शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

गडहिंग्लजच्या न्यायमंदिरास १५० वर्षांचा इतिहास

By admin | Updated: April 8, 2017 00:16 IST

तिसरी पिढी वकिलीत : अद्ययावत न्यायालयीन इमारतीचे उद्या उद्घाटन; सर्व न्यायालये आली एकाच छताखाली

राम मगदूम ---गडहिंग्लज-१८८१ पूर्वी ब्रिटिश आमदानीत सुरू झालेल्या येथील न्यायमंदिराला सुमारे १५० वर्षांचा वैभवशाली इतिहास आहे. सुरूवातीला हे न्यायालय कडगावमध्ये होते. त्यानंतर ते गडहिंग्लजला स्थलांतरित झाले. जुन्या पिढीतील नामवंत विधीतज्ज्ञांच्या तिसऱ्या पिढीसह सुमारे १२५ वकील याठिकाणी आपला व्यवसाय करीत आहेत. सध्या दोन ठिकाणी चालणाऱ्या ४ न्यायालयांसाठी बांधण्यात आलेल्या अद्ययावत न्यायसंकुलाचे उद्घाटन उद्या, रविवारी सकाळी १०.३० वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राजेंद्र सावंत यांच्याहस्ते होत आहे. १५० वर्षांपूर्वी कडगाव येथे न्यायालयाची स्थापना झाली. त्या कोर्टात काम करणारे येथील वकील स्व. बसलिंगाप्पा शिवरूद्राप्पा कोरी यांच्या प्रयत्नाने हे न्यायालय कडगावहून गडहिंग्लजला स्थलांतरित झाले. ते वर्ष होते १८८१. गडहिंग्लज, आजरा, चंदगडसह त्यावेळच्या मुंबई प्रांतातील रामदुर्ग, कटकोळ व तोरगल इत्यादी सध्याच्या सीमाभागातील परिसरापर्यंत या न्यायालयाची अधिकार कक्षा होती. १९५२-५३ पर्यंत करवीर संस्थानच्या अधिपत्याखालीच न्यायालयाचे कामकाज चालत होते.१९८८ मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मामलेदार, कचेरी, पोलिस ठाणे व न्यायालयासाठी दगडी इमारत बांधून दिली. दरम्यान, महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तीन तालुक्यांसाठी स्वतंत्र न्यायालयाची स्थापना झाली. मात्र, त्यासाठी स्वतंत्र न्यायाधीश नव्हते. १९६२ ते १९८० पर्यंत येथील न्यायाधीश ८ दिवस आजऱ्याला, तर ८ दिवस चंदगडला न्यायदानासाठी जात उर्वरित कालावधीत ते गडहिंग्लजच्या कोर्टाचे कामकाज सांभाळत.१९८८ मध्ये वकील संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील न्यायालयाची शताब्दी साजरी केली. त्यावेळी त्यांनी गडहिंग्लज, आजरा, चंदगड व भुदरगड तालुक्यांसाठी अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासंबंधीचा प्रस्ताव पाठविणेची सूचना करण्याबरोबरच त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले.१९८९ मध्ये तसा प्रस्ताव उच्च न्यायालयाकडे पाठविण्यात आला. १९९१ मध्ये त्यास तत्वत: मंजुरी मिळाली. मात्र, पुरेशी इमारत नसल्यामुळे नगरपालिकेने खास इमारत बांधून दिली. २१ मार्च १९९६ पासून याठिकाणी जिल्हा न्यायालयाचे कामकाजदेखील सुरू झाले. दरम्यान, येथील सर्व न्यायालये एकाच छताखाली यावीत म्हणून वकील संघटनेने पाठपुरावा केला. त्यामुळे येथील शिवाजी बोर्डिंगच्या प्रशस्त जागेपैकी ३ हेक्टर ४ गुंठे इतकी जागा न्यायालयीन इमारतीसाठी संपादित करण्यात आली. त्याठिकाणी सुमारे १४ कोटी, २४ लाखाची ही न्यायसंकुलाची ही इमारत उभारली आहे.जुन्या पिढीतील विधीतज्ज्ञबी. एस. कोरी, व्ही. बी. कोरी, एस. व्ही. कोरी, डी ए. अंकलीकर, एस. आर. कुलकर्णी, के. एस. तोडकर, बी. वाय. देशपांडे, डी. के. दंडगे, जी. के. सोहनी, के. ए. नेसरीकर, एन. के. पाटील, एम. बी. मुजूमदार, आर. वाय. देशपांडे, बी. जी. उत्तुरे, एस. के.तोडकर, एम. ए. बामणे, आण्णासाहेब माळगी, भिमराव बेकनाळकर जे. जे. बार्देस्कर, मुरगोडकर-कुलकर्णी, हमीदवाडकर, पुजारी, ठाकूर, जी. के. सोहनी, खंडो गणेश गर्दे, दिलीप देशपांडे, हिडदुगी, पेडणेकर, मुतालीक-बसर्गेकर, फडणीस, बाळकृष्ण बेकनाळकर, दुंडाप्पा चनबसाप्पा गाडवी, हरळीकर, भडगावकर, बाळकृष्ण मुजूमदार, लुकतुके, बाबूराव हनिमनाळकर, दत्तो आण्णाजी कुरुंदवाडकर.पाच वकील झाले आमदारव्ही. के. चव्हाण-पाटील, म. दुं. श्रेष्ठी, आप्पासाहेब नलवडे, बी. एस. पाटील व श्रीपतराव शिंदे.११ वकील बनले न्यायाधीशआर. व्ही. रोटे, एस. एन. पाटील, के. एस. बागी, एस. एस. चंदगडे , एल. डी. हुली , व्ही. ए. पाटील , रवी नडगदल्ली , व्ही. एम. रेडकर, मकरंद कुलकर्णी , एस. आर. मोकाशी, श्रीकांत पचंडी.यांचे योगदान मोलाचेविद्यमान जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी सहकाऱ्यांसह गावोगावी विधी साक्षरतेसाठी अनेक शिबिरे घेतली. वकिलांसाठी अभ्यास मंडळ सुरू केले. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह जनतेत हक्क आणि कर्तव्यांविषयी मोठी जनजागृती झाली. किंंबहुना, त्यांच्या पाठपुराव्यामुळेच न्यायसंकुलाचे बांधकाम गतीने पूर्ण झाले. वकील संघटनेचे अध्यक्ष सुधाकर पोवार, उपाध्यक्ष पुंडलिक गावडे व सहकाऱ्यांनीही याकामी विशेष परिश्रम घेतले.