शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

४८ वर्षे लोटली; एक इंचही हद्दवाढ नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:39 IST

विनोद सावंत / लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, गेल्या ४८ वर्षांत शहराची ...

विनोद सावंत / लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेची सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, गेल्या ४८ वर्षांत शहराची एक इंचही हद्दवाढ झालेली नाही. क्षेत्र वाढत नसल्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. नवीन प्रकल्पांना मर्यादा येत आहेत. राज्यशासन लाेकसंख्यावर आधारित निधी वाटप करत असल्यामुळे इतर महापालिकेच्या तुलनेत कोल्हापूर महापालिकेला अपेक्षित निधीही मिळत नाही. राजकीय नेत्यांची उदासीनता आणि हद्दवाढीत येणाऱ्या ग्रामस्थांचा विरोध याला कारणीभूत आहे.

कोल्हापूर नगरपालिकेचे १५ डिसेंबर १९७२ मध्ये कोल्हापूर महापालिकेमध्ये रूपांतर झाले. सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या महापालिकेसमोर पंचगंगा, रंकाळा तलाव प्रदूषणमुक्त करणे, काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना पूर्ण करणे, शहर स्वच्छ ठेवणे, खड्डेमुक्त कोल्हापूर करणे अशा अनेक आव्हानांचा डोंगर आहे. त्यामध्येच हद्दवाढ झाली नसल्यामुळे शहर विस्तारीकरणाला मर्यादा आल्या आहेत. बांधकाम व्यवसायासह विविध घटकांवर त्याचा परिणाम होत आहे.

चौकट

नेत्यांना महापालिकेवर सत्ता पाहिजे पण हद्दवाढ नको

शहरलागतची ४२ गावांसह हद्दवाढ करण्यासाठी शहरवासीयांनी आंदोलन केले. तेथील ग्रामस्थांचा विरोध असल्याने हद्दवाढ करण्याची नेत्यांची इच्छाशक्ती दिसून येत नाही. शहरवासीयांची किती काळजी करतो हे महापालिकेच्या निवडणुकीत नेते दाखविण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक पक्षातील नेत्यांना महापालिकेवर सत्ता पाहिजे. मात्र, हद्दवाढ नको आहे. काही शहरांच्या एकदा नव्हे तरी दोनवेळा हद्दवाढ झाल्याची उदाहरणे आहेत. मग कोल्हापूर शहरावरच अन्याय का, असा सवाल उपस्थित होत आहे.

चौकट

प्राधिकरणाचे गाजर

हद्दवाढ बाजूचे आणि विरोधकांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर युती सरकारने मध्यममार्ग म्हणून शहरालगतच्या ४२ गावांसाठी कोल्हापूर विकास प्राधिकरण आणले. त्यामुळे शहरातील मोठे पूल, रस्ते, शाळा, उद्यानांचा विकास होईल, अशी स्वप्ने दाखवली. तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर शहरासाठी ब्लँक चेक देत असल्याचेही म्हटले होते. महापालिकेनेही प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरासाठी चार हजार कोटींच्या निधीची मागणी केली. प्राधिकरणाच्या माध्यमातून यामधील एक रुपयाचाही निधी आतापर्यंत मिळालेला नाही की घोषित केलेले एक कामही झाले नाही.

चौकट

सेवा पाहिजे पण हद्दवाढीला विरोध

शासकीय कार्यालय, बाजारपेठ आणि राजकीय केंद्रबिंदू हे शहर आहे. परिणामी परिसरातील गावातील हजारो लोक रोज शहरात येतात. या सर्वांकडून अप्रत्यक्षपणे महापालिकेच्या यंत्रणांचा वापर होतो. त्यांचा अतिरिक्त भार महापालिकेवरच पडत आहे तसेच महापालिकेच्या अग्निशमन सेवा, बससेवा, पाणीपुरवठा अशा सेवा पाहिजे मात्र, हद्दवाढ नको अशी शहरालगतच्या गावांची भूमिका आहे. कोरोनाच्या संकटात तर ग्रामीण भागातील कोरोनाबाधित सर्वच मृतदेह महापालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीत दहन केले. यावेळी शववाहिकेचाही मोठ्या प्रमाणात वापर झाला.