शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

काळम्मावाडीमध्ये २४.८५ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2016 00:19 IST

पाण्यात काटकसर हवी : ४.३१ टी.एम.सी. पाणी वापरात येणार; वेळापत्रक पाळणे गरजेचे

सोळांकूर : राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडी धरणामध्ये मार्चअखेर २४.८५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजे धरणात ६.३१ टी.एम.सी. इतके पाणी असले तरी प्रत्यक्षात ४.३१ टी.एम.सी. पाणी वापरासाठी येऊ शकते. पावसाळ्याला अजून तीन ते चार महिन्यांचा अवधी असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने होणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित विभागाने नदी वा कालव्याच्या पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या वेळापत्रकाचे पालन करणे गरजेचे आहे. काळम्मावाडी प्रकल्पातील पाणी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांतील गावांना वरदायी आहे. धरणातील जवळपास चार टी.एम.सी. पाणी कर्नाटक राज्याला देणे बंधनकारक आहे. गत पर्जन्यमानाचा विचार करून यावर्षी जवळपास एक टी.एम.सी. पाण्याची कपात करण्यात आली आहे. गतसालच्या पाणीसाठ्याचा विचार करता चालू वर्षी ८.६८ टी.एम.सी. पाणीसाठा कमी आहे. धरणात ६.३१ टी.एम.सी. पाणीसाठा असला तरी त्यापैकी मृतसाठा दीड टी.एम.सी. आहे. बाष्पीभवनाचा विचार करता केवळ ४ टी.एम.सी. पाणीसाठा वापरात येऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करून ते काटकसरीने वापरात येऊ शकते. धरणातून वा कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन संबंधित विभागाकडून होणे आवश्यक आहे. यामध्ये राजकीय हस्तक्षेप करून बागायतदार शेतकरी यांनी अडथळे आणले तर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो? शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. संबंधित कर्मचारी, अधिकारी यांनी क्षेत्रातील भागाची पाहणी करूनच पाण्याचे नियोजन करावे. पाण्याची बचत व पाण्याचा कमी वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन मेळावे घेणे आवश्यक आहे. पाणी नियोजनासाठी अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. काही शेतकरी रात्रीचे पाणी शेतात सोडून घरात निवांत करीत आहेत. पाणी पिकाऐवजी रस्त्यावर येत आहे. त्यांच्यावर कारवाई होणे अवाश्यक आहे. पाणीसाठा कमी होत आहे. धरणाने इतका ४.८१ टी.एम.सी. पाण्याचा तळ गाठण्याची स्थिती ही इतिहासात प्रथमच घडली आहे.