शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर ३२ मणाचे सुवर्ण सिंहासन

By admin | Updated: May 29, 2017 23:15 IST

रायगडावर ३२ मणाचे सुवर्ण सिंहासन

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ३२ मण वजनाचे सुवर्ण सिंहासन उभे करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची सुरुवात करण्यासाठी येत्या ४ जूनरोजी किल्ले रायगडावर संकल्प सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. भिडे म्हणाले की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदानानंतर रायगड मुघल सत्तेच्या हाती पडला. मुघलांनी रायगडावरील सर्व वस्तू व ऐतिहासिक कागदपत्रे जाळून नामशेष केली. ३२ मण वजनाच्या सुवर्ण सिंहासनाच्या चिरफाळ्या करून ते लुटून नेले. या घटनेला आज ३२९ वर्षे झाली आहेत. आता श्री शिवप्रतिष्ठानने हिंदवी स्वराज्याचे ते सिंहासन पुनर्संस्थापित करण्याचा निश्चय केला आहे. यासाठी सर्व धारकरी, शिवसैनिक व शिवपाईकांनी सिंहासनाच्या पुनर्संस्थापनेचा सामूहिक संकल्प करण्यासाठी ४ जूनला रायगडावर उपस्थित राहावे. छत्रपती शिवरायांचे हे सुवर्ण सिंहासन संपूर्ण राष्ट्राला प्रेरणादायी ठरेल. सुमारे दोन लाख धारकरी उपस्थित राहतील. संकल्प सोहळ्यास ३ जूनला रात्री नऊपासून प्रारंभ होईल. दि. ४ रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम संपेल.ते म्हणाले की, या सुवर्ण सिंहासन संकल्पास मोठी आर्थिक मदत मिळेल. मदत स्वीकारण्यासाठी संस्थेची स्थापना होणार आहे. याची घोषणा रायगडावर कार्यक्रमात केली जाईल. संस्थेच्या बँक खात्यावर मदत जमा करून घेतली जाईल. अनेकजण सोने देण्यास पुढे आले आहेत. पण आम्ही त्यांना पैशाच्या स्वरूपात मदतीचे आवाहन केले आहे. सुवर्ण सिंहासन बनविण्यास काही कलाकारही पुढे आले आहेत. लवकरच संकल्प पूर्ण केला जाईल. सिंहासनाच्या सुरक्षेसाठी शिवप्रेमींची फौज उभी केली जाईल. या कार्यक्रमास येणाऱ्या धारकऱ्यांनी भगवा फेटा बांधावा. रायगडावर कोणतेही खाद्यपदार्थ विकत घेऊ नयेत. स्वत:ला पुरेल एवढी चारवेळची शिदोरी व दोन जलकुंभ येताना घेऊन यावे. प्रत्येक धारकऱ्याने रायगडावर हिंदवी स्वराज्य व्रताची दीक्षा व शपथ घ्यायची आहे. त्यासाठी स्वत:बरोबर दोन जानवी आणावीत. सरकारकडे जाणार नाही!संभाजीराव भिडे (गुरुजी) म्हणाले, राजकीय पक्ष, राजकारण व राजकीय नेतृत्व न घेता हे कार्य पूर्ण केले जाईल. केंद्र व राज्य सरकारची परवानगी घेणार नाही. हे सुवर्ण सिंहासन लवकरच तयार करण्याचा मानस आहे. यासाठी कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी सरकारच्या दारात जाणार नाही.