शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायती कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या १४ दिवसांपासून एकही कोरोना रूग्ण न मिळाल्याने जिल्ह्यातील १०२५पैकी १२७ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेल्या १४ दिवसांपासून एकही कोरोना रूग्ण न मिळाल्याने जिल्ह्यातील १०२५पैकी १२७ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. यामध्ये आजरा तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या सर्वाधिक आहे.

जिल्ह्याला पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा तडाखा जोरात बसला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेल्याचे मे आणि जून महिन्यात दिसून आले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात येण्या-जाण्यावर असणारे निर्बंध, गावातच संस्थात्मक विलगीकरणाची सक्ती, आजाराचा अंदाज नसल्याने भीतीमुळे घेतली गेलेली दक्षता यामुळे ग्रामीण भागातील संसर्गाला थोडा प्रतिबंध झाला होता. परंतु, दुसऱ्या लाटेवेळी मात्र गावागावात आणि घराघरात बाधितांची संख्या वाढू लागली. कोरोना झाल्यानंतरही घरातच राहण्याचाही तोटा यावेळी झाला. त्यामुळे एकाच घरातील रूग्णांची संख्याही वाढत गेली.

या पार्श्वभूमीवर वरील आकडेवारीही दिलासादायक आहे. या १२७ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात २३ जूनपासूनच्या आधीच्या १४ दिवसांत कोरोनाचा एकही रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी पुन्हा संसर्ग होऊ नये, यासाठी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

चौकट

तालुकावार कोरोनामुक्त ग्रामपंचायती

आजरा ३९, भुदरगड ०, गडहिंग्लज ३, गगनबावडा २०, चंदगड १३, हातकणंगले ३, कागल १०, करवीर १७, पन्हाळा ४, राधानगरी ३, शाहूवाडी १३, शिरोळ २

चौकट

गेल्या सव्वा वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोरोनाची लागण झाली आहे. त्या अर्थाने एकाही ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र हे कोरोनामुक्त नव्हते. मात्र, गेल्या १४ दिवसांपासून गावात एकही कोरोनाचा रूग्ण नसलेल्या १२७ ग्रामपंचायती सध्या असून, ही संख्या वाढत चालली आहे.

- अरूण जाधव

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर