शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

दहावी, बारावीतील ‘अंधार’भय संपणार

By admin | Updated: December 25, 2014 00:01 IST

विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा केंद्रांवर जनरेटरची व्यवस्था; शिक्षण मंडळाच्या सूचना

कोल्हापूर : अचानक वीज गेली, भारनियमन झाल्यानंतर मेणबत्तीच्या प्रकाशात, अंधाऱ्या वातावरणात यंदा दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांना जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कोल्हापूर विभागातील ४१७ परीक्षा केंद्रे या दृष्टीने सज्ज झाली आहेत.पेपर सुरू असताना अचानकपणे वीज गेल्यास, भारनियमन झाल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. एक प्रकारे अस्वस्थता निर्माण झाल्याने त्यांना पेपर सोडविणे त्रासदायक होते. असे काही प्रकार यापूर्वी घडले होते. त्याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर फेब्रुवारी-मार्च २०१५ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षेच्या कालावधीत सर्व परीक्षा केंद्रांवर वीजपुरवठ्याला पर्यायी व्यवस्था करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाला दिले आहेत. त्यानुसार शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय सचिवांनी विभागातील परीक्षा केंद्रांना वीजपुरवठ्याला पर्याय म्हणून जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था करावी अशा सूचना २० नोव्हेंबर २०१४ रोजी पत्राद्वारे दिल्या. त्यावर दोन ते तीन दिवसांत परीक्षा केंद्र असलेल्या शाळा, महाविद्यालयांतील मुख्याध्यापक, प्राचार्यांनी याबाबतच्या व्यवस्थेची माहिती शिक्षण मंडळाला फॅक्स, ई-मेल, पत्र आणि दूरध्वनीवरून संपर्कसाधून दिली. कोल्हापूर विभागांतर्गत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत दहावी, बारावीची एकूण ४७६ परीक्षा केंद्रे आहेत. त्यांपैकी ४१७ केंद्रांवर वीजपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे. उर्वरित ५९ केंद्र संचालकांनी परीक्षेच्या कालावधीत ही व्यवस्था पुरविली जाईल, असे कळविले आहे. त्यामुळे कोल्हापूर विभागातून दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमधील ‘अंधार’भय संपणार आहे. (प्रतिनिधी)