शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

मार्गशीर्ष गुुरुवारचा मुहूर्त साधून ४८१ अर्ज दाखल; ग्रामपंचायत निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:20 IST

एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला ...

एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. बुधवारी २६, तर गुरुवारी तब्बल ४८१ व्यक्तींनी ४९१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मार्गशीर्ष गुरुवार व्रताचा दिवस साधून अनेक इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात उतरले.

---

आलेले अर्ज तालुकानिहाय

तालुका : व्यक्ती अर्ज

शाहूवाडी : ९ : ९

पन्हाळा : ५३ : ५३

हातकणंगले : ५२ : ५२

शिरोळ : ७३ : ७३

करवीर : ९३ : ९९

गगनबावडा : ० : ०

राधानगरी : ५३ : ५३

कागल : ६८ : ६८

भुदरगड : २१ : २२

आजरा : १६ : १६

गड़हिंग्लज : २७ : २९

चंदगड : १६ : १७

--------------

जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरू राहणार

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागेवरील इच्छुक उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून आज शुक्रवार, शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी केवळ ग्रामपंचायत निवडणूक विषयक अर्ज स्वीकरण्यासाठी कार्यालय चालू राहील, असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणीचे सदस्य सचिव सचिन साळे यांनी जाहीर केले आहे. उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती जोडणे बंधनकारक आहे.

--

शैक्षणिक पात्रता

सरपंचाची निवड आता निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्यात येणार असल्याने या निवडणुकीसाठीच्या इच्छुक उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असू नये, त्यांचे नाव मतदार यादीत असले पाहिजे, तसेच त्यांनी किमान सातवी उत्तीर्ण असले पाहिजे. वरील सर्व प्रकारची पात्रता असल्याशिवाय सदस्याची सरपंच पदावर नियुक्ती होणार नाही, असे गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

---