शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

चाफवडेतील १५० कुटुंबांना घराचा मोबदला देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:27 IST

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी लघु पाटबंधारे प्रकल्पातील ज्यांची शेती धरणाच्या एका बाजूला व गाव दुसरीकडे आहे अशा चाफवडे ...

कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी लघु पाटबंधारे प्रकल्पातील ज्यांची शेती धरणाच्या एका बाजूला व गाव दुसरीकडे आहे अशा चाफवडे येथील १५० कुटुंबांना पुनर्मुल्यांकन करून घरांचा मोबदला देण्याचा निर्णय सोमवारी येथे झालेल्या प्रकल्प आढावा बैठकीत झाला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बैठकीतून कृष्णाखोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक रजपूत यांच्याशी व्हीसीद्वारे चर्चा केली व घरांचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. या लोकांना घरांचा मोबदला मिळालेला नाही. कारण ही घरे बुडीत क्षेत्रात येत नाहीत परंतु त्यांची शेती एका बाजूला व दुसरीकडे घरे येतात व मध्ये धरण येत असल्याने त्यांची कुचंबणा होते. त्यामुळे त्यांच्यासाठी काय करता येईल अशा विविध पर्यायांवर यापूर्वी विचार केल्यानंतर घरांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. खास बाब त्यास मंजुरी देऊ असे जलसंपदा मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न १५ जूनपर्यंत मार्गी लावावेत, त्यांना योग्य मोबदला द्यावा, या प्रकल्पातील आक्षेपार्ह जमिनी व अडचणीबाबत अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पर्यायी योग्य तो मार्ग काढावा असेही मंत्री पाटील यांनी बजावले. जिल्हाधिकारी कार्यालयात उचंगी प्रकल्पग्रस्तांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार (पुनर्वसन) वैभव पिलारे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, शिवसेनेचे विजय देवणे, धरणग्रस्तांचे प्रतिनिधी धनाजी गुरव, संपत देसाई, संजय तरडेकर, अशोक जाधव उपस्थित होते

मंत्री पाटील म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मंत्रालय स्तरावरुन लागेल ती मदत करु. या प्रकल्पासाठी ज्यांची जमीन संपादित केली आहे त्यांना योग्य तो आर्थिक मोबदला देण्यात यावा. कोणाचेही आर्थिक नुकसान होता कामा नये. ज्यांची घरे बाधित झाली आहे.

यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या वतीने श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई, धनाजी गुरव, संजय तरडेकर यांनी विविध मागण्या केल्या. या प्रकल्पामुळे बाधितांना संकलन रजिस्टर नुसार जमीन देण्यात यावी, आम्हाला आमच्या हक्कांपासून वंचित ठेवू नका, संपादित केल्या जाणाऱ्या घरांचे योग्य ते मूल्यांकन करा, शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय द्या असा आग्रह धरला. अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी उचंगी प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती दिली.

--

हेक्टरी ४० लाखांची मदत

आजरा-भुदरगडचे प्रांताधिकारी संपत खिलारे यांनी या प्रकल्पामध्ये २८८ प्रकल्पग्रस्त असून चार गावे बाधित आहेत. प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी ४० लाख रुपयांप्रमाणे रकमेचे वाटप करण्यात आल्याची माहिती दिली. ज्या प्रकल्पग्रस्तांना अत्यंत कमी रक्कम स्वेच्छा पुनर्वसन अनुदान म्हणून मिळाली आहे त्या २० लोकांना वाढीव सानुग्रह अनुदानासाठी फेरप्रस्ताव पाठवण्याचा निर्णय झाला.

कोट :

प्रकल्प मार्गी लागायचा असेल तर मूलभूत प्रश्नांवर धोरणात्मक निर्णय व्हायला हवेत. जिल्हाधिकारी व प्रातांधिकारी यांनी घेतलेला आढावा मान्य आहे.

संपत देसाई

धरणग्रस्त नेते.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

-निर्वाह क्षेत्र पुनर्वसनाकरिता अपात्र ठरलेल्या ४० लोकांच्या जमिनींबाबत फेर तपासणी.

-पुनर्वसनासाठी चितळे व जेऊर या गावातील संपादित गायरान जमिनीचे तातडीने वाटप.

-प्रकल्पग्रस्तांना जेथील जमिनी दिल्या आहेत त्याच गावातील वाढीव गावठाणमधील भूखंडाची पाहणी अहवाल करणे.

----

फोटो नं २४०५२०२१-कोल-उचंगी बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उचंगी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला. यावेळी ए. वाय. पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, धनाजी गुरव, संपत देसाई यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

--