत महामार्गावरील गांधीनगर, शिरोली, नागाव, टोप या गावांच्या ग्रामपंचायत, सरपंच यांच्याशी संपर्क साधून सेवामार्गावरील चहाच्या टपरी, हॉटेल, धाबे, बीअर बार, वाईन शॉप, चिकनच्या गाड्या यांना ड्रेनेज लाईनमध्ये कचरा टाकू देऊ नये, याबाबत पत्रव्यवहारसुद्धा केला आहे; मात्र ग्रामपंचायतींनी कोणतीही अंमलबजावणी केलेली नाही. महामार्गाशी संबंधित स्वच्छतेचा संबंध नसल्याचे ग्रामपंचायतींचे म्हणणे आहे.महामार्गावरील किरकोळ अपघात टाळण्यासाठी ड्रेनेजलाईन आणि सेवामार्ग मोकळे असणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ड्रेनेजलाईनची सफाई आमच्याकडून केली जाते; पण स्थानिक व्यावसायिक लोक मांस, प्लास्टिक पिशव्या, कचरा, मद्याच्या बाटल्या ड्रेनेज लाईनमध्ये टाकतात. मग ड्रेनेजलाईन तुंबते आणि सांडपाण्याचा निचरा झाला नाही की पाणी सेवामार्गावर येते. तावडे हॉटेल ते शिये फाट्यापर्यंत महिन्याला दीडशे टन घनकचरा गोळा होतो.- विक्रम साळोखे, जयहिंद रोड बिल्डर्सशिरोलीमधील घनकचरा उचलण्यासाठी तीन घंटागाड्या आहेत. आमचा कचरा आम्ही उचलतोय. महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या ड्रेनेजलाईन स्वच्छ करण्याचे काम ठेकेदाराचे आहे. त्यासाठी त्यांना पैसे मिळतात. वेळेत ड्रेनेजलाईन स्वच्छ केल्या तर ड्रेनेज तुंबण्याचा प्रश्नच नाही. - बिस्मिल्ला महात, सरपंच, शिरोली