शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
8
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
9
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
10
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
11
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
12
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
13
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
14
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
15
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
16
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
17
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
18
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
19
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
20
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

जिल्ह्यात दहा महिन्यांत २० बालविवाह - पाठपुरावा करण्यात यंत्रणा कुचकामी : ग्राम बालसंरक्षण समित्याही नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:02 IST

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत बालविवाहाची २० प्रकरणे उघडकीस आली आहेत. या तुलनेत उघडकीस न आलेल्या बालविवाहांचे प्रमाण ...

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांत बालविवाहाची २० प्रकरणे उघडकीस आली आहेत. या तुलनेत उघडकीस न आलेल्या बालविवाहांचे प्रमाण अधिक असून, बालविवाह झालेल्या किंवा रोखलेल्या प्रकरणांत पुढे काय झाले याचा पाठपुरावा करण्यात यंत्रणा कुचकामी ठरली आहे; तर गावागावांत स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बालसंरक्षण समित्याही नावालाच असल्याचे चित्र आहे.

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात सर्वाधिक बालविवाह झाले आहेत. त्यांपैकी उघडकीस आलेल्या बालविवाहांची संख्या २० आहे. यांतील काही विवाह बालकल्याण समिती, चाईल्डलाईन अशा संस्थांनी रोखले आहेत. अशा बालविवाहांच्या प्रकरणांची माहिती मिळाल्यानंतर मुलगी सासरी नांदायला गेलेली असते, गर्भवती असते, या कारणांमुळे बहुतांश वेळा कारवाईच होत नाही. मुलीचा संसार मोडता काय, आयुष्याचं वाटोळं होईल, अशा विनंत्या करून प्रकरण थांबविले जाते. सुुरुवातीला काही दिवस प्रशासकीय यंत्रणांकडून पाठपुरावा केला जातो; नंतर मात्र त्याकडे दुर्लक्षच होते. बालहक्कांचे संरक्षण व्हावे, ग्रामीण भागातील बालविवाह रोखले जावेत, यासाठी २०१४ च्या शासन निर्णयानुसार गावागावांत ग्राम बालसंरक्षण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात हजाराच्या वर बालसंरक्षण समित्या आहेत; पण त्यांच्याकडून याबाबत ठोस कारवाईच केली जात नाही. ही समिती नऊ ते ११ सदस्यांची असते; किंबहुना अनेकजणांना हेच माहीत नसते की, आपण त्या समितीत आहाेत, ज्यांना माहीत असते, त्यांच्यात बालसंरक्षण म्हणजे नेमके काय करायचे आहे, याबद्दल अज्ञान आहे.

............................................

बालविवाहाची कारणे

- गरिबी, आर्थिकदृष्ट्या मागासलेपण

- बालविवाहाच्या तोट्यांबद्दल अज्ञान

- मुलीने पळून जाऊन विवाह करणे

- मुलीचे प्रेमसंबंध समजल्याने कुटुंबीयांनी लग्न लावून देणे.

.............................................

विवाह रोखण्याची जबाबदारी

बालविवाह रोखण्याची जबाबदारी बालविवाह नियंत्रण अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, ग्राम बालसंरक्षण समिती, पोलीस प्रशासन यांच्यासह चाईल्डलाईन व बालकल्याण समितीसारख्या संस्थांची आहे. बालविवाह होऊ द्यायचे नसतील तर त्यामागील कारणांवर उपाययोजना केल्या पाहिजेत, जे व्यवस्थेकडून होत नाहीत.

..........................................

पाठपुरावा, कारणांवर उपाययोजना हव्यात

अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना बालकल्याण समितीसमोर सादर केले जाते. समिती मुलगी वयाची १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत तिला शासकीय संस्था ठेवून घेते किंवा पालकांकडून बंधपत्र घेऊन तिला पालकांच्या ताब्यात दिले जाते; पण दर महिन्याला तिला समितीसमोर सादर करणे बंधनकारक असते. सुरुवातीला काही दिवस ही प्रक्रिया इमानेइतबारे केली जाते; पण नंतर सासरकडून मुलीला नेण्यासाठी घाई होते. लग्नाची मुलगी किती दिवस माहेरी ठेवायची या मानसिकतेतून एक तर गुपचूप लग्न लावले जाते. लग्न झाले असेल तर मुलीला सासरी पाठविले जाते. या सगळ्यांचा पाठपुरावा मात्र संंबंधित यंत्रणेकडून होत नाही.

......................................