शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

कल्याणच्या पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:45 IST

लवकरच होणार वाहतुकीसाठी खुला

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, लवकरच तो सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी येथे दिली. पत्रीपुलाच्या कामाची पाहणी शिंदे यांनी केली. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, रमेश जाधव, कैलास शिंदे, नवीन गवळी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे मार्गांवरील भागात पत्रीपुलाचा गर्डर टाकल्यानंतर तेथे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. स्लॅबचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पोहोच रस्त्याचे कामही आता पूर्ण होत आले आहे. त्यामुळे हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, कोरोना विषाणूच्या संकटामुळे या पुलाच्या कामाला विलंब झाला आहे. रेल्वे व राज्य रस्ते विकास महामंडळाने पत्रीपुलाच्या कामाला सहा महिन्यांची मुदतवाढ अलिकडेच दिली होती. त्यानंतर या पुलाचे काम एप्रिल, २०२१ मध्ये निश्चित पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्या आधीच पुलाचे काम पूर्ण होत असल्याचे शिंदे म्हणाले.

विरोधकांचा मुद्दा संपुष्टातपत्रीपुलाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यावर मात करीत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाच्या विलंबामुळे विरोधकांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले होते. मात्र, पुलाचे काम मार्गी लागत असल्याने विरोधकांचा मुद्दाच संपुष्टात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याण