शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजार हेक्टरवरील पिकेही बाधित

By admin | Updated: December 23, 2015 01:28 IST

-प्रदूषित पाण्याचा फटका : धान्य-भाजीपाला यामुळे आरोग्यावरही परिणाम--पंचगंगा काठ

अतुल आंबी - इचलकरंजी --पंचगंगा नदीकाठच्या गांधीनगर ते नृसिंहवाडी या परिसरातील ५७ गावांमधील १२३२५.२२ हेक्टर क्षेत्राला सध्या पंचगंगा नदीतील रासायनिकयुक्त प्रदूषित पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पिके ही कमी प्रतीची उत्पादित होत आहेत. दूषित पाणी व औषध फवारणी केलेली पिके, फळभाज्या खाल्ल्याने दिवसेंदिवस नागरिकांना वेगवेगळ््या आजारांना सामोरे जावे लागत आहे. तरीही शासन डोळे मिटून गप्प आहे. पंचगंगा नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र २५८२ चौ.कि.मी. आहे. तर नदीखोऱ्यात एकूण लागवडीयुक्त क्षेत्र चार लाख ८२ हजार हेक्टर व लागवडीखालील क्षेत्र तीन लाख ७१ हजार ८२८ हेक्टर इतके आहे. त्यातील गांधीनगर ते नृसिंहवाडी या काठावर रुकडी पाटबंधारे विभागांतर्गत ३५२३.८० हेक्टर, इचलकरंजी ४९१७.४२, तर कुरुंदवाड ३८८४.०० हेक्टर असे एकूण १२३२५.२२ हेक्टर क्षेत्राला पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. यामध्ये शिरोली, नागाव, मौजे वडगाव, हालोंडी, गांधीनगर, मालेवाडी, मुडशिंगी, रुकडी, अतिग्रे, पट्टणकोडोली, तिळवणी, माणगाव, हातकणंगले, करवीर, वसगडे, सांगवडे, चिंचवाड, गडमुडशिंगी, जठारवाडी, रुई, कबनूर, चंदूर, अब्दुललाट, शिरदवाड, शिरढोण, नांदणी, कुरुंदवाड, शिरोळ अशा ५७ गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये प्रामुख्याने ऊस पीक असले, तरी अनेक गावांमध्ये हंगामी आंतरपिके गहू, खपली, भुईमूग, भात यासह टोमॅटो, कोबी व अनेक प्रकारच्या भाजीपाल्यांचे उत्पादन केले जाते.या नदीच्या पाण्यावर शेती करून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नात भर घातली आहे. गावांसह शहरातील लोकांनाही भाजीपाला व धान्यांचा पुरवठा केला. मात्र, पंचगंगा प्रदूषणामुळे दूषित पाणी या पिकांना द्यावे लागत आहे. परिणामी, पीकही तशा प्रतीचेच उत्पादित होत आहे. अनेक ठिकाणी दूषित पाण्यामुळे भाजीपाला, धान्य यासह उसाच्या शेतीवरही किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही कीड रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. संपूर्ण नदीकाठावरील शेतीमधे घनरूप ७८.४२७ टन व द्रवरूपामधे ४५.५६० लिटर रासायनिक खते व कीटकनाशके शेतीमधे वापरली जातात. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होण्याबरोबरच लोकांनाही कीटकनाशकांच्या औषध उपचारांवर उगवलेला भाजीपाला व धान्य वापरावे लागत आहे.जमिनी खराबनदीकाठावरील या परिसरातील कित्येक गावांमध्ये या प्रदूषित पाण्यामुळे शेत जमिनीतील क्षार कमी होऊन (मीठ फुटल्याने) त्या शेतीची प्रत ढासळणे, उत्पादन कमी होणे, जमीन नापीक होणे, असे प्रकार घडत आहेत. पाण्याचा निचरा न होणाऱ्या कित्येक एकर जमिनी अशा प्रकारे खराब झाल्या आहेत.पंचगंगा नदी गावालगत असली तरी पिण्यासाठी आम्ही दुसऱ्या नदीचे पाणी वापरतो. मात्र, शेतीला हेच पाणी वापरावे लागत आहे. पावसाळा वगळता इतरवेळी पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त व प्रदूषित असते. हेच पाणी पिकांना पाजवावे लागते. त्यामुळे शेतजमीन, पिकांना तसेच पाणी पाजविणाऱ्या शेतकऱ्यांच्या पायांना या पाण्याचा त्रास होतो.- अमित पाटील, ग्रामस्थ, हेरवाड.