शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पत्रीपुलाच्या पोहोच रस्त्याचे काम लवकरच मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 23:42 IST

आयुक्तांकडून कामाची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण-ठाकुर्ली रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या व पत्रीपुलाला जोडणाऱ्या पोहोच रस्त्याचे काम पूर्ण होत आले आहे. मागील पाच वर्षे रखडलेल्या या १०० मीटर रस्त्याचे काम आठवडाभरात पूर्ण होईल, अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.सूर्यवंशी यांनी बुधवारी या रस्त्याची पाहणी केली. याप्रसंगी साहाय्यक संचालक नगररचनाकार मा. द. राठोड, शहर अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे उपस्थित होते. ठाकुर्लीतील म्हसोबानगर ते पत्रीपुलापर्यंत २.२ किलोमीटर लांब व २४ मीटर रुंद रेल्वे समांतर रस्ता आहे. त्यापैकी १०० मीटर रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी रखडले होते.

पत्रीपुलाचा ७०० टन वजनाचा गर्डर टाकण्याच्या दिवशी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी पोहोच रस्ता झालाच नाही, तर पत्रीपुलाचे काम पूर्ण होऊन उपयोग नाही. त्यामुळे आधी हा रस्ता पूर्ण करा, अशी मागणी केली होती. आयुक्तांच्या भेटीदरम्यान पाटील यांनी रस्तेबाधितांना न्याय देण्याचीही मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेचे परिवहन सभापती मनोज चौधरी यांनी पोहोच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याचे स्पष्ट करीत युद्धपातळीवर ते पूर्ण केले जाईल, असे सांगितले होते. पत्रीपुलाच्या कामाची पाहणी दोन दिवसांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्या वेळी काम अंतिम टप्प्यात असून, पूल वाहतुकीसाठी लवकरच खुला होईल, असे स्पष्ट केले होते.

वेळ, इंधनाची होणार बचतपत्रीपुलाच्या पोहोच रस्त्याच्या कामाची पाहणी सूर्यवंशी यांनी बुधवारी केली. या वेळी त्यांनी हा रस्ता आठवडाभरात पूर्ण होईल. त्यामुळे या रस्त्याद्वारे कल्याण-डोंबिवलीला ठाकुर्लीतील रेल्वे समांतरमार्गे प्रवास करता येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ व इंधनाचीही बचत होईल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.

 

टॅग्स :kalyanकल्याण