शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
3
UPI कॅशबॅक : रोजच्या पेमेंटमधून पैसे वाचवण्याची 'स्मार्ट' ट्रिक! 'या' मार्गांनी करा अधिक कमाई
4
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 2477 तर सोने 459 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या लेटेस्ट रेट
5
Rinku Singh : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी विघ्न की, लग्न? रिंकू टीम इंडियातून आउट होण्यामागचं कारण काय?
6
Vladimir Putin India Visit : उशिरापर्यंत जागरण, दोन तास स्वीमिंग, दारूला स्पर्शही नाही; ७३ वर्षीय पुतिन यांची लाईफस्टाईल! लाल डायरीला खास महत्त्व
7
Mumbai: "हे आपलं घर..." मुलाचं आई- वडिलांना 'बिग सरप्राईज'; दारावर नावाची पाटी पाहून भावूक
8
'आम्हीदेखील देशाचे प्रतिनिधित्व करतो, पण..', पुतिन यांची भेट नाकारल्याने राहुल गांधी संतापले
9
पाकिस्तानसाठी हेरगिरीचा आरोप, ब्रह्मोस माजी इंजिनियरची तब्बल सात वर्षानंतर निर्दोष मुक्तता
10
डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
12
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
13
itel Rhythm Echo TWS Earbuds: बॅटरी लाईफही हवी, आजुबाजुचा गोंगाट घालविणारा इअरबड हवा, मग...;  हा बजेटमधील इअरबड कसा आहे...?
14
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
15
'मागेल तेवढ्या पगाराची नोकरी', स्वतःच्या स्वप्नांसाठी दुसऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी 
16
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
17
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
18
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
19
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
20
Scam Alert: वाहन चालकांनो, ‘RTO’ कधीच ‘एपीके’ पाठवत नाही; लायसन्स व्हेरिफिकेशनच्या आडून लूट
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणामध्ये ३७ टक्के आरोग्य कर्मचारी बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या काळामध्ये जिवाची बाजी लावणारे आराेग्य कर्मचारी कोरोना लसीकरणासाठी मात्र तितक्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाच्या काळामध्ये जिवाची बाजी लावणारे आराेग्य कर्मचारी कोरोना लसीकरणासाठी मात्र तितक्या उत्साहाने प्रतिसाद देत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. आतापर्यंत केवळ ६३ टक्के शासकीय व खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात शासकीय आणि खासगी आरोग्य अधिकारी, कर्मचारी अशा ३४ हजार ९६७ जणांना लस देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, बुधवार, ९ फेब्रुवारीपर्यंत यातील १७,८०६ जणांनी म्हणजे ६३ टक्के जणांनी लस घेतली आहे.

आता ८ फेब्रुवारीपासून पोलीस, महसूल आणि पंचायत राज व्यवस्थेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सध्या पंचायत राजमधील कर्मचाऱ्यांची नावे अपलोड करण्याचे काम सुरू आहे. ज्यांना-ज्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यांना प्रेरणा मिळावी, काहींच्या मनात भीती असेल तर ती दूर व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही लसीकरण करून घेतले आहे. सध्या जिल्ह्यातील २५ आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणाची साेय करण्यात आली आहे.

चौकट

इतर विभागांचे उद्दिष्ट

महसूल १,५३६

पोलीस प्रशासन ५,९००

नगरपालिका, महानगरपालिका ७,४८०

एकूण १४,९१६

चौकट

ग्रामीण भागातील सर्वात चांगले काम

१ पुलाची शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र १०० टक्के

२ ग्रामीण रूग्णालय, गारगोटी ८६ टक्के

३ उपजिल्हा रूग्णालय, गडहिंग्लज ८३ टक्के

नागरी भागातील सर्वात चांगले काम

१ सदर बाजार, कोल्हापूर नागरी केंद्र १०४ टक्के

२ राजारामपुरी, कोल्हापूर नागरी केंद्र ९९ टक्के

सर्वात कमी लसीकरण

१ सीपीआर रूग्णालय २४ टक्के

चौकट

लसीकरण कमी होण्याची कारणे

१ पहिल्यापेक्षा कोरोनाचे कमी झालेले प्रमाण.

२ त्यामुळे मनातील भीती गेली आहे.

३ २८ दिवसांनंतर इतरांचे अनुभव पाहून लस घेण्याची मानसिकता.

४ शास्त्रीय माहितीचा अभाव.

चौकट

कोविड संपलेला नाही

रोज जिल्ह्यात कोविडचे रूग्ण सापडत आहेत. हा आजार संपल्यासारखे सर्वत्र वातावरण होत आहे. मात्र. हे धोकादायक असून, शासनाने घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे पालन करण्याची तीव्र गरज असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.