शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

कल्याणच्या पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:45 IST

लवकरच होणार वाहतुकीसाठी खुला

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पत्रीपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, लवकरच तो सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहिती खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी येथे दिली. पत्रीपुलाच्या कामाची पाहणी शिंदे यांनी केली. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, रमेश जाधव, कैलास शिंदे, नवीन गवळी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे मार्गांवरील भागात पत्रीपुलाचा गर्डर टाकल्यानंतर तेथे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. स्लॅबचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. पोहोच रस्त्याचे कामही आता पूर्ण होत आले आहे. त्यामुळे हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाईल, असे श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.दरम्यान, कोरोना विषाणूच्या संकटामुळे या पुलाच्या कामाला विलंब झाला आहे. रेल्वे व राज्य रस्ते विकास महामंडळाने पत्रीपुलाच्या कामाला सहा महिन्यांची मुदतवाढ अलिकडेच दिली होती. त्यानंतर या पुलाचे काम एप्रिल, २०२१ मध्ये निश्चित पूर्ण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्या आधीच पुलाचे काम पूर्ण होत असल्याचे शिंदे म्हणाले.

विरोधकांचा मुद्दा संपुष्टातपत्रीपुलाच्या कामात अनेक तांत्रिक अडचणी होत्या. त्यावर मात करीत पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाच्या विलंबामुळे विरोधकांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले होते. मात्र, पुलाचे काम मार्गी लागत असल्याने विरोधकांचा मुद्दाच संपुष्टात येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :kalyanकल्याण