शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

जिल्ह्याला २५२ कोटींची कर्जमाफी शक्य

By admin | Updated: June 12, 2017 00:56 IST

‘सरसकट’च्या निकषाकडे नजरा : ४८ हजार अत्यल्प, अल्पभूधारकांचा समावेश; शेतकऱ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य सरकारने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी २५ जुलैपूर्वी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचा सुमारे २५२ कोटींचा थेट फायदा जिल्ह्यातील ४८ हजार शेतकऱ्यांना होणार आहे. त्याशिवाय सरसकट कर्जमाफीस तत्त्वत: मंजुरी दिल्याने त्याच्या निकषांकडे नजरा लागल्या असून, उर्वरित शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, या मागणीसाठी गेले दोन-तीन महिने सारा महाराष्ट्र धुमसत आहे. कॉँग्रेस, राष्ट्रवादीसह प्रमुख विरोधी पक्षांनी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक-खासदार राजू शेट्टी यांनी ‘आत्मक्लेश यात्रा’ काढून ही मागणी लावून धरली; तर १ जून पासून खुद्द शेतकरीच रस्त्यावर उतरल्याने सरकार हादरले. सर्वपक्षीय सुकाणू समितीची स्थापना करून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सरकारने समितीला चर्चेसाठी बोलावले. रविवारी मुंबईत झालेल्या चर्चेत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेत सरसकट कर्जमाफीसही तत्त्वत: मान्यता देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. जिल्ह्यात मार्च २०१७ अखेर ३४ हजार ७५१ अत्यल्पभूधारक, तर १३ हजार ४७० अल्पभूधारक शेतकरी थकीत आहेत. या ४८ हजार २२१ शेतकऱ्यांची २५१ कोटी ८९ लाख रुपये थकबाकी माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाला तर उर्वरित शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आपल्याकडे ऊस उत्पादकांचे नवे-जुने जून अखेर सुरू असते. या काळात जरी शेतकऱ्यांनी पैसे भरले किंवा काही कारणास्तव थकीत राहिले तरी हे सगळे सरसकट मध्ये सापडणार आहेत. मखलाशी करणाऱ्या दूध संघांना चाप ऊस उत्पादकांप्रमाणे दूध उत्पादकांनाही एकूण उत्पन्नातील ७० टक्के हिस्सा देण्याचे धोरण सरकारने घेतले आहे. यामुळे मखलाशी करून दूध दर कमी देणाऱ्या दूध संघांना चांगलाच चाप बसणार आहे. जिल्ह्यात दूध दरात कमालीची स्पर्धा आहे. राज्याचा दूध दर कोल्हापूरवरच ठरतो. ‘गोकुळ’ दूध दर, दरफरक व इतर सोयी-सुविधांच्या माध्यमातून उत्पन्नातील ८१ टक्के हिस्सा शेतकऱ्यांना देतो. शेतकऱ्यांचा विजय शेतकऱ्यांनी अभूतपूर्व असा संप करून आपल्या मागण्या मान्य करण्यास सरकारला भाग पाडले. त्यांनी कुठलेही राजकीय नेतृत्व न घेता स्वत:च्या हिमतीवर हा लढा लढून हे यश मिळविले आहे. सरकारने १ जूनपूर्वीच हा निर्र्णय घेतला असता तर शेतकऱ्यांना संपावर जाण्याची वेळ आली नसती. वेळ झाला असला तरी शेवट गोड झाल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी दिली. सर्वप्रथम राजू शेट्टींची मागणी देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी दोन वर्षांपूर्वी खासदार राजू शेट्टी यांनी सर्वप्रथम केली होती. त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी ‘आत्मक्लेश’ यात्रेच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले होते. ‘अपात्र’मुळेच आकडा फुगला केंद्र सरकारच्या २००८ मधील कर्जमाफीत जिल्हा बॅँकेला २७९ कोटींची माफी झाली होती; पण ‘नाबार्ड’च्या तपासणीत त्यातील ११२ कोटी अपात्र ठरविले होते. दोन वर्षे न्यायालयीन लढाई होऊन ही कर्जमाफी पात्र ठरविली; पण ‘नाबार्ड’ने हे पैसे अद्याप शेतकऱ्यांना परत केले नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम थकीतच दिसते. त्यामुळे जिल्हा बॅँकेचा थकबाकीचा आकडा फुगला आहे.