शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

चोरीच्या ५० दुचाकी जप्त

By admin | Updated: February 9, 2017 00:46 IST

चरणचे दोघे अटकेत; चारचाकीसह १७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

कोल्हापूर : मुंबई, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून दुचाकी-चारचाकी वाहने चोरणाऱ्या चरण (ता. शाहूवाडी) येथील दोघा अट्टल चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. संशयित प्रमोद ऊर्र्फ लखन मधुकर घुले (२४) व मच्छिंद्र रामचंद्र लाड (२७) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पन्नास दुचाकी, एक तवेरा असा सुमारे सतरा लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. त्यांचा तिसरा साथीदार अक्षय घुले (२३) हा पसार आहे. त्याचा पोलिस शोध घेत आहे. त्यांच्याकडून आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. अधिक माहिती अशी, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ हे यापूर्वी शाहूवाडी पोलिस ठाण्याचे काम पाहत होते. त्यांना तालुक्यातील खबऱ्याने संशयित प्रमोद घुले, त्याचा लहान भाऊ अक्षय व मच्छिंद्र लाड हे तिघे चोरीच्या दुचाकी गावात आणून विक्री करत असल्याचे सांगितले. धुमाळ यांनी या प्रकाराची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते यांना दिली. त्यानुसार मोहिते यांनी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सानप, युवराज आठरे, सचिन पंडित यांचे पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. दि. ६ रोजी संशयित प्रमोद घुले व मच्छिंद्र लाड हे दोघे डोणोली (ता. शाहूवाडी) येथील हॉटेल मैत्रीसमोर दुचाकी विक्री करण्यासाठी आले असता ताब्यात घेतले. त्यांना ‘पोलिसी खाक्या’दाखविताच तोंड उघडले. एक नव्हे तर तब्बल पन्नास दुचाकी व तवेरा चोरी केल्याची कबुली दिली. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्णातील शाहूपुरी, वडगांव, कोडोली, शिरोली एमआयडीसी, करवीर, हुपरी, सांगली जिल्ह्णांतील शिराळा, आष्टा, कुरळुप, इस्लामपूर, देवरूख, रत्नागिरी तसेच वाशी मुंबई पोलिस ठाण्याच्या हद्दीचा समावेश आहे. तिघेही यापूर्वी रेकॉर्डवर नसल्याने ते चोरी करत असल्याची चाहूल त्यांच्या घरच्यांनाही नव्हती. प्रमोद याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई मोलमजुरी करते. तो आणि त्याचा भाऊ अक्षय कामधंदा न करता झटपट पैसा मिळविण्याच्या उद्देशाने दुचाकी चोरीस असत. मच्छिंद्र याचे आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती गरिबीची आहे. फायनान्स कंपन्यांनी ओढून आणलेल्या गाड्यांची तो विक्री करत असे. त्यातून त्याने घुले बंधूंशी हातमिळवणी करून चोरीची वाहने विक्री करू लागला. गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी सर्व वाहने हस्तगत केली. त्यांच्याकडून आणखी काही चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे तांबडे यांनी सांगितले. पैसे गेले, गाडी गेली, आता कारवाई नको...या तिघा संशयितांकडून पन्नास लोकांनी दहा ते पस्तीस हजार रुपयांना दुचाकी विकत घेतल्या होत्या. त्या चोरीच्या असतील अशी शंकाही या लोकांना नव्हती. स्वत:ची, मित्राची, नातेवाईकांची दुचाकी असल्याचे सांगून विक्री केल्या होत्या. पोलिसांचा फोन येताच प्रत्येकाने कारवाईच्या भीतीने दुचाकी पोलिस मुख्यालयात आणून दिल्या. यावेळी ‘साहेब दुचाकी घ्या, आम्हाला माहीत नव्हत्या त्या चोरीच्या आहेत. आमचे पैसे गेले, गाडी गेली, आता कारवाई नको,’ असे हात जोडून विनंती करीत होते.