शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

५० वाहनांतील सोडली हवा

By admin | Updated: October 6, 2015 01:12 IST

वाहतूकदारांचा संप मागे : आजपासून होणार वाहतूक सुरळीत

कोल्हापूर/शिराली : देशातील ३७२ टोलनाके बंद करावेत, यासह अन्य मागण्यांकरिता पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या पाचव्या दिवशी सोमवारी पुणे-बंगलोर महामार्गावरील उचगाव येथे परराज्यातून येणारे ५० हून अधिक मालवाहतूक ट्रक व वाहने कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी आॅपरेटर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अडवून त्या वाहनांच्या टायरमधील हवा सोडली. यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. दरम्यान वरीष्ठ स्तरावर झालेल्या बैठकीनुसार सोमवारी रात्री उशिरा संप मागे घेतला असल्याची माहिती जिल्हा लॉरी आॅपरेटर असो.चे अध्यक्ष सुभाष जाधव व खजानीस प्रकाश केसरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे आज, मंगळवारपासून मालवाहतूक सुरळीत सुरू राहील.१ आॅक्टोबरपासून आॅल इंडिया मोटार ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने हे देशव्यापी आंदोलन सुरू केले होते. दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ३२५ कोटींपेक्षा अधिक रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाला. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी सोमवारी सकाळी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव व उपाध्यक्ष भाऊसाहेब घोगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उचगावजवळ दुतर्फा मार्गावर चक्का जाम आंदोलन केले. परराज्यांतून येणारे ट्रक, टँकर, आदी अवजड वाहने अडविली. सुमारे ५० हून अधिक वाहनांची हवा त्यांनी सोडली. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लॉरी आॅपरेटर व धान्य व्यापारी संघ, अन्य संबंधित संघटनांना जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी चर्चेसाठी पाचारण केले होते. यामध्ये रेशनिंगचे धान्य, दूध वाहतूक, गॅस, पेट्रोल, रॉकेल यासह जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी मालवाहतूक रोखू नये, असे सैनी यांनी बैठकीत बजावले. यावर पदाधिकाऱ्यांनी हा संपच मागे घेतल्याची माहिती दिली. पुणे-बंगलोर महामार्गावर नागाव फाटा येथे लॉरी असोसिएशनने संपात सहभागी न होणारे दोनशे ट्रक अडवून त्यांची कागदपत्रे काढून घेतली होती.