शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

‘अर्धा ग्लास’च्या उपक्रमातून ४० टक्के पाणीबचत

By admin | Updated: May 12, 2016 00:54 IST

हॉटेलमालक संघाचा पुढाकार : सकारात्मक पाऊल, ग्राहकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

भीमगोंडा देसाई --कोल्हापूर --दुष्काळामुळे पाणीबचतीसाठी येथील हॉटेलमालक संघाने पुढाकार घेतला आहे. दीड महिन्यापासून अर्धा ग्लास पाणी उपक्रम, वॉश बेसिन, हॅँडवॉशवरील अमर्याद पाणी वापरावर निर्बंध आणण,े अशा उपाययोजनांची अंमलबजावणी पाणीबचत जागृतीच्या माध्यमातून संघ करीत आहे. यामुळे पूर्वीपेक्षा सरासरी ४० टक्के पाण्याची बचत झाली आहे. पाणीबचतीसाठी हॉटेलमालकांनी स्वत:हून टाकलेल्या सकारात्मक पावलाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने तलाव, विहिरी, कूपनलिका यांच्यातील पाण्याने तळ गाठला आहे. भूगर्भातील पाणी खालावल्याने नव्याने खोदण्यात आलेल्या कूपनलिकांनाही पाणी लागत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे असलेले पाणी जपून वापरणे हा एकमेव मार्ग सध्या उपलब्ध आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनाने मोठी धरणे, लघुपाटबंधारे प्रकल्प यांच्यातील पाणी पिण्यासाठी १५ जूनपर्यंत पुरेल असे नियोजन केले आहे. उपसाबंदी करून शेतीच्या पाणी वापरात कपात केली आहे. उद्योजकांचे २५ टक्के पाणी कपात केले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन प्रशासन करीत आहे. संघटनाही प्रयत्न करीत आहेत. कोल्हापूर शहरातही एक दिवसआड पाणी पुरविले जात आहे. पाऊस लांबल्यास टंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत. त्यामुळे हॉटेलमालक संघाने शक्य तिथे पाणी बचत करण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारण सभेत पाणीबचतीचा विषय ठेवून सर्वांनुमते ठराव केला. दीड महिन्यापासून शहरातील हॉटेलमध्ये पाणीबचतीचे उपक्रम राबविले जात आहेत. हॉटेलमध्ये प्रत्येक ग्राहकास पाण्याचा ग्लास भरून देण्याऐवजी एकाच ठिकाणी तांब्या ठेवून त्यावर वाटी ठेवणे किंवा अर्धा ग्लास भरून देण्याला सुरुवात केली आहे. एखाद्या ग्राहकाची तहान अर्ध्या ग्लासने न शमल्यास पुन्हा पाणी घेण्यासाठी जवळच व्यवस्था केली आहे.ग्राहकांकडूनही त्याला सहकार्य मिळत आहे. हात व भांडी धुण्यासाठीच्या वॉश बेसिनच्या नळाचे पाणी कमी दाबाने सोडणे, असे केले जात आहे. ‘पाणी जपून वापरा’ असे संदेश लिहिलेली स्टिकर्स लावली आहेत. ग्लासमधील पिऊन राखलेले पाणी एकत्र करून हॉटेलमधील फरशी स्वच्छ करण्यासाठी ते वापरले जात आहे.ं‘लोकमत’मुळे चालनादुष्काळामुळे पाणीबचतीचे महत्त्व सांगण्यासाठी ‘लोकमत’तर्फे राज्यभर ‘जलमित्र’ हे अभियान राबविले जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी (दि. ९) हॉटेलमालक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास भेट देऊन ‘जलमित्र अभियाना’त सहभाग घेणार असल्याचे सांगितले. हॉटेलमधील पाणीबचतीच्या उपक्रमास ‘लोकमत’मुळे चालना मिळाली, असे हॉटेलमालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांनी सांगितले. जिल्ह्यात १२०० हॉटेलकोल्हापूर जिल्ह्यात मध्यम आणि मोठी अशी १२०० हॉटेल्स आहेत. यांपैकी ६०० शहरातील आहेत. सर्व हॉटेलपर्यंत विविध माध्यमांतून पाणी बचतीचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न संघाने केला आहे.पाणी बचतीसाठी विविध उपक्रम राबवित आहोत. त्यास हॉटेलमालक आणि ग्राहकांकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. संघातर्फे राबवित असलेल्या उपक्रमांमुळे सरासरी ४० टक्के पाणी बचत झाली आहे. - उज्ज्वल नागेशकर, अध्यक्ष, हॉटेलमालक संघ