शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कोर्टाची पायरी न चढता सावरले १२२ संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:41 IST

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : केवळ समज-गैरसमजांमुळे तुटण्यापर्यंत आलेले संसार महिला बालविकास विभागाच्या सखी वन स्टॉप ...

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : केवळ समज-गैरसमजांमुळे तुटण्यापर्यंत आलेले संसार महिला बालविकास विभागाच्या सखी वन स्टॉप उपक्रमामुळे सावरू लागले आहेत. जिल्ह्यात गेल्या सात महिन्यात तब्बल १२२ जणींची संसारवेल पुन्हा बहरली आहे. विशेष म्हणजे आलेल्या १३० तक्रारींपैकी १२२ तक्रारी या कोर्टाची पायरी न चढता केवळ समुपदेशनाने सुटल्या आहेत.

महिलांवरील अन्याय, अत्याचाराची कुठेही जाहीर वाच्यता न करता त्याच्या सोडवणुकीसाठी म्हणून एकाच छताखाली समुपदेशन, वैद्यकीय, न्यायालयीन बाबी याव्यात म्हणून राज्य सरकारने ‘सखी वन स्टॉप’ या नावाने उपक्रम सुरू केला. सुरुवातीपासूनच याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापुरात विचारेमाळ येथे १६ खोल्यांच्या कार्यालयात केंद्राचे काम चालते. १४ कर्मचाऱ्यांचा स्टाफ मंजूर आहे, पण सध्या १० जण कार्यरत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काम चालणाऱ्या या केंद्राच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पाचगावमधील आनंदीबाई बहुउद्देशीय महिला संस्थेकडे दिली आहे.

चौकट ०१

लॉकडाऊन काळात तक्रारींत वाढ

लॉकडाऊन काळात तक्रारींचे प्रमाण वाढले. आलेल्या १३० पैकी तब्बल ९९ तक्रारी या लॉकडाऊन काळात आणि त्याही पती-पत्नीच्या वादाच्याच होत्या. या काळात बाहेर जाता येत नसल्याने ‘सखी वन स्टॅाप केंद्रा’ने यु ट्यूब, फेसबुक, व्हाॅटस ॲपसारख्या समाजमाध्यमासह फोनवरूनही संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यावर महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि या सर्व तक्रारींचे फोनवरच निराकरणदेखील झाले हे जास्त मोलाचे.

चौकट ०२

केंद्राकडे आलेल्या १३० पैकी १२२ तक्रारींचे निराकरण झाले आहे. ७ तक्रारींची कार्यवाही सुरू आहे. एक तक्रारदाराची वैद्यकीय चाचणी झाली आहे. उर्वरीत तक्रारी केवळ समुपदेशाने सुटल्या आहेत.

चौकट ०३

काय असते तक्रारीचे स्वरूप

पतीकडून मारहाण, कुटुंबीयांशी न पटणे, आर्थिक विवंचना, नवऱ्याचे व्यसन, जवळच्या नातेवाईकांकडून अत्याचार, विनयभंग

प्रतिक्रिया

महिलेवर अन्याय, अत्याचार होत असेल तर तिने व्यक्त व्हावे यासाठी या केंद्राची भूमिका महत्त्वाची ठरते. तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेणे, जास्तीत जास्त नाते सावरण्याचा प्रयत्न करण्यावर भर दिला जातो, अगदीच टोकाचे असेल तरच कोर्टाकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. आम्ही गेल्या सात महिन्यांतही एकही केस कोर्टापर्यंत पोहोचू दिलेली नाही.

वैशाली महाडिक, अध्यक्षा, आनंदीबाई महिला संस्था