शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

१२ हजार हेक्टरवरील पिकेही बाधित

By admin | Updated: December 23, 2015 01:28 IST

-प्रदूषित पाण्याचा फटका : धान्य-भाजीपाला यामुळे आरोग्यावरही परिणाम--पंचगंगा काठ

अतुल आंबी - इचलकरंजी --पंचगंगा नदीकाठच्या गांधीनगर ते नृसिंहवाडी या परिसरातील ५७ गावांमधील १२३२५.२२ हेक्टर क्षेत्राला सध्या पंचगंगा नदीतील रासायनिकयुक्त प्रदूषित पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पिके ही कमी प्रतीची उत्पादित होत आहेत. दूषित पाणी व औषध फवारणी केलेली पिके, फळभाज्या खाल्ल्याने दिवसेंदिवस नागरिकांना वेगवेगळ््या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तरीही शासन डोळे मिटून गप्प आहे. पंचगंगा नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र २५८२ चौ.कि.मी. आहे. तर नदीखोऱ्यात एकूण लागवडीयुक्त क्षेत्र चार लाख ८२ हजार हेक्टर व लागवडीखालील क्षेत्र तीन लाख ७१ हजार ८२८ हेक्टर इतके आहे. त्यातील गांधीनगर ते नृसिंहवाडी या काठावर रुकडी पाटबंधारे विभागांतर्गत ३५२३.८० हेक्टर, इचलकरंजी ४९१७.४२, तर कुरुंदवाड ३८८४.०० हेक्टर असे एकूण १२३२५.२२ हेक्टर क्षेत्राला पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये शिरोली, नागाव, मौजे वडगाव, हालोंडी, गांधीनगर, मालेवाडी, मुडशिंगी, रुकडी, अतिग्रे, पट्टणकोडोली, तिळवणी, माणगाव, हातकणंगले, करवीर, वसगडे, सांगवडे, चिंचवाड, गडमुडशिंगी, जठारवाडी, रुई, कबनूर, चंदूर, अब्दुललाट, शिरदवाड, शिरढोण, नांदणी, कुरुंदवाड, शिरोळ अशा ५७ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये प्रामुख्याने ऊस पीक असले, तरी अनेक गावांमध्ये हंगामी आंतरपिके गहू, खपली, भुईमूग, भात यासह टोमॅटो, कोबी व अनेक प्रकारच्या भाजीपाल्यांचे उत्पादन केले जाते.या नदीच्या पाण्यावर शेती करून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नात भर घातली आहे. गावांसह शहरातील लोकांनाही भाजीपाला व धान्यांचा पुरवठा केला. मात्र, पंचगंगा प्रदूषणामुळे दूषित पाणी या पिकांना द्यावे लागत आहे. परिणामी, पीकही तशा प्रतीचेच उत्पादित होत आहे. अनेक ठिकाणी दूषित पाण्यामुळे भाजीपाला, धान्य यासह उसाच्या शेतीवरही किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही कीड रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. संपूर्ण नदीकाठावरील शेतीमधे घनरूप ७८.४२७ टन व द्रवरूपामधे ४५.५६० लिटर रासायनिक खते व कीटकनाशके शेतीमधे वापरली जातात. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होण्याबरोबरच लोकांनाही कीटकनाशकांच्या औषध उपचारांवर उगवलेला भाजीपाला व धान्य वापरावे लागत आहे.जमिनी खराबनदीकाठावरील या परिसरातील कित्येक गावांमध्ये या प्रदूषित पाण्यामुळे शेत जमिनीतील क्षार कमी होऊन (मीठ फुटल्याने) त्या शेतीची प्रत ढासळणे, उत्पादन कमी होणे, जमीन नापीक होणे, असे प्रकार घडत आहेत. पाण्याचा निचरा न होणाऱ्या कित्येक एकर जमिनी अशा प्रकारे खराब झाल्या आहेत.पंचगंगा नदी गावालगत असली तरी पिण्यासाठी आम्ही दुसऱ्या नदीचे पाणी वापरतो. मात्र, शेतीला हेच पाणी वापरावे लागत आहे. पावसाळा वगळता इतरवेळी पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त व प्रदूषित असते. हेच पाणी पिकांना पाजवावे लागते. त्यामुळे शेतजमीन, पिकांना तसेच पाणी पाजविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पायांना या पाण्याचा त्रास होतो.- अमित पाटील, ग्रामस्थ, हेरवाड.