शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

जिल्ह्याला २५२ कोटींची कर्जमाफी शक्य

By admin | Updated: June 12, 2017 00:56 IST

‘सरसकट’च्या निकषाकडे नजरा : ४८ हजार अत्यल्प, अल्पभूधारकांचा समावेश; शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य सरकारने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी २५ जुलैपूर्वी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचा सुमारे २५२ कोटींचा थेट फायदा जिल्ह्यातील ४८ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. त्याशिवाय सरसकट कर्जमाफीस तत्त्वत: मंजुरी दिल्याने त्याच्या निकषांकडे नजरा लागल्या असून, उर्वरित शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, या मागणीसाठी गेले दोन-तीन महिने सारा महाराष्ट्र धुमसत आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह प्रमुख विरोधी पक्षांनी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-खासदार राजू शेट्टी यांनी ‘आत्मक्लेश यात्रा’ काढून ही मागणी लावून धरली; तर १ जून पासून खुद्द शेतकरीच रस्त्यावर उतरल्याने सरकार हादरले. सर्वपक्षीय सुकाणू समितीची स्थापना करून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने समितीला चर्चेसाठी बोलावले. रविवारी मुंबईत झालेल्या चर्चेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेत सरसकट कर्जमाफीसही तत्त्वत: मान्यता देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात मार्च २०१७ अखेर ३४ हजार ७५१ अत्यल्पभूधारक, तर १३ हजार ४७० अल्पभूधारक शेतकरी थकीत आहेत. या ४८ हजार २२१ शेतकऱ्यांची २५१ कोटी ८९ लाख रुपये थकबाकी माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाला तर उर्वरित शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आपल्याकडे ऊस उत्पादकांचे नवे-जुने जून अखेर सुरू असते. या काळात जरी शेतकऱ्यांनी पैसे भरले किंवा काही कारणास्तव थकीत राहिले तरी हे सगळे सरसकट मध्ये सापडणार आहेत. मखलाशी करणाऱ्या दूध संघांना चाप ऊस उत्पादकांप्रमाणे दूध उत्पादकांनाही एकूण उत्पन्नातील ७० टक्के हिस्सा देण्याचे धोरण सरकारने घेतले आहे. यामुळे मखलाशी करून दूध दर कमी देणाऱ्या दूध संघांना चांगलाच चाप बसणार आहे. जिल्ह्यात दूध दरात कमालीची स्पर्धा आहे. राज्याचा दूध दर कोल्हापूरवरच ठरतो. ‘गोकुळ’ दूध दर, दरफरक व इतर सोयी-सुविधांच्या माध्यमातून उत्पन्नातील ८१ टक्के हिस्सा शेतकऱ्यांना देतो. शेतकऱ्यांचा विजय शेतकऱ्यांनी अभूतपूर्व असा संप करून आपल्या मागण्या मान्य करण्यास सरकारला भाग पाडले. त्यांनी कुठलेही राजकीय नेतृत्व न घेता स्वत:च्या हिमतीवर हा लढा लढून हे यश मिळविले आहे. सरकारने १ जूनपूर्वीच हा निर्र्णय घेतला असता तर शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ आली नसती. वेळ झाला असला तरी शेवट गोड झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी दिली. सर्वप्रथम राजू शेट्टींची मागणी देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी दोन वर्षांपूर्वी खासदार राजू शेट्टी यांनी सर्वप्रथम केली होती. त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ‘आत्मक्लेश’ यात्रेच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले होते. ‘अपात्र’मुळेच आकडा फुगला केंद्र सरकारच्या २००८ मधील कर्जमाफीत जिल्हा बॅँकेला २७९ कोटींची माफी झाली होती; पण ‘नाबार्ड’च्या तपासणीत त्यातील ११२ कोटी अपात्र ठरविले होते. दोन वर्षे न्यायालयीन लढाई होऊन ही कर्जमाफी पात्र ठरविली; पण ‘नाबार्ड’ने हे पैसे अद्याप शेतकऱ्यांना परत केले नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम थकीतच दिसते. त्यामुळे जिल्हा बॅँकेचा थकबाकीचा आकडा फुगला आहे.