शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
2
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
3
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
4
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
5
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
6
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
7
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
8
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
9
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
10
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
11
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
12
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
13
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
14
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
15
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
16
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
17
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
18
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
19
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
20
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!

आम्ही मेल्यावर आमची देणी देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 00:38 IST

एनआरसी कामगारांच्या विधवांचा सवाल : हाडामांसाची माणसं हक्काकरिता लढताहेत

मुरलीधर भवारलोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : घरामध्ये दिवाबत्ती नाही, पाण्याचा थेंब नाही, घरे मोडकळीस आली आहेत आणि कधीही बुलडोझर फिरवून उरलासुरला निवारा नष्ट केला जाईल, ही भीती, अशा अवस्थेतही हाडामासाची काही माणसं आपल्या हक्काकरिता लढत आहेत, घरे सोडायला तयार नाहीत. कुणाच्या नवऱ्याने आपल्या हक्काच्या पैशांकरिता टाचा घासून आत्महत्या केली, तर कुणी अन्नान दशा सोसत मरण पावला. ही व्यथा आहे एनआरसी कंपनीतील कामगारांच्या कुटुंबांची. अदानी उद्योगाने ही कंपनी खरेदी केली आहे. या कामगारांनी घरे सोडावीत, याकरिता दिवा-पाणी तोडले आहे. त्यामुळे उद्विग्न झालेल्या कमल शाहू डोंगरे या साठीच्या महिलेने सवाल केला की, आम्ही माणसं नाहीत का? आम्ही मेल्यावर आम्हाला आमची देणी देणार आहात का? हे बोलताना त्या अक्षरश: रडत होत्या.

एनआरसी कंपनीपासून जवळच असलेल्या जेतवनगर टेकडीवर एका साध्या घरात राहणाऱ्या कमल शाहू डोंगरे यांचे पती शाहू हे १९७२ साली कामाला लागले. अनेक वर्षे ते कायमस्वरुपी कामगार नव्हते. शाहू यांना तीन मुले आणि पत्नी कमल असा परिवार होता. शाहू यांना दहा हजार रुपये पगार होता.  कंपनी २००९ साली बंद झाली. शाहू यांनी कर्ज काढले होते. घराचा खर्च कसा चालवायचा आणि घेतलेले कर्ज कसे फेडायचे, याचे टेन्शन त्यांना होते.  कंपनीकडून थकीत देणी मिळत नसल्याने शाहू यांनी कंपनीच्या आवारातील आर. एस. इमारतीच्या मजल्यावरून उडी मारून २०१२ साली आत्महत्या केली. त्यांच्या पत्नी कमल यांना कंपनीकडून दरमहा एक हजार रुपये पेन्शन मिळते. त्यांच्या तीन मुलांपैकी दोन मुले रिक्षा चालवितात. एक मुलगा पुण्याला आहे. मुलांचे त्यांच्याच कमाईत भागत नसल्याने कमल यांच्यावर एकटे   जीवन जगण्याची वेळ आली आहे. पोट भरण्यासाठी दिवसभर त्या भंगार गोळा करतात. त्यातून त्यांना दिवसाला ६० ते १०० रुपये हातखर्ची सुटते.  त्यांना पायाचे आणि कंबरेचे दुखणे आहे. कंपनीकडून १० ते १५ लाख रुपयांची थकबाकी कमल यांना अपेक्षित आहे. कंपनीसमोर एनआरसी संघर्ष समितीतर्फे धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे कमल यांचा पंधरा दिवसांचा रोजगार बुडाला आहे. सोजर कचरू ओव्हाळ या मूळच्या बीड जिल्ह्यातील लोणीच्या. त्यांचे पती कचरू हे लोणीचे. सोजर या त्यांच्या मामाकडे होत्या. मामांनी कचरूसोबत लग्न लावून दिले. कचरू हे एनआरसीत कामाला होते. बरीच वर्षे अस्थायी काम केल्यावर स्थायी स्वरुपात कायम मिळाल्यावर सात वर्षानी कंपनी बंद पडली. २०१६ मध्ये कचरू यांचे निधन झाले. कचरू हातगाडीवरून कागदाचा लगदा वाहून न्यायचे. त्यावेळी त्यांच्या पोटात गाडीचा दांडा घुसल्याने त्यांना दुखापत झाली होती. सोजर यांचा मुलगा विकास हा लॉकडाऊनमध्ये कामावर जात असताना पोलीस त्याच्या मागे लागले. त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याचा पाय मोडला. तो घरीच आहे. त्याने पत्नी व मुलांना माहेरी पाठवून दिले आहे. सोजर यांना दुचाकीने धडक दिल्याने त्यांचा डावा हात मोडला आहे. त्यात रॉड टाकला आहे. हात मोडल्याने धुणी भांड्याची कामे करता येत नाहीत. दोन वर्षांपासून हजार रुपयांची पेन्शन मिळते. त्यावर कसे काय भागवायचे.  कंपनीकडून सोजर यांना २०.७१ लाख रुपये येणे बाकी आहे.            

एका कामगाराचा हृदयविकाराने मृत्यू थकीत देणी मिळत नसल्याने कौशल्या पवळ यांचे पती किसन यांचा दोन वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला. कौशल्या यांना दोन मुले आहेत. त्यांना लॉकडाऊनमुळे काम मिळत नाही. कौशल्या मोहने परिसरात पापड लाटण्याचे काम करतात. त्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे. एक किलो पापड लाटल्यावर १५ आणि दोन किलो पापड लाटल्यावर ३० रुपये मिळतात. गुडघ्याच्या त्रासामुळे जास्त वेळ पापड लाटता येत नाहीत. 

भाबड्या मुलीचेही हाल nतानाजी वीर हे कंपनी बंद झाल्यापासून भाजी विक्री करीत आहेत. दिवसाला शंभर रुपये कसेबसे सुटतात. त्यांना एक गतिमंद मुलगी आहे. तिच्या उपचाराचा खर्च जास्त आहे. वीर कंपनीच्या कामगार वसाहतीत राहतात. त्यांना हुसकावून काढण्याकरिता वीज - पाणीपुरवठा खंडित केला आहे. nउकाड्याचे दिवस सुरू झाल्याने त्यांची गतिमंद मुलगी रात्ररात्र झोपत नाही आणि पंखा लावा म्हणून सांगते. तिला काय उत्तर द्यायचे. रात्रीच्या अंधारात त्या भग्नावस्थेतील घरात वीर कंठाशी आलेला हुंदका फक्त दाबतात.