शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दहावी, बारावीतील ‘अंधार’भय संपणार

By admin | Updated: December 25, 2014 00:01 IST

विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा केंद्रांवर जनरेटरची व्यवस्था; शिक्षण मंडळाच्या सूचना

कोल्हापूर : अचानक वीज गेली, भारनियमन झाल्यानंतर मेणबत्तीच्या प्रकाशात, अंधाऱ्या वातावरणात यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांना जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कोल्हापूर विभागातील ४१७ परीक्षा केंद्रे या दृष्टीने सज्ज झाली आहेत.पेपर सुरू असताना अचानकपणे वीज गेल्यास, भारनियमन झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. एक प्रकारे अस्वस्थता निर्माण झाल्याने त्यांना पेपर सोडविणे त्रासदायक होते. असे काही प्रकार यापूर्वी घडले होते. त्याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेच्या कालावधीत सर्व परीक्षा केंद्रांवर वीजपुरवठ्याला पर्यायी व्यवस्था करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाला दिले आहेत. त्यानुसार शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिवांनी विभागातील परीक्षा केंद्रांना वीजपुरवठ्याला पर्याय म्हणून जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था करावी अशा सूचना २० नोव्हेंबर २०१४ रोजी पत्राद्वारे दिल्या. त्यावर दोन ते तीन दिवसांत परीक्षा केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, प्राचार्यांनी याबाबतच्या व्यवस्थेची माहिती शिक्षण मंडळाला फॅक्स, ई-मेल, पत्र आणि दूरध्वनीवरून संपर्कसाधून दिली. कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत दहावी, बारावीची एकूण ४७६ परीक्षा केंद्रे आहेत. त्यांपैकी ४१७ केंद्रांवर वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे. उर्वरित ५९ केंद्र संचालकांनी परीक्षेच्या कालावधीत ही व्यवस्था पुरविली जाईल, असे कळविले आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातून दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधील ‘अंधार’भय संपणार आहे. (प्रतिनिधी)