शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

कोल्हापूर १९४ जागांसाठी अठरा हजार अर्ज

By admin | Updated: September 4, 2014 00:17 IST

जिल्हा परिषदेतील भरती : सर्वाधिक ८४६० अर्ज परिचर पदासाठी

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या वर्ग-३ व वर्ग-४ च्या १९४ जागांसाठी तब्बल १८ हजार ३५८ इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. आज, बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हा परिषदेमध्ये इच्छुकांची एकच गर्दी उसळली होती. सर्वाधिक अर्ज परिचर पदासाठी आठ हजार ४६० इतके दाखल झाले आहेत. जिल्हा परिषदेने वर्ग-३ व वर्ग-४ मधील सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू केली होती. कनिष्ठ अभियंता, आरोग्यसेवक यांसह विविध विभागांतील रिक्त १९४ पदांची जम्बो भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. त्यानुसार गेले दहा दिवस प्रत्यक्ष अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. काही अर्ज पोस्टाने दाखल झाले आहेत, तर बहुतांशी जणांनी प्रत्यक्ष येऊनच अर्ज दाखल केल्याने गर्दी उसळली होती. आज अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने सायंकाळी सहापर्यंत इच्छुकांनी गर्दी केली होती. या सर्व जागांमध्ये महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अंशकालीन, अपंग यासाठी राखीव जागा आहेत. या सर्व जागांसाठी २ नोव्हेंबर २०१४ पासून लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)विभागनिहाय जागा, कंसात आलेले अर्ज कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - ५ (२६४), आरोग्यसेवक (महिला)- ३१ (११००), शिक्षण विस्तार अधिकारी- २ (५३१), पर्यवेक्षिका (महिला) - १ (५२३), वरिष्ठ साहाय्यक (लेखा) - २ (३९९), औषध निर्माण अधिकारी - २ (१२१), आरोग्यसेवक (पुरुष) - १३ (२१४), कनिष्ठ आरेखक - ६ (१०७)कंत्राटी ग्रामसेवक - ५३ (४७३२), स्थापत्य अभियांत्रिकी साहाय्यक - ३० (९२८), वरिष्ठ साहाय्यक (लिपिक) - २ (३२५), परिचर - ४३ (८४६०), कनिष्ठ साहाय्यक - २ (२०८), कनिष्ठ लेखाधिकारी - १ (४३)