शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

पूरग्रस्त भागातील आठ हजार व्यापाऱ्यांचे १७०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागात आलेल्या महापुरामध्ये हजारो कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हजारो व्यापाऱ्यांचे ...

कोल्हापूर : महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र विभागात आलेल्या महापुरामध्ये हजारो कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हजारो व्यापाऱ्यांचे सर्वस्व नष्ट झाले आहे. अशा व्यापाऱ्यांना सरकारने तत्काळ नुकसानभरपाई देऊन, पुन्हा व्यापार सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली.

समाजातील सर्वच घटक महापुराच्या संकटात सापडले आहेत. अशा घटकांना अन्य सुस्थितीतील व्यापारी व उद्योजक मोठ्या प्रमाणात मदत कार्य करीत आहेत. पुराच्या कालखंडात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याला प्राधान्य देण्यात येत आहे. मात्र, व्यापाऱ्यांचे नुकसान प्रचंड आहे. ‘महाराष्ट्र चेंबर’ तर्फे करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये या सहा जिल्ह्यातील सुमारे आठ हजार व्यापाऱ्यांचे सर्वस्व वाहून गेले आहे. त्यांच्या आरंभिक नुकसानीचा आकडा १७०० कोटी रुपये आहे. ‘महाराष्ट्र चेंबर’चे पदाधिकारी लवकरच पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. सर्वसामान्य नागरिक व व्यापारी उद्योजक यांच्या नुकसानीची माहिती घेऊन समाजाच्या स्तरावर होऊ शकणारी मदत आणि सरकारकडून नुकसानभरपाई व मदत मिळण्यासाठी ‘महाराष्ट्र चेंबर’तर्फे पाठपुरावा करणार असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.