शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पत्रीपुलाच्या पोहोच रस्त्याचे काम लवकरच मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 23:42 IST

आयुक्तांकडून कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-ठाकुर्ली रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या व पत्रीपुलाला जोडणाऱ्या पोहोच रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. मागील पाच वर्षे रखडलेल्या या १०० मीटर रस्त्याचे काम आठवडाभरात पूर्ण होईल, अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.सूर्यवंशी यांनी बुधवारी या रस्त्याची पाहणी केली. याप्रसंगी साहाय्यक संचालक नगररचनाकार मा. द. राठोड, शहर अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे उपस्थित होते. ठाकुर्लीतील म्हसोबानगर ते पत्रीपुलापर्यंत २.२ किलोमीटर लांब व २४ मीटर रुंद रेल्वे समांतर रस्ता आहे. त्यापैकी १०० मीटर रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले होते.

पत्रीपुलाचा ७०० टन वजनाचा गर्डर टाकण्याच्या दिवशी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पोहोच रस्ता झालाच नाही, तर पत्रीपुलाचे काम पूर्ण होऊन उपयोग नाही. त्यामुळे आधी हा रस्ता पूर्ण करा, अशी मागणी केली होती. आयुक्तांच्या भेटीदरम्यान पाटील यांनी रस्तेबाधितांना न्याय देण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेचे परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी पोहोच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट करीत युद्धपातळीवर ते पूर्ण केले जाईल, असे सांगितले होते. पत्रीपुलाच्या कामाची पाहणी दोन दिवसांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्या वेळी काम अंतिम टप्प्यात असून, पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होईल, असे स्पष्ट केले होते.

वेळ, इंधनाची होणार बचतपत्रीपुलाच्या पोहोच रस्त्याच्या कामाची पाहणी सूर्यवंशी यांनी बुधवारी केली. या वेळी त्यांनी हा रस्ता आठवडाभरात पूर्ण होईल. त्यामुळे या रस्त्याद्वारे कल्याण-डोंबिवलीला ठाकुर्लीतील रेल्वे समांतरमार्गे प्रवास करता येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व इंधनाचीही बचत होईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

 

टॅग्स :kalyanकल्याण