शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायती कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या १४ दिवसांपासून एकही कोरोना रूग्ण न मिळाल्याने जिल्ह्यातील १०२५पैकी १२७ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेल्या १४ दिवसांपासून एकही कोरोना रूग्ण न मिळाल्याने जिल्ह्यातील १०२५पैकी १२७ ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. यामध्ये आजरा तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या सर्वाधिक आहे.

जिल्ह्याला पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा तडाखा जोरात बसला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेल्याचे मे आणि जून महिन्यात दिसून आले आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात येण्या-जाण्यावर असणारे निर्बंध, गावातच संस्थात्मक विलगीकरणाची सक्ती, आजाराचा अंदाज नसल्याने भीतीमुळे घेतली गेलेली दक्षता यामुळे ग्रामीण भागातील संसर्गाला थोडा प्रतिबंध झाला होता. परंतु, दुसऱ्या लाटेवेळी मात्र गावागावात आणि घराघरात बाधितांची संख्या वाढू लागली. कोरोना झाल्यानंतरही घरातच राहण्याचाही तोटा यावेळी झाला. त्यामुळे एकाच घरातील रूग्णांची संख्याही वाढत गेली.

या पार्श्वभूमीवर वरील आकडेवारीही दिलासादायक आहे. या १२७ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात २३ जूनपासूनच्या आधीच्या १४ दिवसांत कोरोनाचा एकही रूग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी पुन्हा संसर्ग होऊ नये, यासाठी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.

चौकट

तालुकावार कोरोनामुक्त ग्रामपंचायती

आजरा ३९, भुदरगड ०, गडहिंग्लज ३, गगनबावडा २०, चंदगड १३, हातकणंगले ३, कागल १०, करवीर १७, पन्हाळा ४, राधानगरी ३, शाहूवाडी १३, शिरोळ २

चौकट

गेल्या सव्वा वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोरोनाची लागण झाली आहे. त्या अर्थाने एकाही ग्रामपंचायतीचे कार्यक्षेत्र हे कोरोनामुक्त नव्हते. मात्र, गेल्या १४ दिवसांपासून गावात एकही कोरोनाचा रूग्ण नसलेल्या १२७ ग्रामपंचायती सध्या असून, ही संख्या वाढत चालली आहे.

- अरूण जाधव

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर