शहरं
Join us  
Trending Stories
1
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
2
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
3
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
4
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
5
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
6
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
7
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
8
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
9
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
10
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
11
"सीमा उघडा, आम्हाला वाचवा..."; बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंची भारताकडे विनवणी
12
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
13
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
14
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
15
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
16
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
17
Tarot Card: येत्या आठवड्यात वर्ष बदलतेय, त्याबरोबर भाग्यही बदलणार? वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
18
भाजपा नेत्याच्या कारने ५ जणांना चिरडलं; जमावाने पकडलं, मात्र पोलिसांच्या तावडीतून आरोपी फरार
19
Malegaon Municipal Corporation Election : मालेगावात भाजपा-शिंदेसेनेची युती अधांतरी, कार्यकर्त्यांत संभ्रम; गिरीश महाजनांना साकडं
20
आपल्या मुलांसाठी LIC च्या 'या' स्कीममध्ये करू शकता गुंतवणूक; जबरदस्त रिटर्नसह मिळेल इन्शुरन्स, पटापट पाहा डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

बियाणांसाठी ११०३ अर्ज; मिळाले २१९ शेतकऱ्यांना.. !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्जांची संख्या वाढल्याने लॉटरी काढली गेली. त्यात अर्ज केलेल्या ११०३ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अनुदानित बियाणांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्जांची संख्या वाढल्याने लॉटरी काढली गेली. त्यात अर्ज केलेल्या ११०३ पैकी केवळ २१९ शेतकऱ्यांचीच निवड केली आहे. प्रत्यक्ष लाॅटरीवेळी भात, सोयाबीन, मका ही पिके वगळल्याने केवळ १९ टक्केच शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरले असून, ८८४ जण वंचित राहिले आहेत. आता या शेतकऱ्यांना सोमवारी तूर आणि नाचणीचे बियाणे घेऊन जाण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान २१० शेतकऱ्यांना नाचणीचे बियाणे मोफत, तर ९ जणांना तुरीचे बियाणे २० टक्के सवलतीत दिले आहे.

राष्ट्रीय अन्नधान्य विकास मोहिमेंतर्गत चांगले, दर्जेदार बियाण्यांच्या निर्मिती व्हावे म्हणून शेतकऱ्यांना बियाणे उत्पादनासाठी उद्युक्त केले जात आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याला तूर आणि नाचणीचे बियाणे निश्चित केले आहे. हे पायाभूत बियाणे असल्याने त्याचे उत्पादन करून पुढील वेळी पेरणीसाठी वापरता येणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाकडून हे बियाणे दिले जाणार असल्याने ११०३ शेतकऱ्यांनी अर्ज केला होता; पण प्रत्यक्षात २१९ जणांनाच त्याचा लाभ झाला असून, ८८४ जण यापासून वंचित राहिले आहेत.

१) अनुदानित बियाणांसाठी आलेले अर्ज - ११०३

लॉटरी किती जणांना - २१९ (नाचणीचे २१०, तुरीचे ९)

२) कोणत्या तालुक्यात किती?

नाचणीचे बियाणे: २१० शेतकरी गडहिग्लज: १९ पन्हाळा: ९७ शाहूवाडी: ९४

तूर बियाणे: कागल ०९ शेतकरी

चौकट

ज्या शेतकऱ्यांनी हे बीजोत्पादन घेतले आहे, त्यांच्याकडून ते बियाणे पुढील वर्षाच्या पेरणीसाठी विकत घेतले जाणार आहे. हे बियाणे महाबीजकडून पूर्णपणे मोफत वाटण्यात आले आहे. फक्त तुरीच्या बियाण्याला २० टक्के सवलत दिली आहे.

चौकट

बीजोत्पादनासाठी प्रोत्साहन म्हणून प्रात्यक्षिक पिकासाठी भात, सोयाबीन, मका, नाचणी, तूर या बियाण्यांची शिफारस कृषी विभागाकडून या योजनेसाठी करण्यात आली होती. त्यानुसार अर्जही मागण्यात आले; पण शासनाने नाचणी आणि तुरीचाच समावेश करण्याचा निर्णय घेतल्याने अन्य पिकांसाठी मागणी केलेले शेतकरी यापासून बाहेर फेकले गेले. त्यामुळेच अर्ज केलेल्यांची संख्या व प्रत्यक्ष लाभ मिळालेलींची संख्या यात तब्बल ८० टक्क्यांचा फरक येत आहे.